नाठाळाशी व्यवहार

Submitted by harish_dangat on 23 December, 2008 - 18:57

नाठाळाचे माथी , हाणावी काठी
द्यावी कानापाठी , तयाचीया

नाठाळाचे मुखी , सदा जन निंदा
नसे काही धंदा , तयालागी

नाठाळाचे मनी , वाईट विचार
तयाचा आचार , दुर्जनाचा

नाठाळासी कधी , घालू नये भिक
पाठीशी चाबुक , लावा त्याच्या

नाठाळासी सदा , माना नराधम
पाठवावा यम , तयापाठी

नाठाळा मानावे , गटाराची घाण
नाकासी दाबुन , पुढे जावे

नाठाळा मानावे , जन्माचा अधर्म
करीत कुकर्म , जन्म वाया

नाठाळाची काढुन , घ्यावी लंगोटी
गळा बांधुन घंटी, फिरवावा

नाठाळाशी कधी , करू नये क्षमा
तो असे काळीमा , कुळालागी

हरीश दांगट

गुलमोहर: 

>नाठाळाचे मायेचा , करावा उध्दार
तीचा व्याभीचार , फळा आला

हे काय आहे?? uhoh.gif कविता लिहिताना कोणाच्या आईचा उद्धार करायची गरज केव्हापासून पडायला लागली???

ही गरज खुप जुनी आहे. जेंव्हा जेंव्हा सहीष्णुतावादी लोक असतात, तेंव्हा तेंव्हा
नाठाळही असतात आणि त्यांना तीच भाषा समजते.

मला वाटलच होतं तुकारामांच्या अभंगांचा उल्लेख येणार! फक्त त्यांनी कोणाविषयीचा आकस गरळासारखा ओकलेला नाहीये इतकाच फरक! ज्या ओळी तुम्ही ठळक केल्यात त्या तुम्हीच परत एकदा वाचा. हरीनाम न घेणार्‍याविषयी तुकाराम महाराज बोलताहेत, त्यांना स्वतःला विरोध करणार्‍या कोणाला शिव्या घालत नाहीयेत एव्हढ लक्षात घ्या. सहसा मी इथल्या कोणत्याच कवितांविषयी वाईट वा टिंगलीवजा बोलत नाही, आवडलं नाही तर सोडून देते, वाचत नाही, पण म्हणून काहीही काय! तुकारामांचा सहिष्णुतावाद समजणं आणि तो प्रत्यक्षात उतरवण हे येरागबाळ्याचे काम नोहे हे कृपया समजून घ्या आधी.

मागे एकदा ज्ञानेश्वरीशी कवितांची बरोबरी झाली होती, आता तुकारामांशी! छान!

दान्गटसाहेब, अगदी तुकोबान्च्या अभन्गाचा दाखला दिला म्हणून काय झाले? कुणाच्या आईमाईचा उद्धार करणे, सन्तती नालायक म्हणून केवळ सन्ततीच्या आईच्या नावाने खडे फोडणे हे असन्स्कृतपणाचेच लक्षण मानले जाते, येवढेच नाही तर असे केल्याने करणाराही "नाठाळाच्याच पन्क्तिचा" होतो हे ही त्रिकालाबाधित सत्य हे!
शेवटी काय? सन्याशाची पोरे म्हणून वाळीत टाकणे काय की पोरग नाठाळ म्हणून त्याच्या आईलाच वेठीस धरणे काय, एकाच प्रवृत्तीची दोन अन्गे, असे वाटत नाही का?
त्यामुळे शेवटचे कडवे पटले नाही, पचले तर नाहीच नाही! असभ्य असन्कृत वाटले!
बाकि कविता चान्गली!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

<<त्यामुळे शेवटचे कडवे पटले नाही, पचले तर नाहीच नाही! असभ्य असन्कृत वाटले!
बाकि कविता चान्गली!>>

लिम्बुटिम्बु..पुर्णपणे अनुमोदन.

हरिशजी, क्षमा करा... पण तुकोबांना तो अधिकार होता. काया वाचे मने पुर्णपणे विठ्ठलाशी एकरुप झालेले महापुरुष किंवा दैवी पुरुष म्हणु हवे तर, विकार, वासना एकुणच भौतिक अवस्थेतुन पुर्णपणे मुक्त झालेले , देवत्वाला पोचलेले व्यक्तिमत्व होते ते. जगाकडे, आयुष्याकडे एका निर्विकार त्रयस्थपणे, अलिप्ततेने पाहण्याची पात्रता आपल्या वर्तणुकीतुन, विठ्ठलभक्तीतुन त्यांनी कमावली होती. त्यामुळेच सतत विठुरायाच्या नावाने बोटे मोडणार्‍या आवडाईबरोबरदेखिल सुखाने संसार करु शकले ते.
आपण सामान्य माणसे, आपला तो अधिकार नव्हे.

