Submitted by ऋषभ गि.कुलकर्णी on 4 April, 2017 - 06:04
दिंडीत फुलांच्या मी नाचून घेतले !
सुगंधाचे क्षण माझ्या ओंजळी किती ?
एकेक चेहरा हा मोहरून गेला !
वयाला पालवी फुटली कोवळी किती !
नव्या विचारांचा मी नवा सूर्य झालो !
आभाळी इथल्या कर्मठ काजळी किती !
स्मृतीत नाही त्या कालच्या गूजगोष्टी
आठवे ;लाजणे.. अन गाली खळी किती !
ठेच लागलेल्या पाऊलखुणा तिथल्या !
यशाच्या आजही वाटा वादळी किती !
............
- ऋषभ कुलकर्णी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा