फुसके बार – २१ जानेवारी २०१६

Submitted by Rajesh Kulkarni on 20 January, 2016 - 13:50

फुसके बार – २१ जानेवारी २०१६

१) नाटकामध्ये एखाद्या पात्राची विंगेत एक्झिट झाल्यावर जर रंगमंचावरची पात्रे “गेला एकदाचा” किंवा “गेली एकदाची” असे एकमेकांना जोरात टाळी देत व अगदी जोरात म्हणत असली तरी ते त्या पात्राला ऐकू आलेले नाही हे प्रेक्षकांनी समजून घ्यायचे असते.

२) एकदा एक मित्राने एक मिनिट किंवा तत्सम कमी वेळात संपूर्ण गणपती अथर्वशीर्ष म्हणू शकतो म्हणून सांगितले. घाई असेल तेव्हा म्हणायला सोयीचे पडते असे त्याचे म्हणणे होते. आणि तसे म्हणून दाखवलेही.

त्याला म्हटले की अरे, त्यासारखे काही तरी वाटले, पण एकही शब्द स्पष्ट म्हणता येत नाही, ना ऐकू येत नाही. तुझा हेतु यातून पुण्य मिळवायचा असेल तर गणपतीला ते नीट ऐकू तरी जायला हवे की नको?

३) सिक्किम हे नुकतेच पूर्ण सेंद्रिय राज्य घोषित करण्यात आले. बारा वर्षांपासून या दृष्टीने प्रयत्न सुरू केले गेले. सिक्किमनेच सर्वप्रथम प्लॅस्टिकपासून मुक्ती मिळवण्यासाठी चळवळ सुरू केली होती. हे अगदी अभिनंदनीय आहे.

अशा छोट्या राज्याला हे सगळे नखरे करणे शक्य आहे, आपल्याला ते शक्य नाही आणि गरजही नाही अशी सोयीस्कर समजुत करून घेऊन कीटकनाशके खात-पित राहू या व गायींच्या पोटात प्लॅस्टिकच्या पिशव्या कोंबत राहुयात.

४) प्रधानमंत्री या एबीपी न्यूजवर प्रसारीत झालेल्या कार्यक्रमामधून अनेक माहित नसलेल्या गोष्टी समजत आहेत. स्वातंत्र्यानंतर सर्वात प्रथम बनलेल्या आंध्र प्रदेशचे गठन करताना तेव्हाचे मद्रासही त्याबरोबर जोडावे अशी प्रमुख मागणी होती. शिवाय यासाठी गांधीवादी नेते पोट्टी श्रीरामुलु यांचे झालेले आमरण उपोषणही मद्रासमध्ये झाले होते. हैद्राबाद वगैरेमध्ये नाही.

आता मद्रास म्हणजे आजचे चेन्नई कोठे आणि आंध्र कोठे हे पाहिले तर या मागण्या अविश्वसनीय वाटतील.

५) प्रधानमंत्री या वर उल्लेख केलेल्या मालिकेत काश्मीरच्या भारतातील सामीलनाम्याचाही भाग आहे.

मुळात आणीबाणीच्या परिस्थितीत महाराजा हरिसिंग यांनी भारतात सामील व्हायचा निर्णय घेतला. तेथे पाकिस्तानी घुसखोरांच्याविरूद्ध लढण्यासाठी भारतीय सेना तातडीने पाठवण्यापूर्वी माऊंटबॅटन यांनी अट घातली होती की तेथे शांतता प्रस्थापित झाल्यावर सार्वमत घेतले जावे. नेहरू व पटेल यांनी त्यास नाइलाजाने संमती दिली होती. परंतु सर्वात मोठा घोळ झाला तो नेहरूंनी रेडिओवरून केलेल्या भाषणात. असे सार्वमत घेण्यास आमची संमती असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. निम्म्यापेक्षा अधिक काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात असताना असे सार्वमत घेणे व्यावहारिक कसे होईल, याचा विचारही नेहरूंनी तेव्हा केला नाही.

एवढेच नव्हे, तर भारताने सेना पाठवण्याचा निर्णय घेतल्यावर जीनांनीही पाकिस्तानची सेना तेथे पाठवण्याचा आदेश दिला. पण गंमत म्हणजे दोन्ही देशांच्या सेनेची सूत्रे तेव्हाही इंग्रजांकडेच होती. त्यांनी पाकिस्तानचे सैन्य तेथे पाठवण्यास नकार दिला. त्यावेळी जीनानी माउंटबॅटन यांना नेहरूंसमवेत चर्चेसाठी लाहोरला येण्याचे आमंत्रण दिले. त्यावेळीही नेहरूंची भूमिका ही आपली सेना ही काश्मीरवर कब्जा करण्यासाठी आपण पाठवलेली आहे अशी नव्हती. अशा कचखाऊ भुमिकेमुळे भारतसरकार काश्मीरच्या बाबतीत कधीच निर्णायक भूमिका घेऊ शकले नाही. या सर्व परिस्थितीत आणि पाकिस्तानच्या सेनेचा या आक्रमणात हात नसल्याचा निर्णय इंग्लंडने दिला. व त्यांनीच १ जानेवारी १९४८ रोजी पाकिस्तानने घुसवलेले कबिलेवाले अजून काश्मीरच्या भूमीवर असतानाही एकतर्फी युद्धबंदीचा आदेश दिला.

राज्य स्थापनेच्या बाबतीतही आधी आंध्र, मग मुंबईसह महाराष्ट्र अशा एकापाठोपाठ एक राज्यांच्या निर्मितीबाबत नेहरूंचे सगळे अंदाज चुकत गेले. प्रत्येक वेळी परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर, हिंसाचार झाल्यावरच त्यांनी निर्णय घेतले. प्रत्येक निर्णय त्यांच्या मूळ निर्णयाविरुद्धच होता.

६) शेअर बाजार गेल्या वीस महिन्यातल्या नीचांकी पातळीवर अशी बातमी पाहिली. मुळात देशामधली परिस्थिती गेल्या काही वर्षांमध्ये वाईट असताना, कोणतीही वृद्धी होत नसताना बाजार वाढत कसा गेला याचा प्रश्न कोणालाच कसा पडला नाही याचे आश्चर्य वाटते. जेव्हा वेळ येते तेव्हा पेरूसारख्या नगण्य शेअर बाजारामध्ये झालेल्या घसरणीचे कारण द्यायलाही कमी करत नाहीत. इतक्या पोकळपणावर हे प्रकार चालतात आणि प्रत्येकवेळी सोयीप्रमाणे ते शास्त्र असल्यासारखे आलेख काढून त्याबद्दलचे स्पष्टीकरण दिले जाते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

In connection with your comment on Kashmir, I had heard 50 years ago that Indian army was short distance from Lahore but Nehru wanting to take the issue of pakistan's attack on Kashmir to United nations asked Indian army to withdraw. This upset the commander of army which attacked Maj. Gen. Paranjape who resigned. Is there any truth in this? Can someone clarify?
Furthermore this withdrawal resulted in the current status where a part of Kashmir is in the hands of Pakistan and uprooting of kashmiri Pandits.

I am not sure about MajGen Paranjape's action, but the incident of our troops stranding at Lahore outskirts could not have been in 1948 as Indian forces did not cross our border then; for the reasons mentioned they could not even take entire Kashmir. So this happened in subsequent war.