आणि आई ही कुणाचीही असो, कशीही असो ती वंदनीयच असते, तिला बोल लावण्याचा आपल्याला / कुणालाही अधिकार नाही.

असो, बाकी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा..तुमची "निंदकस्तुती" लक्षात ठेवा आणि लिहीत राहा.
चुका होतात, त्या मान्य करण्याची, सुधारण्याची तयारी असली म्हणजे झाले.

चु. भु. दे.घे.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

असे केल्याने करणाराही "नाठाळाच्याच पन्क्तिचा" होतो हे ही त्रिकालाबाधित सत्य हे!
सन्याशाची पोरे म्हणून वाळीत टाकणे काय की पोरग नाठाळ म्हणून त्याच्या आईलाच वेठीस धरणे काय, एकाच प्रवृत्तीची दोन अन्गे, असे वाटत नाही का?
>> लिंबूदादांना १००% अनुमोदन!
---------------------------------------------------------------------------
The only thing you take with you when you're gone is what you leave behind.

शेवट बदललात ते उत्तम. धन्यवाद. 'आई' ह्या नात्याविषयी/ व्यक्तीविषयी वाईट साईट वाचायला बरे वाटत नाही.. बाकी लिंबूदा म्हणतात तसे कविता चांगली वाटली. आताचा शेवट अधिक समर्पक वाटला.

हरिश,
इथल्या चर्चेवरून लक्षात आलं की तुम्ही कवितेचा काही भाग काढून टाकलाय. ते बरं केलंत.
बाकी कविता छानच आहे मात्रं. Happy

<<आईमाईवरून शिव्या द्यायलाच फक्त शिकले हे तुकारामांकडून बहुतेक. बाकीचं पालथ्या घड्यावरून पाणी. जाउदे आयटे शेवटी यांची लायकी तेवढीच. त्या पातळीला आपण उतरू नये हे खरं. >>
तुम्हाला फक्त एवढेच दिसले या कवितेत ? कागदावर पडलेला डाग स्पष्ट दिसणं साहजिक आहे, पण उरलेला शुभ्रपणाही पाहणं आपल्या हातात नाही का?

माफ करा, मंडळी पण चुका सगळ्यांकडुन होतात. त्या सुधारल्या जावु शकतात पण म्हणुन एका चुकीवरुन तेवढाच मुद्दा धरुन एखाद्याची लायकी ठरवण्याचा आपल्याला अधिकार आहे का? इथे कोण कोण कुठल्या कुठल्या पातळीवर उतरु शकतो हे गेल्या काही महिन्यात सगळ्यांनीच पाहिले आहे. तेव्हा एका व्यक्तीला दोष देण्यात काय अर्थ आहे. मला वाटते प्रत्येकाला एक संधी मिळायला हवी. आता तर त्यांनी आक्षेपार्ह भाग काढुनही टाकलाय्..मला मान्य आहे त्यामुळे झालेली चुक अगदीच क्षम्य ठरत नाही पण तुम्ही अनुभवी मंडळींनी जर मनावर घेतलं तर ते अशक्य नाही.

चु.भु.दे.घे.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

LOL!! rofl.gif
सॉरी हां,अगदी राहवलंच नाही मला! काव्यात्मक उणीदुणी!!

कविता लिहिणार्‍यांना रसग्रहणाचीही सक्ती करायला हवीये.
ह्यात शेवटचं कडवं जे तुम्ही डिलीट केलंत ते मला समजलंही नाही नी झेपलं तर मुळीच नाही.
नाठाळाच्या आईने व्यभिचार केला त्याचं असं फळ तिला मिळालं की नाठाळ लोकांच्या आया व्यभिचारी असतात असं म्हणायचं होतं तुम्हांला?

वरील दोन आळी मी काढल्या आहेत आणि ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांची माफी मागतो. मुळात त्या ओळी नको होत्या. मी भावनेच्या भरात पातळी सोड्ली व त्रास दिला
बद्दल क्षमस्व.

दुसर्‍याच्या आईस शिव्या देउ नये अशी अपेक्षा असनारांनी माझी अडाणी आई वापरते ते
शब्द भाषेची मोडतोड करतात असे म्हणु नये. पुन्हा पातळी सोडयची गरज पडनार नाही.

-हरीश

विशाल कुलकर्णी,
हो मला तेवढंच दिसलं. बाकी कवितेत काही त्यांचं स्वतःचं किंवा ओरिजिनल अज्जिबात वाटलं नाही. ओरिजिनल फक्त तेवढंच होतं ते दिसलं.

बाकी शेवटचं पोस्ट बघता. पातळीचा मुद्दाच महत्वाचा आहे हे कळलंच.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

पडनार ?? "पडणार" लिहा हो. मराठी कवी ना तुम्ही?
---------------------------------------------------------------------------
The only thing you take with you when you're gone is what you leave behind.

एssssss दोन्ही पार्टीज, आता बास! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु