Submitted by रसप on 5 July, 2017 - 02:32
भाळलो पण थांबलो नाही
मुंबईला समजलो नाही
एक कविता अर्धवट होती
रात्रभर मी झोपलो नाही
शांत हो तू, मग पुन्हा बोलू
मी पुरेसा भांडलो नाही
जागतो आहेच म्हणजे, मी
खूप काही प्यायलो नाही
ती मनापासून आवडली
पण तिला मी भावलो नाही
पाठ दुखते फार कारण की
आजवर मी वाकलो नाही
ती कधी कवितेत ना आली
आणि मी गझलाळलो नाही
....रसप....
५ जुलै २०१७
http://www.ranjeetparadkar.com/2017/07/blog-post.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा