Submitted by मार्तंड on 9 July, 2015 - 02:38
किती शिल्लक आहे शल्य?
दिलस ना सोडून?
सहज विसरतात ...
डोळे मिटून आपल्याला हवी असणारी स्वप्ने डोळ्यात,
दिसली कि पूरे...!
मागे वळुन पाहण्याची तसदी नाही,
कुठलाही शोध नाही..
का मिटल्या असतील या पाकळ्या?
सुगंधाला जड़ झालयं का मन?
कि सवयीला अंतर द्यावं ,
अन आपलं आपण राहावं..
हि घालमेल सतावते आहे...
एक सांगू ..
बंद लिफाफयातल्या पत्रांमुळे,
आपल्यातला दुरावा फोफावत आहे..
उन्हामागून सावली अजूनही धावत आहे..
कुठे तरी थांबायला हवं,
विसाव्यालाच आता घरटं बांधायाला हवं..
दूरस्थ अंतराला जरा सांधायाला हवं.. !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा