'बाहुबली-२'चं कथानक मी सांगणार नाही. ते जाणून घ्यायचीच उत्सुकता असेल, तर हा लेख वाचू नये !
बाहुबली-१, मोहेंजोदडो आणि आता बाहुबली-२ अश्या सिनेमांमुळे भारतीय सिनेमा परदेशी (हॉलीवूड) सिनेमापेक्षा किती पिछाडलेला आहे, अश्या तुलनांना ऊत आला.
मुळात बॉलीवूड आणि हॉलीवूड ही तुलनाच अगदी अप्रस्तुत आहे. हॉलीवूड सिनेमांना किती स्क्रीन्सचं ओपनिंग मिळतं आणि आपल्याकडे जास्तीत जास्त जरी कुणाला मिळालं तरी ते किती स्क्रीन्सचं असतं, दोन्हीचं मार्केट किती आहे, अश्या बाबींचा विचार केल्यास दोन्हीच्या बजेटमध्ये तफावत न आली तरच नवल. अन्यथा, तांत्रिक सफाईदार सिनेमा आपण बनवू शकत नाही असं अजिबात नाही. हॉलीवूडचे व्हीएफएक्ससुद्धा प्रामुख्याने भारतात किंवा भारतीय तंत्रज्ञांनीच केलेले असतात.
हे झालं स्पेशल इफेक्ट्स व इतर तांत्रिक सफाईबाबत. आता दुसरा मुद्दा.
'बॉलीवूड म्हणजे मुख्यत्वेकरून मसालापट. इथे १०० सिनेमांच्या मागे एखादा 'मसान' बनतो' असं काहीसं बऱ्याच जणांचं मत असतं. मी म्हणतो, तुम्ही शंभरपैकी पन्नास तर बघा. मग तुमचं तुम्हालाच समजेल की हे प्रमाण 'शंभरपैकी एक'पेक्षा खूपच जास्त आहे !
सिनेमा, नाटक किंवा कुठलीही कला ही त्या त्या समाजाचं रिप्रेझेंटेशन असते. सिनेमा तर खूपच स्पष्ट रिफ्लेक्शन असतं समाजाचं. समाज कसा विचार करतो, ह्यावर सिनेमा बदलतो, असं मला वाटतं. इथला समाज अजून हुंडा, ऑनर किलिंग, जातीद्वेष वगैरेंत गुंतलाय, पिछाडलाय. सिनेमा बनवणारेसुद्धा ह्याच समाजाचे प्रोडक्ट्स आहेत. शहरात राहून, एका अतिशय सुरक्षित वातावरणात वाढून एका अपरिपक्व समाजाचं प्रतिनिधित्व फुटकळ ठरवणं, हे चूक आहे. आपला चित्रपट त्याच त्या विषयांत गुरफटला आहे कारण आपला समाज त्याच त्या समजांत अडकलाय. आपला चित्रपट ढिसाळ आहे कारण आपला समाज विस्कळीत आहे. आपला चित्रपट उथळ आहे कारण आपला समाज अपरिपक्व आहे. ह्या समाजाला त्याच्या आवडीनुसार चित्रपट देणं, हा धंदा आहे. इथे भावनाप्रधानता प्रायोरिटीला आहे आणि तीच असावी. आपले विचार, अापले प्रश्न आणि प्रायोरिटीज ज्या आहेत, तसा आपला सिनेमा आहे. समाज ओव्हरनाईट बदलणार नाही, चित्रपटही ओव्हरनाईट बदलत नाही. पण हळूहळू खूप सकारात्मक बदल होत आहेत. समाजातही आणि चित्रपटातही.
सिमिलरली, हॉलिवूडचा सिनेमा तसा आहे, जसा त्यांचा टार्गेट समाज आहे. दोघांची आपसांत तुलना करुन सरसकट दोन्हीपैकी कुणा तरी एकाला फुटकळ मानणं, हे फक्त आंधळेपणाचं लक्षण आहे. आणि आंधळेपणा फक्त अंधारामुळेच येतो असं नाही, खूप जास्त एक्स्पोजरमुळेही येतो.
मसान, दम लगा के हैशा, दंगल, तारे जमीं पर, पा, बुद्ध इन ट्रॅफिक जॅम वगैरे सिनेमे आपल्याकडेच बनतील. मान्य आहे की जास्त सिनेमे वाईट असतात, पण जे चांगले असतात त्यांचं कौतुक नाही तर किंमत तरी करायला हवी. आणि मी हे फक्त पटकन जे आठवले आणि तेही नव्यातले सिनेमे सांगितले. विचार केला तर अजूनही आठवतील.
