जाहिरनामा पाळणे बंधनकारक असावे का.!?

Submitted by ashokkabade67@g... on 9 April, 2019 - 12:17

निवडणूक आलि म्हणजे प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेते आरोपांची बरसात आणि आपल्या जाहिरनाम्यातुन जनतेसाठी आश्वासनांची खैरात करीत असतात आणि जनताही हे राजकीय पक्ष आणि नेते आपला दिलेला शब्द आणि आश्वासन पाळतील या खोटयाआशेने यांना मतदान करते आणि आश्वासन देणारे हेच नेते वोतो ईलेक्षण जुमला था। अस बेशरमपणे सांगुन जनतेच्या तोंडाला पान पुसतात गतं निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने भरमसाठ आश्वासने दिली काँग्रेस सत्तेवर आलिच नाही त्यामुळे आश्वासन पाळण्याची वेळच त्यांच्यावर आली नाही आणि भाजपने दिलेले कुठलेच आश्वासनपाळले नाही मग या पक्षांंनी जनतेची फसवणुक केली म्हणूण यांच्यावर दावा का दाखल करु नये.,पण कायदयाने तसे करता येणार नाही. सदैव हे नेते आणि राजकीय पक्ष जनतेची फसवणूक करतच रहाणार आहेत यासाठी प्रत्येक पक्षावंर कायदयाने आश्वासन पाळण्याचे बंधन असायलाच हवे।आपल्याला काय वाटते.?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जाहीरनामा पाळणे बांधकारक करण्याऐवजी पुढील निवडणुकीच्या आधी सत्ताधारी पक्षाला निकालपत्रिका जाहीर करायला लावावी.
ही ही आश्वासनं दिली होती, त्यातली ही पूर्ण केली, ही इन प्रोग्रेस आहेत आणि ही (सगळी ढीगभर ;)) ढिम्म आहेत.
दिलेल्या आश्वासनाखेरीज हे चांगले काम केले, हे हिरोगिरी दाखवायला जाऊन सगळं घाण करून ठेवलं इ इ...े

ते नेहरूंच भूत कामात अडथळा आणतो त्याचा बंदोबस्त कसा करणार? एखादा मांत्रिक पं . प्र . झाला तर शक्य आहे , सध्या प्रवासही त्याच दिशेने चालू आहे .

शेषन निवडणूक आयुक्त झाले आणि निवडणुकीचा चेहराच बदलून दाखवला .
जुनेच कायदे वापरून .
तोपर्यत ते सर्व कायदे फक्त कागदावरच होते

जाहिरनामा पाळणे बंधनकारक नसावे. मत देणारे लोक ठरवतील मागच्या वेळी दिलेली आश्वासने पाळली गेली का ? पाळण्याचा प्रयत्न केला गेला का?

जाहिरनामा पाळणे बंधनकारक असावे का.!?
<<

ह्या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असे आहे. जर जाहिरनामे पाळायचा रिवाज ह्या देशात असता तर देशातील गरिबी १९७१ सालीच हटली असती व रा'फूल' गांधीला २०१९च्या निवडणुकीत पुन्हा 'गरिबी हटाव'ची घोषणा करावी लागली नसती.

भाजपा सोडून सर्व पक्षांचे जाहिरनामे म्हणजे निवडणुकीच्या काळात मतदारांसमोर फेकलेली एक हड्डी असते जी कितीही चावली तरी त्याने पोट भरत नाही. एक भाजपाचा २०१४ चा जाहिरनामा असा आहे ज्यात लिहिलेल्या अर्ध्याअधिक घोषणा पूर्ण झाल्या आहेत व ज्या पूर्ण नाही झाल्या त्याला सर्वस्वी जबाबदार आडमुठे विरोधक आहेत.

एक भाजपाचा २०१४ चा जाहिरनामा असा आहे ज्यात लिहिलेल्या अर्ध्याअधिक घोषणा पूर्ण झाल्या आहेत व ज्या पूर्ण नाही झाल्या त्याला सर्वस्वी जबाबदार आडमुठे विरोधक आहेत. > 'अतिनिर्बुद्ध' Lol

मी तर असे कधीच म्हणार नाही की निवडणुकीत दिलेली आश्वासनं राजकीय पक्ष निवडून आल्यावर पाळतात .
काही आश्वासनं आशि असतात की साक्षात ब्रह्मदेव सुधा पूर्ण करू शकणार नाही .
त्यामुळे कोणती आश्वासन ची haddi चघळाची आणि कोणत्या haddi ला तोंड सुधा लावायच नाही हे जनतेनी ठरवल पाहिजे

ह्या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असे आहे. जर जाहिरनामे पाळायचा रिवाज ह्या देशात असता तर देशातील गरिबी १९७१ सालीच हटली असती व रा'फूल' गांधीला २०१९च्या निवडणुकीत पुन्हा 'गरिबी हटाव'ची घोषणा करावी लागली नसती.
+१११११११११११११११११११११११११११११११

हयात राजकीय पक्षाचं दोष आहे असे कृपया समजू नये ..
एक व्यक्ती केमिकल वापरून पिकविलेला सुमार दर्जाचे आंबे विकत आहे त्याचा बाहय रंग chemical mule अतिशय सुंदर असा पिवळा आहे .
आणि त्याच्याच बाजूला नैसर्गीक रित्या पिकावलेला उत्तम दर्जाचा अंबा विक्रीस आहे पण त्याचा रंग पिवळसर हिरवा आहे आकर्षक नाही .
तर ग्राहक सुमार दर्जाच्या आकर्षक रंगाचे पण chemical वापरून पिकावलेल आंबेच घेतो .
दोष विकणाऱ्या चा नाही पारख नसलेल्या ग्राहकाचा आहे

Black cat
कोणताच पक्ष सर्व आश्वासनं पाळत नाही .
Bjp चे फक्त नाव का घेताय

कोन्ग्रेस ने गरिबी हटवली नाही असे इथे बोम्बलाणारे गरीब आहेत का? असतील तर इथे बसून बोंबाबोंब केल्यापेक्षा चार कष्टाची कामे करून पैसे कमवा ना येड्याहो... मनरेगा मध्ये जा कामाला...

