तमाशा

Submitted by समीरपाठक on 1 December, 2015 - 12:19

तमाशा

दिग्दर्शक इम्तियाज आली हे आजच्या जमान्यातील पडद्यावर अन पडद्या बाहेर दोन्ही कडे (वेगवेगळी/एकत्र) गाजणारी जोडी रणबीर कपूर -दीपिका पादुकोण ला घेऊन हा नवीन सिनेमा घेऊन आलेले आहेत.लेखक देखील तेच आल्यामुळे या प्रयत्नाच्या प्रेक्षकांना वाटणाऱ्या सगळ्या यश-अपयशाचे धनी तेच एकटेच.

"काम करताना किंवा निवडताना असे काम निवडा व करा जे करून तुम्हाला आनंद मिळायला हवा" हे समजवण्यासाठी दिग्दर्शकाने पूर्ण कहाणी वाहून घेतलेली आहे. वेद वर्धन-सोहोनी (रणबीर कपूर) आणि तारा माहेश्वरी (दीपिका पदुकोण) यांची अपघाताने झालेली भेट अन त्या भेटीला पुढे आलेली प्रेमाची भरती या धाग्याभोवती फिरणारी कहाणी म्हणजे "तमाशा".

इम्तियाज आली स्वत:च लेखक आल्यामुळे कदाचित पण त्याने बर्याच ठिकाणी गोष्टी आपोआप समजतील अशी काळजी घेतल्याचे जाणवते. पण तरीही जो फरक पडायचा तो पडतोच. एक उदाहरण घेऊ, "तमाशा" हे शीर्षक का तर हे समजावताना त्याने वेद वर्धन-सोहोनीच्या पूर्वायुष्याचा संदर्भ वापरलेला/दिलेला आहे. त्याच्या पूर्वायुष्यातील आवडत्या गोष्टीत तमाशाचा समावेश करून त्याद्वारे त्याने त्या कलेला सरतेशेवटी तो आपले पोटाचे साधन कसे बनवतो हे बेमालूमपणे इम्तियाज manage करतो. एक हे हि उदाहरण घेऊ कि दिग्दर्शकच लेखक असला तरी काही गोष्टी समजावताना कसा कमी पडू शकतो, कसं/कुठे तर तारा माहेश्वरी आणि वेदची भेट होते, ताटातूट होते मान्य पण ताटातुटीच्या पाच वर्षांच्या कालखंडात (कालखंड दाखवलेला आहे) काहीही फरक पडत नाही?? मागील पानावरून पुढे अशी कहाणी त्यांची भेट झाल्यावर सरकते?? ती दिल्ली अन तो शिमला असे वेगवेगळ्या शहरातील असूनही?? इथे दिग्दर्शक प्रेक्षकांना "समजून जातील ब्वा" असे manage करतो. तारा माहेश्वरी या दीपिका पदुकोणच्या व्यक्तिरेखेच्या उल्लेख केवळ ती आहे इतपतच करावा लागेल कारण इम्तियाज आली आपल्याच "रॉकस्टार" पटाकडून इतका इम्प्रेस वाटतो कि तिला जास्त स्कोपच त्याने ठेवलेला नाही. बर्याच काळ तर ती कहाणीच्या बाहेरच असते.
या असल्या गोष्टी संगीतात दाबून जातात आणि प्रेक्षकांच्या स्म्रुतिपटलावरुन थिएटरच्या बाहेर पडताना पुसल्या जातात पण श्री रा.रा.ए आर रहमान हे पुन्हा एकदा पार्श्वसंगीत आघाडीवर अपयशी ठरलेले आहेत. दोन किंवा तीन गाणेही आहेत पण ते "सो सो" category त येतात.
इम्तियाज अली ने लेखक म्हणून कहाणी लिहिताना कहाणीचा हेतू ठरवताना गफलत केल्याचे जाणवते किंवा नंतर एका कहाणीच एका चित्रपटात रूपांतरण करताना जे बदल घडले असतील त्या बदलत कहाणी भरकटली असे वाटते. कारण काहीही असो पण कहाणी भरकटली बरेच काळ असे इम्प्रेशन घेऊन प्रेक्षक बाहेर पडतात. एक साधा मुलगा कला क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणारा मग घरच्यांच्या दबावाखाली झुकून
इंजी. इत्यादी क्षेत्रात नशीब आजमावलेला. मग तिथे यशस्वी झाल्यानंतर बॉलीवूडसदृश्य कर्मधर्मसंयोगाने तसलीच परिस्थिती बनून प्रेमात पडलेला. मग ताटातूट झालेला. या ताटातुटिचे कारण हि शब्दश: "हास्यास्पद" असलेला. हे कारण हास्यास्पद बनले कारण लेखक/दिग्दर्शक या कारणाची गहनता प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यात सपशेल अपयशी ठरलेत. पियुष मिश्राच्या व्यक्तिरेखेचा उल्लेख करावाच लागेल. कहाणी लहान मुलांना सांगणारा/समजावणारा एका म्हातार्याची व्यक्तिरेखा त्याने निभावलेली आहे. पण कहाणी पुढे सरकवण्यात इतक्या ठिकाणी त्याचा संदर्भ येतो कि जर तो कमी पडला असता तर अक्खा चित्रपटच हास्यास्पद बनला असता.

"काम करताना किंवा निवडताना असे काम निवडा व करा जे करून तुम्हाला आनंद मिळायला हवा" हे समजावण्याचा लेखक/दिग्दर्शक इम्तियाज अलीचा प्रयत्न त्याचे कमर्शियल रूपांतरण करताना भरकटल्याचे जाणवते. मी या चित्रपटाला १* स्टार देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझाही एक स्टार. अजिबातच झेपला नाही. त्यात रणबीर आणि दिपीका आहेत म्हणून सुसह्य आहे बघणं. शारूक असता तर पहिल्या दहा मिनिटातच बाहेर पडावं लागलं असतं. (तिकीट काढून त्याचे पिक्चर का पाहिला असता हे ही आहेच म्हणा). Wink
स्टोरी आणि डायरेक्शन कसंही कुठेही घरंगळत गेलंय.

अनुमोदन समीरपाठक. वेकप अलार्म फाॅर इम्तियाझ.
आणि रणबीरमध्ये अचाट पोटेन्शियल आहे. ते दाखवण्यासाठी त्याने इम्तियाझ पासून काही वर्षं बाजूला व्हावं.
अत्यंत उच्च आणि मग टिपिकल बाॅलीवुडी स्पून फिडींग - असे झोके घेतो सिनेमा. असं काॅंबिनेशन सहन होत नाही. बडजात्या. भट, शेट्टी, साजिद यांचे सिनेमे बघतोच की आपण प्रेमाने. ते हेतूशी प्रामाणिक असतात. Happy

'दॅट्स नाॅट मी' हॅड अ बिग स्टफ ॲक्चुअली. त्याचा उपयोग नाही करून घेता आला पण.
कोर्सीका भारी. पण त्या नशेत सेकंड हाफ गंडला.

'तमाशा' टायटल मात्र अचाट भारी आहे. दॅट्स टिपिकल इम्तियाज अली.