असो. नमनाला घडाभर तेल झालंय !
'बाहुबली' म्हणजे भव्यता, स्पेशल इफेक्ट्स, थरारक युद्धदृश्यं, नाट्य आणि टिपिकल दाक्षिणात्य शैलीची थोडीशी हवीहवीशीच ओव्हरअॅक्टिंग अशी माझी अपेक्षा होती, जी पूर्ण झाली ! भव्यतेमध्ये सिनेमा कुठेच कमी पडत नाही. मोठमोठे सेट्स, दाही दिशांनी फिरणारा कॅमेरा, अप्रतिम रंगसंगती हे सगळं स्तिमित करणारं आहे. स्पेशल इफेक्ट्स - पहिल्या भागाप्रमाणेच - काही ठिकाणी बऱ्यापैकी फसलेले आहेत, पण बहुतांश ठिकाणी केवळ कमाल केली आहे ! युद्धदृश्यंसुद्धा पहिल्या भागाप्रमाणेच फसली/ जमली आहेत, पण त्यांचाही एकंदर परिणाम चित्तथरारकच आहे. नाट्याच्या बाबतीत मात्र हा दुसरा भाग पहिल्या भागाच्या काही पाउलं पुढेच गेला आहे. पहिल्या भागाचं कथानक अंमळ बाळबोध वाटलं होतं, इथे त्याचा वेग, वळणं वेगळी आहेत आणि सरसही. 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं', ह्याचं उत्तर अपेक्षाभंग करणारं नाहीय, हे विशेष. कारण ह्या एका उत्तरासाठीची उत्सुकता इतकी शिगेला पोहोचली होती, की जर ते उत्तर तर्कशून्य असतं, तर अख्खा सिनेमाच कोलमडून पडला असता ! 'दाक्षिणात्य शैलीची थोडीशी हवीहवीशी ओव्हरअॅक्टिंग' मात्र इथे औषधापुरतीच आहे. सुरुवातीचा काही भाग जराशी बाष्कळ विनोदनिर्मिती करण्यात गेला आहे, पण तो भागही तरीही बऱ्यापैकी मनोरंजक आहे. संगीत मात्र कमजोर बाजू ठरलेलं आहे. जी काही ३-४ गाणी आहेत, ती अजिबात लक्षात राहण्यासारखी तर नाहीतच, पण 'कधी एकदा संपतायत' असं वाटावं, इतकी नीरस आहेत.
तमन्नाच्या पंख्यांसाठी अपेक्षाभंग आहे कारण ती केवळ २-३ प्रसंगांत दिसते. पण अनुष्का शेट्टीच्या पंख्यांसाठी मात्र पर्वणी आहे ! ती फक्त 'दिसत'च नाही, तर मोहवते ! तिच्या अप्रतिम सौंदर्याला तितक्याच दमदार अभिनयाचीही जोड आहे, हे विशेष. युद्धदृष्यांतलाही तिचा वावर खूप सहज वाटतो. प्रभास, राणा दग्गुबाती, राम्या, सत्य राज, नासर ह्या सगळ्यांचीच कामं उत्तम झालेली आहेत. नासर आणि सत्य राज तर व्हेटरनच आहेत. तर 'प्रभास' सिनेमाचं केंद्रस्थान. पण 'राणा दग्गुबाती' हे एक सुखद आश्चर्य आहे ! धिप्पाड शरीरयष्टीवाल्या नटांची टिपिकल 'ठोकळा' इमेज तोडणारा हा नट आहे. महान अभिनय वगैरे तो करत नाही, पण लक्षवेधी नक्कीच ठरतो आणि त्याच्या जबाबदारीत कुठेही कमी पडत नाही. 'द गाझी अटॅक' मधलंही त्याचं काम मला आवडलं होतं आणि इथलंही आवडलंय.
'मनोज मुन्तशीर' ह्यांनी लिहिलेली गाणी सपशेल उथळ वाटली, तरी त्यांनी लिहिलेले संवाद मात्र मस्त जमून आलेले आहेत. ३-४ जागांवरच्या पंचलाईन्स तर कमालीच्याच आहेत ! ह्या एका बाबतीतही दुसरा भाग पहिल्यापेक्षा सरस आहे.