मी एक टोणगा पाळलेला आहे, त्याच्या जीवावर बसून खातो. मला काही फरक पडत नाही कोण जिंकणार कोण हरणार. पण खरं बोलायची खोड जातच नाही माझी.

हेला आणि मार्मिक तुम्ही पक्ष निष्ठा सोडून डोळे उघडे ठेवा .
जगातील सर्वात गरीब देशातील लोकांपेक्षा उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या राज्यातील लोक गरीब आहेत .
मुंबई पुणे बंगलोर ,Delhi ,Madras hyadrabsd hyatun बाहेर या गरीबच गरीब दिसतील .
जगातील गरीब लोकात सर्वात जास्त गरीब भारतात राहतात

१९६० साली आजोबांचे उत्पन्न किती होते?
आपले 2018 मध्ये किती आहे ?

आपण आपल्या आजोबापेक्षा गरीब झालो हे कुणी दाखवू शकेल का ?

माझ्या आजोबांकडे दोनशे मेंढरं, पन्नास गाई, तीन म्हशी होत्या व चाळीस एकर जमीन होती. आज माझ्या कडे फक्त तीन एकर जमीन आहे. तीची किंमत एक कोटी वीस लाख रुपये आहे.

गांधी नेहरू के महल मे सत्ता थी , पैसा था , मेरी माँ घर मे चुल्हा जलाती थी और उसका धुवा मेरी आख मे जाता था.

( नेहरूंना एकच मुलगी होती , 'ह्यांच्या' घरात सहा मुले चुलीजवळ धुरात बसवायला कमला नेहरू गेल्या होत्या का ?)

तुलना आजोबा आणि मी अशी आहे. लोकसंख्या वाढली तर गरीबी वाढेल किंवा वाढलेली लोकसंख्या कर्तुत्ववान असेल तर श्रीमंत होईल हे ठाऊक आहे मला.

राजेश१८८, मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही.
म्हणायला २०१४ मध्ये रितसर पैसे भरुन भाजपचा नोंदणीकृत सदस्य झालो होतो.

१९४७-८० मधील भारताचा सरासरी आर्थिक विकासदर हा भारताबरोबरच स्वतंत्र झालेल्या बाकी अशियाई देशांपेक्षा आणि मुख्यत्त्वे आशियाई वाघ म्हणल्या जाणाऱ्या देशांपेक्षा बराच कमी होता.

मार्मिक तुम्ही पक्ष निष्ठा सोडून डोळे उघडे ठेवा
पहिले तुमचे ते अज्ञान झाका, अभ्यास करा. १९७१ नंतर २०१९ पर्यंत गरिबीत घट झाली की वृद्धी झाली ते सांगा.

40 वर्षांपूर्वी असलेली गरिबांची संख्या किंवा दारिद्य्ररेषेखाली जीवन जगणार्‍यांची संख्या कमी होत चालली आहे यात काही शंका नाही, परंतु ही संख्या कमी होण्याचा जो वेग आहे तो अतिशय धिम्या स्वरूपाचा ठरतो. 1960 पर्यंत दारिद्य्ररेषेखालील लोकांची संख्या 65 टक्के होती. 2011 पर्यंत ती 45 टक्क्यांपर्यंत खाली आली आणि आता ती 30 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे सांगितले जाते, परंतु हे सगळे सरकारी आकडे असल्यामुळे त्यावर थेट विश्वास ठेवता येत नाही.

. कारण खेड्यांमधून शहराकडे आलेले लोक खेड्यातल्या 30 रुपये रोजापेक्षा शहरात 200 रुपये रोज कमावतात. याचा अर्थ त्यांची गरिबी नाहीशी झाली असे म्हणणे त्यांच्यावरच अन्याय करणारे ठरते. खेड्यात मातीच्या किंवा पडक्या घरामध्ये राहणारे लोक शहरात झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. आणि काही नागरी सुविधा सहजपणे मिळवतात. म्हणून ते आता गरिब राहिलेले नाहीत, अशी जर कोणी दवंडी पिटत असेल तर तीसुध्दा आपलीच फसवणूक ठरते.

खेड्या तून शहराकडे आलेले लोक खेड्यातल्या 30 रुपये रोजापेक्षा शहरात 200 रुपये रोज कमावतात. याचा अर्थ त्यांची गरिबी नाहीशी झाली असे म्हणणे त्यांच्यावरच अन्याय करणारे ठरते. खेड्यात मातीच्या किंवा पडक्या घरामध्ये राहणारे लोक शहरात झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. आणि काही नागरी सुविधा सहजपणे मिळवतात. म्हणून ते आता गरिब राहिलेले नाहीत, अशी जर कोणी दवंडी पिटत असेल तर तीसुध्दा आपलीच फसवणूक ठरते.

शेतीमालाला दीडपट हमी भावाची घोषणा करूनही प्रत्यक्षात उत्पादन खर्चा इतकाही भाव मिळत नसेल तर हे सरकार कशी गरिबी दूर करणार?

Pages