होणार सून मी ह्या घरची - ४

Submitted by कनिका on 26 October, 2015 - 11:03

तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल सगळ्यांनीच साखरेचे पोतेच खाऊन आपले संवाद म्हटले होते की काय...असेच त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते....केवळ गोड...गोड....आणि परत गोडच !!! कृष्णा साखरेचा पाकच झाली.

तरीपण हरकत नाही....मालिकेचा शेवट गोडच करायची ही रीत सर्वच निर्माते दिग्दर्शक आणि कथालेखक सांभाळतात, त्यामुळे इतपत साखर खपवून घेतली आम्ही.

मध्यंतरी एका संवादात सिमरनने तिच्या बॉफफ्रेशी लग्न केलं अस ऐकलं.>>> मागे पप्पु सरूमावशीला बघायला येतो त्यावेळी दाखवलेले फालतू विनोद पाहुन तेव्हापासुन मी ही मालिका बघायची बंद केली ती शेवटपर्यंत मला पुन्हा बघावीशी वाटली नाही. त्यामुळे मला त्या सिमरनने तिच्या बॉयफ्रेन्डशी लग्न केल्याचे माहित नव्हते.

कणेकरांच्या लेखात त्यांच्या नित्याच्या फटकेबाजीचा अनुभव येतोच....ती आता सवयच होऊन गेली आहे.

तरीही लेखातील सर्वात आवडलेले वाक्य एकच..."..शेवटचे दोनएक महिने या पाण्यामुळे मालिका पांचट झाली असली तरी मंडळींनी एकूण दर्शकांचं मन चांगलंच गुंतवून ठेवलं होतं हे मान्य करावंच लागेल. त्याबद्दल मनापासून धन्यवाद....".

हि मालिका संपणार असल्याची बातमी आली तेव्हाच बाबांच्या पायांचे ऑपरेशन मंदे आणि मकु विसरणार हे मला लक्षात आले. माझ्या इथल्या पोष्टी वाचुन तरी त्यांना ते आठवेल आणि काहीतरी होईल अशी भाबडी आशा मला होती. पण शेवटपर्यंत राहिलेच ते ऑपरेशन करायचे. बहुदा सिक़्वेलची सुरुवात त्याने करणार असतिल. मुळ मालिका त्याच ठिकाणी सुरु झाली होती ना?

बहुदा सिक़्वेलची सुरुवात त्याने करणार असतिल. >> वाटत नाही सिक्वेल काढतील.. उगाच प्रेक्षकांना घाबरवतायत.

नात मोठी होऊन (परत तेजुबाईच असतील) करेल ऑपरेशन. सिक्वलमध्ये ;).

ह्या माझ्या वाक्यावर फक्त अशोकमामा खुश होतील.

शेवटी २ महिने काय मामा. प्रेग्नंसी प्रकरण किती ताणले आणि त्याआधी मेमरी लॉस.

"मेमरी लॉस..." याबद्दल आपण काय बोलणार ? वैद्यकशास्त्राने त्याला रितसर मान्यता दिली असल्याने प्रकृतीच्या संदर्भातील तो एक सर्वमान्य आजाराचा घटक आहेच आहे. राहता राहिला प्रेग्नन्सी प्रकरणाचा प्रश्न. तर ती फेज नको तितकी ताणली गेली हे मी देखील मान्य करतोच. पण आपण त्याला काय करणार ? निर्माते आणि दिग्दर्शक, कथालेखिका यानीच अमुक इतके एपिसोड त्यावर खर्च करायचे ठरविले असणार, त्यानुसार घडत गेले.

बाकी सीक्वेल येईल असे वाटत नाही.

हा धागा वाहता झाला आहे काय?
२-३ दिवसांपूर्वी अल्मोस्ट २००० प्रतिसाद होते, आज ५८३ आहेत.

सत्यमेव जयतेचा मानसिक स्वास्थ्य या विषयावरचा भाग पाहताना एक ओळखीचा चेहरा दिसला.

https://www.youtube.com/watch?v=LIuw9MB3m7E

इथे २:०० पासून ऑडियन्समध्ये दिसेल.
६:३७ ला क्लोज अप आहे.

आता यांची किंवा यांच्या जवळच्या कोणाची परिस्थिती त्या कार्यक्रमात भाग घेण्यासारखी होती म्हणून ते तिथे आहेत की त्या कार्यक्रमाला स्टुडियो ऑडियन्स म्हणून अभिनय करू शकणार्‍यांना बोलावले जायचे असा प्रश्न पडला.

पिंट्या होता मागे सत्यमेव जयते मध्ये. रोहन गुजर वैयक्तिक पातळीवर सामाजिक काम करतो. मागे पेपर मध्ये वाचलं होतं. आदिवासी पाड्यात मुलांसाठी वगैरे करतो. खरंच त्यासाठी त्याचं कौतुक.

याची बातमी आ/झाली होती हे माहीत नव्हतं. रेकॉर्ड केलेल्या आणि पाहायचे राहून गेलेल्या कार्यक्रमांचा बॅकलॉग संपवत होतो, त्यात तो दिसला.

Pages