Submitted by निखिल झिंगाडे on 8 August, 2017 - 02:01
खूप खूप घाव झेलले आहे
आरपार तीर भेदले आहे
राम राम म्हणतात जे आता
पोचवून तुला चालले आहे
चंद्र आज लाल आहे नभी
ग्रहण त्यास लागले आहे
आज वाद संवाद बंद झाले
काय तुला कोण बोलले आहे?
वाट पाहू नको माझी अता
गाव ते मी सोडले आहे
खाऊ नको टमाटे ही आता
भाव त्याचेही वाढले आहे
राग आवरून घे ना तू जरा
बाण मनालाच टोचले आहे
लांब लांब राहिलो आहे जरी
हृदय तुझ्यात गुंतले आहे
नाही तुला उपयोग आंधळ्या
जग जरी हे प्रकाशले आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा