मायबोली वर लेखन केल्यामुळे नक्की काय मिळते?

Submitted by Mi Patil aahe. on 8 December, 2018 - 00:13

मायबोलीवर भरपूर ग्रुप्स आहेत.प्रत्येकाचा विचार केलेला दिसतो.ज्याची जी आवड ते तो/ती लिहिते,वाचते.
वाचकांना आनंद मिळत असेल, लेखक कवी हे ही आनंद लूटत असतील.
असे मी समजते!!!!!
पण हे खरेच आहे का? टाईमपास करणारेही आनंद घेतातच ना??? टींगल करून, एखाद्या चा मामा करून!!!!!!
मग माबोवर लेखन करून काय मिळतं??
निखळ आनंद!!!! की नुसता आनंद?????
की फक्त टाईमपास??????
का आणखी काही आहे,जे मला अजून कळलेले नाही.पण माबोकरांना 'ते' गुपीत ठाऊक असणार----- त्यामुळेच कदाचित मायबोलीवर मायबोलीकर लिहीत आहेत.
काही धागे,लेख,मत, विचार,सल्ला सर्वांनाच पटत नसतील/असतीलही म्हणून लिहीणे,सांगणे,बोलणे काहीच कधीच थांबत नाही,ते चालतच राहते.
कधी कधी तर असंही वाटून जाऊ शकत की नको ते लिहीण अन् नको ते वाचण---
कारण लिखाण करणं, वाचन करणं फार वेळखाऊ असतं.तरीही हौशी-गौशे लिखाण-वाचन करतातच---
मला त्या लोकांचे कौतुक करावेसे वाटते जे लिहीतात,अन् वर वाचतातही.विशेषत: प्रतिक्रिया/प्रतिसाद देतात ती माणसं खरच लाजवाब म्हणावी लागतील!!!
कारण या प्रतिक्रिया/प्रतिसाद जशा हुरूप वाढवू शकतात,तसेच बारीक तर कधी जोराचा चिमटाही काढतात, बरं!!!!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही भारंभार धागे काढून तुम्हाला काय मिळालं? तुमच्या लेखनातुन तुम्हाला जे काही मिळालं तेच बाकीच्यांना.

वाचक !

लेखनाला जर वाचकच नसेल तर ते व्यर्थ आहे.

प्रतिसादही मिळतात. ती लेखकाची कमाई असतात. ते कमवायला त्याने आपल्या लिखाणाची गुंतवणूक केली असते. शब्दाने शब्द वाढतो असे म्हणतात ना..

१. मला वाटतं "आपल्याला काय मिळतं?" याच विचारात आपण अडकून बसतो, "आपल्याला काय देता आलं?" हा विचार माणूस म्हणून आपल्याला कदाचित समृद्ध करू शकतो.

२. तुमचा प्रश्न खरंच चांगला आहे, विचार करायला लावणारा आहे. एखाद्याला टीव्हीवर चांगले सिनेमे बघायला आवडतात तर दुसऱ्याला ट्रेकिंग, भटकंतीची आवड असते, एखादा फूडी असेल तर दुसरा फिटनेस फ्रिक असतो, एखाद्याला दुसऱ्याची टिंगल करायला आवडते तर दुसऱ्याला स्वतःवर सुद्धा हसता येतं. तसंच एखाद्याला लेखन करायला तर दुसऱ्याला वाचायला आवडतं, हे सगळं करत असताना टाईम पास होतो का निखळ आनंद मिळतो का आत्मिक सुख प्राप्त होतं, हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.

३. माबोवर लेखन का करायचं किंवा एकंदरीत लेखन, वाचन का करायचं हा प्रश्न पु.ल. देशपांडे यांनी खूप वर्षा आधीच सोडवला आहे, पु.लं. त्यांच्या "पुरचुंडी" नावाच्या पुस्तकात म्हणतात की, "पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील पण कलेशी जडलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल"