Submitted by vilasrao on 17 July, 2015 - 03:06
उद्दाम झाली ही श्रिमंती ,आमची तक्रार नाही !
जोही दिसे तो एकटा , कोणी कुणाचा यार नाही !
काळीज माझे रोज ती चोरून नेते हे खरे पण
सांगू कशाला? ठेवला मीही पहारेदार नाही !
घेतो न शपथा मी कधी ! कोणी तुला तक्रार केली ?
खोटे असावे बोलतो जे, यासहीआधार नाही !
ओसाड झाली माळराने अन फुले सारी गळाली
ही वादळे सांगून गेली का मला 'ती येणार नाही' ?
आभार कोणाचे कवी हा एवढे मानून गेला ...
की एवढा सन्मान कवितेलाच दारोदार नाही !
विलास खाडे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा