नाती मनाची प्रेमाची अन विश्वासाची
काही नाती हि फक्त दोन अक्षांरा पुरतीच मर्यादित असतात . त्यात आपलेपण हा नसतोच .
साध्या - छोट्या अपेक्षा हि जिथे पूर्ण करता येत नाहीत ते नातं कसल ते असूनही मृत असल्यासारखंच .
खर तर अपेक्षा ह्या करूच नये , पण पण साध्या छोट्या अपेक्षा हि करू नये का ?
बर ह्या अपेक्षा हि कुणाकडून हि नसतात , त्या आपल्याच माणसांकडून असतात . पण त्या हि काही वेळा पूर्ण होत नाही . अशा वेळेस थोडस निराशपण येतंच , पण म्हणून त्या व्यक्तीला दोष देण हि योग्य नाही . जे नशिबात आहे ते आहे . पण तरी हि ...
काही सेकंदासाठी का होईना ,
आपल्या व्यक्ती साठी आपल्या बिझी शेड्युल्ड मधून थोडा वेळ हा काढावा. ५ मिनिट का होईना थोडं बोलाव , कधीतरी भेटाव ..., मी म्हणत नाही वारंवार फोनवरच राहावं , प्रत्येकवेळी भेटाव - भेटत राहावं ...पण कधी तरी ..केव्हातरी ... या इवल्याश्या मनाला दिलासा ...
खर तर ...
एकमेकांच एकमेकांवर मनापासून प्रेम असेल , एकमेकांविषयी ''आपलेपणाची'' भावना दृढ असेल, आणि जिथे सामंज्यस पणाची जाणीव असेल तेच नातं खरया अर्थानं ''विश्वासाचं नातं' असत .
आणि त्या नात्यात प्रसन्नतेच तेज कायम झळाळत राहत.
अहो ,
नाती आहेत म्हणून आपण आहोत , आपण आहोत म्हणून आपलेपण आहे , एकमेकांवर प्रेम आहे .
मनातले काही ..
नातं तुझं माझं..
संकेत य पाटेकर
१६.०९.२०१३
प्रयत्न चांगला आहे. माझी आई
प्रयत्न चांगला आहे. माझी आई म्हणते कि आपण कशाची अपेक्षा करु नये. अपेक्षा केली कि निराशा पदरी पडते.
.
प्रयत्न चांगला आहे. माझी आई
प्रयत्न चांगला आहे. माझी आई म्हणते कि आपण कशाची अपेक्षा करु नये. अपेक्षा केली कि निराशा पदरी पडते.
.
हो बरोबर ..
हो बरोबर ..