देव भूमी.....(भाग-०१)

Submitted by manas on 3 December, 2014 - 02:38

तस पाहिले तर केरळ बाबत ख़ुप लोकानी आज पर्यत लिहल आसेल पण ..... तरीही मी एक प्रयत्न करतोय...पहा अआवडला तर जरूर सागा......
पदवीच्या शेवच्या वर्षाला असताना खोली घेऊन रहात होतो. वर्ष होत 2006..... तीन रूम पार्टनर आणि एक मी. कुणीतरी बातमी आणली कराडला पुस्तक प्रदर्शन भरलय... झालं.... ;लगेच रविवारी कराड... माझी तशी काही इच्छा नव्हती जायची पण रूमवर बसून तरी काय करणार म्हणून मी पण गेलो..... प्रदर्शन खुपच छान आणि मोठं होत.... बाकी तिघांनी बरीच पुस्तक खरेदी केली मी काही घेतलं नव्हतं.... पण अगदी शेवच्या दालनात आल्यावर एक पुस्तक नजरेस पडलं.... उचलून पुस्तकाच्या पाठीमागच्या बाजूवरील मजकूर वाचला.... ते निसर्ग वर्णनपर पुस्तक होतं... काहीतरी घ्यायचं तसेच पक्षी, प्राणी यांचं आकर्षण असल्यामुळे व पुस्तकाच्या पहिल्या पानावरच चित्र बघून पुस्तक खरेदी केल.......
.........पण ज्यावेळी हे पुस्तक वाचायला सुरवात केली त्यावेळी ते पुस्तक वाचतच रहाव अस वाटत होत.... ते संपूर्ण वाचून पुर्ण झाल्याशिवाय खाली ठेवूच नये अस वाटत होतं........... देवाने निसर्गाची मुक्तहस्ताने उधळण करून तयार केलेल्या पृथ्वीच्या पाठीवरील देवभूमी म्हणून ओळखल्या जाणा-या केरळ मधील एका संपुर्ण ऋतूचक्राचं त्यात वर्णन आहे.....
प्रचि-०१

हे पुस्तक वाचल्यापासून एकदा 'केरळला 'जायचं असं मनात पक्क ठरवलं होतं.........
त्यानंतर बराचं कालावधी गेला …. कालावधी कसला वर्ष...... शिक्षण झाल, नोकरी लागली...लग्न झालं....तोपर्यंत बराच काळ उलटून निघून गेला....पण केरळला जायचा काय योग येत नव्हता.... योग येत नव्हता म्हणण्यापेक्षा या संसाराच्या गाड्यातून आर्थिक गणित जुळत नव्हतं.... पण मनातून केरळ काही केल्या जात नव्हतं..... बाहेर फिरायला जायच तर पहील्यांदा केरळलाचं जायच अस पक्क ठरवूनच
टाकल होतं........
आणि एक दिवस उगवला आत्तापर्यंत मनाच्या एका कप्प्यात दाबून ठेवलेली ईच्छा पुर्ण होण्याच्या मार्गावर होती....... टूर एजन्सीचा शोध चालू झाला...... त्यात अनेक पर्याय होते...... अर्थात पहीलं नाव होत.....केसरी...त्यानंतर वीणा …. सचिन...अशी बरीच नाव होती..... इंटरनेटवर तासंतास घालवले....... त्यातून मग शेवटी काहीही होऊ.....पैसे फुकट गेले तरी चालतील... इतकच नव्हे तर शेवटी अक्कल विकत घेतली असं समजू असा विचार करून 'वीणा वर्ड' मध्ये बुकींग केली.........
तीन महीने आगोदर बुकींग केली...... पण आपल्या आयुष्यात पाच-दहा मिनिटांनी काय? घडणार आहे हे आपल्याला माहीत नसतं तर पुढल्या तीन महिन्यांचं काय घेऊन बसला आहात..... ब-याच अडचणी निर्माण झाल्या..... त्यातली एक म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या... आणि त्यात मला पी.आर.ओ. म्हणून डयुटी लागली...... सर्व स्वप्नांवर पाणी फिरण्याची वेळ आली ….. पण इच्छा शक्तीच्या पुढे कोणाचे काही चालत नाही.... ते खरं आहे.. एक मित्र बदली काम करायला तयार झाला आणि माझी सुटका झाली......
आयुष्यातल्या अत्यंत आनंदाच्या दिवसापैकी एक दिवस आखेर उजाडला दि.11.10.2014(शनिवार).... पनवेल रेल्वे स्टेशनवरून दु.1:00 वाजता नेत्रावती एक्सप्रेस.....मध्ये बसलो.....मी,पत्नी-अमृता,मुलगा-मानस,लहान भाऊ-अतुल व त्याची पत्नी-मोनिका (हा माझ्याच काय पण माझ्या कुटूंबाच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातला पहिला-वहीला रेल्वे प्रवास...)