गेल्या साठ-सत्तर वर्षांचा विचार केला तर भारतीय सिनेमाचा प्रवास डोळे दिपवून टाकणारा आहे. I know there is still a long way to go, पण गेल्या वीस वर्षांत भारतीय सिनेमाने अक्षरश: कात टाकलेली आहे. मला कुणाचीही स्पेसिफिक नावं घ्यायची नाहीयत. पण किमान १५-२० दिग्दर्शक असे आहेत, जे काळानुरूप किंवा काळाच्या पुढचा विचार करतात. 'एस. राजामौली' हे त्यांच्यापैकी एक नक्कीच आहेत. आजच्या काळात, जेव्हा सिनेमा इंडस्ट्री प्रचंड आर्थिक विवंचनेत आहे, एक इतक्या मोठ्या बजेटचा सिनेमा करणं, तोही स्थानिक भाषेत आणि त्याला ह्या खंडप्राय देशात लोकप्रिय करून सगळे रेकॉर्ड्स मोडणं, ही किमया फक्त मार्केटिंगची असू शकत नाही. प्रोडक्टही तितकं सशक्त आहे, म्हणूनच हे शक्य झालं आहे. 'बाहुबली' हे फक्त दिग्दर्शक राजामौली ह्यांचं ड्रीम प्रोजेक्ट नाही, हे माझ्यासारख्या लाखो-करोडो चित्रपटरसिकांचंही ड्रीम प्रोजेक्ट आहे ! हे स्वप्न स्वत: राजामौली गेली काही वर्षं जगतच असावेत, तीन तासांच्या खेळात आपणही ते नक्कीच जगतो. पण जर भारतीय चित्रपट प्रेक्षक हा मठ्ठच आहे आणि त्याला हातोहात बनवून सिनेमातून करोडो रुपये सहज मिळवले जाऊ शकतात, असा बाळबोध समज अगदी ठामच असेल तर तो ज्याचा त्याला लखलाभ ! माझ्या दृष्टीने तरी राजामौली अभिनंदनास पूर्णपणे पात्र आहेत !
To conclude the conclusion, तुलनात्मक दृष्ट्या विचार केल्यास, दुसऱ्या भागाने पहिल्या भागावर बहुतांश बाबतींत मात केलेली आहे. बाहुबलीचं हे कन्क्ल्युजन अॅक्शनपॅक्ड थरारनाट्याचा एक ४४० व्होल्ट्सचा झटका आहे. हा भारतीय मसालापटाने घेतलेला एक वेगवान टेक ऑफ आहे. अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, पण हा टेक ऑफ पाहता, कुठलाही पल्ला आवाक्याबाहेर नक्कीच नाही, हा विश्वास वाटतो आहे !
रेटिंग - * * * *
- रणजित पराडकर
छान
छान
भारीच परीक्षण... घडाभर तेलाशी
भारीच परीक्षण... घडाभर तेलाशी सहमत.
पुढच्या आठवड्यात, दोन आठवड्यात एक दोन गाणी कापण्याची शक्यता आहे काय? म्हणजे जरा स्लिम झालेला सिनेमा पाहायला मिळेल?
-----//--
दर्शकांना हातोहात फसवून करोडो कमावणे सोपे आहे असे बोलणाऱ्यानी करुन दाखवावे...जे असं करून दाखवतात त्यांना तसं बोलायचा हक्क आहे
आख्खा लेख बाजुल काढुन बोल्ड
आख्खा लेख बाजुल काढुन बोल्ड करुन +१०००
जय महिष्मती.
MASTA AAHE MEE KAL PAHILA,
MASTA AAHE MEE KAL PAHILA,
MULALA KHUP AAVADALA.
बघणारच होतो ! गाणी बहुतेक
बघणारच होतो ! गाणी बहुतेक अनुवादात फसली आहेत. गुलजार साहेबांना द्यायला हवे होते ते काम.
दर्शकांना हातोहात फसवून करोडो
दर्शकांना हातोहात फसवून करोडो कमावणे सोपे आहे असे बोलणाऱ्यानी करुन दाखवावे...जे असं करून दाखवतात त्यांना तसं बोलायचा हक्क आहे >>>>>प्रेक्षक.
न विचारता सल्ले दिल्याबद्दल
न विचारता सल्ले दिल्याबद्दल माबोवर काही मोबदला मिळतो का? काय कि मी नवीन आहे इकडे...
मस्त आहे बाहुबली २ , मजा आ
मस्त आहे बाहुबली २ , मजा आ गया .
चांगला असावा अशी अपेक्षा आहे.
चांगला असावा अशी अपेक्षा आहे. तिकीटाचे दर बघून घेरी आलीये पण मनावर दगड ठेऊन परवाची केलीत बुक.
