Submitted by सुप्रिया जाधव. on 15 September, 2015 - 23:19
संबंधांना ग्रहण लागले तू गेल्यावर
अंधाराचे राज्य माजले तू गेल्यावर
जी होती किंमत होती काळ्या पोतीला
बदनामीने हार घातले तू गेल्यावर
स्थैर्य सुबत्ता धैर्य चिकाटी अन सुखशांती
या सार्यांनी तोंड फिरवले तू गेल्यावर
देवतरी माझे गार्हाणे ऐकत होता
कानावरती हात ठेवले तू गेल्यावर
समानतेचे झेंडे मारे रोवत होते
स्त्री निव्वळ मादी हे कळले तू गेल्यावर
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
...
...