Submitted by जयदीप. on 24 September, 2013 - 22:31
चालून वाट झाली, गेलो कुठेच नाही
भोगून भोग झाले, उरलो कुठेच नाही
काळोख सुर्य झाले, विझले दिवेच सगळे
का आज काजवेही, उरले कुणीच नाही
जाळून खास गेले, ते ऊन चांदण्यांचे
सांभाळयास काया, उरली मुळीच नाही
बेघर उदास किल्ले, ते बुरुज मोडलेले
अवशेष वैभवाचे, उरले कुठेच नाही
ती सांजवेळ गेली, ती रातही उलटली
ती धुंद स्वप्नवेडी, कोठे उषाच नाही
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा