सुरुवात
Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
5
कुठुन कशी होते सुरुवात
अवचित नव्या वाटा गवसतात
नकळत अनोळखी दिशा
परिचयाच्या होऊन जातात
नवीन दारे उघडतात
जुनी मिटून जातात
आठवणीखेरीज दीर्घकाळ
टिकत नाही कुठलच
सुख वा दुख!
कमी अधिक फरकाने
सुरुच असतात
घडत जाणारे बदल.
जोवर हवे असतात
स्विकारले जातात
असे हे बदल
तोवर सर्वकाही
ठिक ठिक आहे...
बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्त आहे, आशयपूर्ण.
मस्त आहे, आशयपूर्ण.
तोवर सर्वकाही ठिक ठिक
तोवर सर्वकाही
ठिक ठिक आहे...
सुंदर वळण कवितेला... मस्तय
आवडली. बी, खूप साधं सरळ आणि
आवडली. बी, खूप साधं सरळ आणि म्हणूनच छान लिहीतोस तू.
धन्यवाद. खूप छान वाटत कुणी
धन्यवाद. खूप छान वाटत कुणी आपण लिहिलेल वाचल की. खरी प्रेरणा वाचकच असतात बहुतेक वेळी.
पहिल्या सहा ओळी सुंदर आहेत
पहिल्या सहा ओळी सुंदर आहेत .. चांगला प्रयत्न प्रयत्न बी !