मी उद्या बघणार आहे . लेट्स सी
मी उद्या बघणार आहे . लेट्स सी कसा आहे .
आशुचॅम्प, तुम्हाला किती दराने तिकीट मिळालीत ? बुक माय शो वर जवळ जवळ सगळे शो हाऊसफुल्ल दाखवत आहेत .
छान परीक्षण!
छान परीक्षण!
पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग जास्त आवडला
Mast aahe movie. ..1st day
Mast aahe movie. ..1st day la phaila..full paisa wasool ....
तिकीटाचे दर बघून घेरी आलीये
तिकीटाचे दर बघून घेरी आलीये
>>>>>
मी सुद्धा हे ऐकलेले की भाव अव्वाच्या सव्वा आहेत. मात्र मी एक तारखेचे सकाळचे भाव चेक केले नऊ ते अकराच्या शो चे तर नेहमीसारखेच कमी आढळले. केल्या पटकन बूक. बाकी पहिला भाग तसाही मोबाईलवरच पाहिलेला आणि बाळबोध च वाटलेला चित्रपट. तरी गर्लफ्रेंडच्या हट्टाने जातोय. हा जरा उजवा असेल तर तेवढेच पैसे वसूल होतील ..
जबरी चांदोबा आहे हा सिनेमा!!!
जबरी चांदोबा आहे हा सिनेमा!!!
या चित्रपटाचा पहिला भाग मी बघितला नव्हता. आता बघणार आहे.
अर्धा भाग आम्हाला फार म्हणजे फारच आवडला पण इंटरवेल नंतर आधी मस्त चाललेला सिनेमा अतिरक्तरंजित केला आहे असं आम्हाला वाटलं! स्टोरी थोडी dilute केली असती तर चित्रपट एव्हढा अंगावर आला नसता! पण तरी मजा आली!
15 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी हा सिनेमा नसल्याने मुलांना नेलं नव्हतं पण तसा लहान मुलांना बघण्यालायक आहे असं माझं वै म त्यामुळे आता मुलांना घेऊन जाण्याचा विचार आहे.
मेलबर्न मध्ये सगळीकडे गेले दोन दिवस house फुल्ल होता. आज रविवार असल्याने आणि आम्ही गेलो ते थिएटर भर गावात असल्याने आणि त्यात सकाळचा शो असल्याने आरामात tickets मिळतील हा माझा अंदाज चुकीचा ठरला. अर्थात आम्हाला दुसऱ्या रांगेत मध्यभागी 2 टिकेट्स मिळाली पण शेवटी सिनेमा house full झालाच!!!
एकदम भारी अनिमेशन असलेला सिनेमा Imax मध्ये बघण्याची मजा काही औरच!
आता परीक्षण आणि प्रतिक्रिया वाचते.
जय महिष्मती.
जय महिष्मती.
बंगलूरू आणि काही ठिकाणी म्हणे
बंगलूरू आणि काही ठिकाणी म्हणे थिएटरवाल्यांनी ईंटरव्हलच्या नंतरचा भाग (उत्तरार्ध) आधीच दाखवला आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत लक्षातच आलं नाही. याला नक्की काय म्हणायचं तेच माझ्या लक्षात येत नाहीये. चित्रपट पहायला आलेले बुद्धी गहाण टाकून आले होते की कमालीचे सहनशील किंवा समाजभिरू होते. आपल्याला पडद्यावरच्या अचानक सुरू झालेल्या कथानकाचा काही क्ल्यु लागत नाहिये हे कळत कसं नाही
जबरी चांदोबा आहे हा सिनेमा!!!
जबरी चांदोबा आहे हा सिनेमा!!! >>+1 देवसेनेच्या राज्यातले प्रसंग ,गाणी आणि वेशभूषा अगदी चांदोबातले वाटतं होते
बुक माय शोवर मला एकशे वीस
बुक माय शोवर मला एकशे वीस रुपयांचा डिस्काऊंट मिळाला. आमच्याकडे सकाळच्या शो ला आयनॉक्समध्ये सव्वाशे रुपये तिकिट होते. दोघांच्या तिकिटात अर्धे पैसे कमी झाले. आणखी काय हवे… म्हणजे अवघ्या दीडशे रुपयांत दोघांनी शिणुमा पाहिला की हो..
तिथे लिहिले तेच इथे लिहितोय .
तिथे लिहिले तेच इथे लिहितोय .
आपण एकच सिनेमा पाहिला की नाही ?
मला तरी स्पेशल इफेक्ट अतिशय फालतू वाटले.
