चारोळ्या

Submitted by Anvita on 8 November, 2013 - 08:44

खूप वर्षांपूर्वी काही चारोळ्या लिहिल्या होत्या .

काही माणसाच्या बाबतीत
आपले अंदाज किती चुकतात
सूर्याची कल्पना करावी
तर ते काजवेच निघतात

चालून चालून पाय थकले
कि मग थांबावस वाटत
भूतकाळाच्या पानावर
आठवणींच दव साठत

पैशांमागे धावताना
मी किती गमावलं
हाही एक प्रश्नच आहे
कि मी किती कमावलं

मी, माझे करता करता
सगळ आयुष्य सरलं
आपण आपले म्हणायला
आयुष्याच कुठे उरलं

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही माणसाच्या बाबतीत
आपले अंदाज किती चुकतात
सूर्याची कल्पना करावी
तर ते काजवेच निघतात<<व्वा !