कालिदासाच्या काळात फेसबुक असतं तर ...?
तर काय..
तो ही बसला असता दिवसभर 'ऑनलाईन' तुमच्या -आमच्या कवींसारखा !!
त्याचं एक -एक महाकाव्य फेसबुकवर पोस्ट करता करता त्याची हयात गेली असती ..
आणि त्याच्यावरच्या लाईक अन् कमेंटांचे हिशोब करता करता त्याचे केस पांढरे झाले असते !
आणि 'मेघदूत..'
'मेघदूत' लिहायचा विचार कॅन्सलच केला असता त्यानं..!
त्याऐवजी 'फेसबुकदूत' लिहिणं पसंत केलं असतं त्यानं !!
कालिदासानं त्या शापीत गंधर्वाच्या प्रियेच्या प्रोफाईलची रसभरीत वर्णने केली असती ..'जिची प्रोफाईल सुंदर-सुबक फोटोंनी सजली आहे, जिच्या प्रत्येक फोटोवर कमस-कम शंभर लाईक येतात आणि जी दिवसभर ऑनलाईन असते'
आणि त्या महाकाव्यातला शापीत गंधर्व आपल्या प्रियतमेशी ऑनलाईन चॅट करताना म्हणाला असता ,"विरहात व्याकुळ-बिकुळ व्हायचं नाही,प्रिये !आत्ता येतो मी !तोपर्यंत तुझ्यासाठी पोस्ट केलेली खमंग कविता वाच !!"
खरंच कालिदासाच्या काळात फेसबुक असतं तर ....???
कल्पना मस्त आहे. पण इतकं
कल्पना मस्त आहे. पण इतकं त्रोटक लिहिण्यापेक्षा एक छान खुसखुशीत, विनोदी लेख लिहा ना.
धन्यवाद मामी, जमल्यास extend
धन्यवाद मामी, जमल्यास extend करणारच आहे मी .
नहि जमल
नहि जमल