स्पेशल इफेक्ट कमी ठेवा , पण ते खरे वाटले पाहिजेत.
विशेषतः तो कुंतल राज्यातील धरणाचा सीन तर अगदी बाळबोध स्पेशल इफेक्ट आहेत .
सिनेमा टाइमपास आहे. पण
सिनेमा टाइमपास आहे. पण गाण्याचे डबिंग अत्याचार आहे. तेवढे चालायचेच.
पाहिला . एकदम फॅन्टसी सिनेमा
पाहिला . एकदम फॅन्टसी सिनेमा आहे. गाणी मात्र जाम गंडलीत . अनुष्का शेट्टी सुंदर दिसते.तिच्या साड्याही मस्त आहेत . बाकीचे कलाकारही मस्त काम करतात .थोडक्यात जितका हाईप केला आहे तितका ग्रेट वगैरे नाहीये .तीन तास डोकं बाजूला ठेवून एन्जॉय करायचं असेल तर २०० रुपये वर्थ आहेत.बाकी ते स्पेशल इफेक्त जमलेत बर्यापैकी .फक्त काही ठिकाणी ते ग्राफिक्स आहेत ते स्पष्ट कळतं . थेटरातल्या बच्चे कंपनीने भारी एन्जॉय केला .सगळ्यात आवाज त्यांचंच येत होता . काही ठिकाणचे पंचेस मस्त जमलेत . प्रभास, दुगुबातीच फिजिक चांगलं आहे. स्टोरीचा अंदाज फर्स्ट हाफ मध्ये येतोच पण डायरेक्तर प्रेक्षक शेवट पर्यत बसून राहिलं याची काळजी घेतो. थोडक्यात टाईमपास सिनेमा आहे.
तांत्रिक बाजूच पाह्यची असेल
तांत्रिक बाजूच पाह्यची असेल तर मिर्झ्या काय वाईट होता? हां आता कथानकातच काही दम आणि नाविन्य नव्हतं ही बाब अलाहिदा.
अनुष्का शेट्टी आणि स्पेशल
अनुष्का शेट्टी आणि स्पेशल इफेक्ट्स साठी दोनदा पाहिला
बेकार मूवी... काय पण...
बेकार मूवी... काय पण...
अप्रतिम सुंदर!!!
अप्रतिम सुंदर!!!
प्रभास आणि अनुष्काची केमिस्ट्री मस्त!! पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग खरंच मस्त झालाय.
अजून एकदा तरी पहाणार
अप्रतिम सुंदर!!!
अप्रतिम सुंदर!!!
प्रभास आणि अनुष्काची केमिस्ट्री मस्त!!
अजून एकदा तरी पहाणार +१
फक्त मला पहिला भाग दुसर्यापेक्षा जास्त आवडला
अजुन एक पहिला असो वा हा
अजुन एक पहिला असो वा हा दोन्ही थेयटरात्च पहावे असे निदान मलातरी वाटते त्याशिवाय मजा नाही.
तसेही पायरेटेड कॉपी अगदी दुसर्या दिवशी आली मोबाईलवर
मजा आली.. टाईमपास असणार आहे
मजा आली.. टाईमपास असणार आहे हे तर माहितीच होत ना..
मजा आली पण.. प्रभास मस्त.. राणा मस्त.. अनुश्का पण मस्त.
साउथ मसाला आहे.. पण बोअर नाही झाला.. पहिला थिएटर मधे बघितला नव्हता
पण पहिला बघितल्यावर अंदाज येतोच की मसाला असणार..
तशीच तयारी करुन गेले.. कुठेही बोअर नाही झाल.
. प्रभास चं कॅरॅक्टरच असं बनवलं आहे की तो जे काही लार्जर दॅन लाईफ करतो त्यावर विश्वास ठेवावा वाटतो..
राणाला खर्या आयुश्यात एका डोळ्याने दिसत नाही आणि दुसरा डोळा पण
कोणाचा तरी बसवला आहे.. असं वाचलं आणि खरचं रिस्पेक्ट वाटला..
अप्रतिम सुंदर!!!
अप्रतिम सुंदर!!!
प्रभास आणि अनुष्काची केमिस्ट्री मस्त!! पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग खरंच मस्त झालाय.
अजून एकदा तरी पहाणार >>>+१
प्रभासने त्याचे १ दिवसाचे
प्रभासने त्याचे १ दिवसाचे उत्पन्न रु. १२० करोड नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झालेल्या सैनिकांना दिलेय.
Pages