प्रचि-०२

प्रचि-०३

दुस-या दिवशी 12 तारखेला रात्री 8:30ला त्रिवेंद्रमला पोहचलो.....स्टेशनवर पोहचलो तोपर्यंत पावसानेच आमचे स्वागत केल....आमच्या या भ्रमंतीवर आणखी एक चिंतेचं सावट होत ते म्हणजे हुद..हुद.. आमच्या स्वप्नांवर पाणी फिरवनार असं वाटत होतं.... पण आमची इच्छाशक्ती इतकी कि निसर्गाला सुध्दा नमतं घ्याव लागलं...... दहा....पंधरा मिनिटात पाऊस थांबला तो पुढच्या सात दिवसात कधीच परत आला नाही.......
पहीला मुक्काम होता तिरूअनंतपुरम....... तिथून दुस-या दिवशी सकाळी सात वाजता कन्याकुमारीसाठी जायचं होत..... हॉटेलवर गेलो... तो आमच्यासाठी एक सुखद धक्काच होता.... हॉटेल इतक मस्त होतं कि, आम्ही कधी कल्पना पण केली नव्हती....(थॅक्स टू वीणा...)

प्रचि-०४

प्रचि-०५

पहिल्या दिवशी.... कन्याकुमारीत दिवसभरात कन्याकुमारीमाता मंदीर...त्रि-समुद्र मिलन ...गांधी मंडप...आणि फेरी राईड टू स्वामी विवेकानंद स्मारक व ध्यान मंडप याचा आनंद लुटून संध्याकाळी पुन्हा त्रिवेंद्रम असा भरगच्च कार्यक्रम होता.....

प्रचि-०६

प्रचि-०७

प्रचि-०८(.गांधी मंडप...)

दस-या दिवशी.... त्रिवेंद्रम शहरामधील पद्मनाभ स्वामी मंदीराला सकाळी लवकर भेट दिली. तिथल्या रितीप्रमाणे संपूर्ण उघड्या अंगाने फक्त पारंपारिक लूंगी परिधान करून दर्शन घेतले.... विष्णूची आठरा फूट लांबीची मुर्ती तीन दरवाजातून पहावी लागते.. (आत्ता हे मंदीर जगात कुणासाठी अपरिचित राहीले नाही....असो......)

प्रचि-०९

त्यानंतर दुपार नंतर राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी... नेपिअर म्यझियम... व संध्याकाळी कोलम बिच असा कार्यक्रम झाला........

प्रचि-१०

प्रचि-११

प्रचि-१२ (कोल्म बिच....)

प्रचि-१३

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह छान !!! केरळ ला कधीपासून जायचंय.. सविस्तर माहिती लिहा म्हंजे नीट कल्पना येईल ,

तुम्ही प्रायवेट टूर घेतला होता का?? मोड ऑफ ट्रांसपोर्ट काय होते>> साधारण एक्सपेंस??

डी टूर् करता येते का?? सॉरी खूपच झालेत प्रश्न... आन्सर, ओन्ली इफ यू फील लाईक Happy

नेपियर म्युझियमच्याच परिसरात राजा रविवर्म्याच्या चित्रांचे एक संग्रहालय होते. ते अजुन चालु आहे का? गेला होतात का तुम्ही तिथे?
अजुन फोटो येवु द्यात. सुंदर आलेत सर्वच Happy

हा माझ्याच काय पण माझ्या कुटूंबाच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातला पहिला-वहीला रेल्वे प्रवास...)>>>>

@मानस - हे खरे आहे का? तुम्हा ४ जणांमधे इतक्या वर्षात तुम्ही कधीही रेल्वे प्रवास केला नव्हता?

फोटो छान आहेत. पण ती केशरी बॉर्डर काढणार का...फार त्रासदायक वाटतीये...
अर्थात त्यामागे काही विशेष कारण असेल तर राहू द्या

एक सल्ला- शक्यतो कुटुंबियांचे, महिला सदस्यांचे फोटो शेअर करू नका. इथल्या फोटोंचा गैरवापर केला जाऊ शकतो अशी माहीती आहे.

विशाल..... ते म्युझियम चालू आहे ..... तेही पहिले पण फोटों नाहित...
टोच्या..... हो खर आहे कधी संबंध आला नाही रेल्वे ने प्रवास करणेचा..... (गावी जयला सुद्धा बसने जावे लागते..