महाकवी कालीदास

Submitted by kokatay on 9 November, 2017 - 12:25

उज्जैन, मध्यप्रदेशात आत्ता कालिदास समारोह चालू आहे. कालिदासांच नावं घेतल कि मला माझ माहेर आठ्वत! मध्यप्रदेश च शहर उज्जैन हे कालिदासांच शहर आहे , मी माझी मास्टर्स डिग्री इथूनच केली होती . इथे राहूनच मला कालिदासांच वैयक्तिक जीवन आणि त्यांच्या कार्या ची माहिती मिळाली .

उज्जैन (उज्जयिनी) (अवंतिका) भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक प्रमुख शहर आहे. हे शहर क्षिप्रा नदीच्या किनारी वसले आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी विक्रमादित्यच्या राज्याची राजधानी येथे होती. तसेच प्रख्यात महाकवी कालिदास यांची ही नगरी आहे. या शहराला मंदिरांचे शहर असेही म्हणतात कारण शहराच्या परिसरात असलेली अनेक प्राचीन, सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण हिंदू मंदिरे आहेत.

दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्यात जगभरातून भाविक येथे जमा होतात. भगवान शिव यांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महांकालेश्वर हे ज्योतिर्लिंग उज्जैन येथे आहे.तसेच, मंगळ या ग्रहाचे मंगळनाथ मंदिरही येथे आहे. या मंदिरात 'भात पूजा' केल्यास मंगळ ग्रहाचे कुंडलीत असलेले दोष नाहिसे होतात असा समज आहे.
मध्यप्रदेशातील सर्वात मोठे शहर इंदूर हे उज्जैनपासून केवळ ५५ कि.मी. अंतरावर आहे.

उज्जैन ची राजकुमारी विद्योत्तमा ही खूपच हुशार आणि शास्त्र तज्ज व्यक्ती होती. शास्त्रोक्त debate मध्ये तिला कोणी पण हरवू शकत नव्हत. तिने हा प्रण धरला होता कि जो तिला शास्त्रोक्त debate मध्ये हरवेल त्याच माणसाशी ति लग्न करेल . काही लोक तिच्यावर नाराज होते आणि तिला धडा शिकवायला म्हणून त्यांनी एका अशिक्षित माणसाला ज्याला कि कुठल्याही प्रकारच काहीच ज्ञान नवतं, पकडलं आणि त्याला सांगितलं कि तुझ लग्न एका राजकुमारी शी होऊ शक्त, तुला आम्ही सांगू ते करावे लागेल . तो माणूस हो म्हणाला ! राजकुमारी ला सांगितले कि तो तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं फक्त हातवारे करूनच देईल कारण काही कारणास्तव तो मौन व्रतात आहे. राजकुमारी नी ते मान्य केले.
राजकुमारी ला आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली आणि तिचं लग्न झालं , पण तिला लगेचच कळल कि तीची फसवणूक झाली आहे आणि रागवून तिनी तिच्या पतीला सोडून दिलं. तो माणूस मग उज्जैन च्या गड्कालिका देवळात येऊन बसला आणि देवी ची पूजा प्रार्थना केली. त्यानी हे प्रण घेतलं कि तो जितकं शक्य होईल तितकं ज्ञान अर्जित करेल . आणि आपल्याला मिळाले महाकवी कालिदास!
अर्थातच ही गोष्ट सर्वात लोकप्रिय आहे पण त्यांनी स्वतः कुठे ही त्यांच वास्तव्य किवा त्यांच्या खाजगी जीवना विषयी लहिलेलं नाहीये.
त्यांनी “ कुमारसंभव “ मेघदूत , रघुवंश , माल्वीकाग्नीमित्र , अभिग्यान शाकुंतल , रीतुसंवहार, विक्रमोर्वशीयम , असं अप्रतिम काव्य आणि साहित्य जगाला दिलं. भारतातच नव्हे तर विदेशात सुदा त्यांना एक महान लेखक- कवी म्हणून ओळखलं जातं. “ अभिज्ञान शाकुंतल “ हे सर्वात आधी इंग्रजी मध्ये रुपांतरीत केलं गेलं. एक महत्वाची माहिती म्हणजे अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया स्टेट युनिवरसिटी बर्कली चे प्रोफेसर आर्थर विलियम राईडर हयांनी संस्कृत ते इंग्रजी रुपांतर केलं.
उज्जैन ला कालिदास अकॅडमी आहे आणि दर वर्षी तिथे “ कालिदास समारंभ “ असतो . त्या समारोह मध्ये विभिन्न कला , संगीत, साहित्य प्रतीयोगिता असतात . ह्या सामारोहातून भारता ला मोठ मोठे कलाकार ही मिळतात . मला आठवतं कि मी शाळेत असताना महान चित्रकार एम. एफ. हुसेन ह्यांना पण पारितोषिक मिळालं होतं.
मला कधी- कधी असं वाटतं कि जीवनात आलेल्या अडचणी, ठोकताळे हेच आपल्याला सफलता मिळवून देण्यात मदद करतात. देवी सरस्वती चा आशीर्वाद जसा महाकवी कालिदास ना मिळाला , तसाच तुम्हा आम्हास मिळो आणि आपलं ध्येय गाठण्यासाठी सद्बुद्धी मिळो, हिच देवी चरणी प्रार्थना!
ऐश्वर्या कोकाटे
संपादिका
www.marathicultureandfestivals.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

राजकुमारी ला आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली>> ती कशी मिळाली ते लिहायला हवे होते.

पण तिला लगेचच कळल कि तीची फसवणूक झाली आहे >>> कालिदासाला ज्ञान प्राप्त झाल्यावर तो पत्नी कडे परत येतो तेव्हा कालिदासाची पत्नी त्याला विचारते "अस्ति कश्चिद वाग्विशेषः" (तुझ्याकडे काही वाक्चातुर्य आहे का?). तेव्हा उत्तरादाखल कालिदास तीन महाकाव्ये लिहितो. प्रत्येक महाकाव्याची सुरुवात ह्या प्रश्नातील एका शब्दाने होते
अस्ति - कुमारसंभव
कश्चिद - मेघदूत
वाग्विशेषः - रघुवंश

एक आणखी याबाबत कथा वाचनात आली होती.कालिदासाची पत्नी दिसण्यात चारचौघींसारखी होती.त्यांच्याकडे एक दिवस पाहुणा आला,त्याने तिला ३ प्रश्न विचारले होते.एकाच उत्तरात पाहुण्यांच्या तीनही प्रश्नांचे ,तिने उत्तर दिले होते.ते ऐकून पाहुणा आशर्यचकित झाला.ही जर एवढी हुषार तर कालिदास किती हुशार असे म्हणून निघून गेला.मला ते प्रश्न आणि उत्तरं आठवत नाहीत.