भोलागडी ....................! भाग ५ अंतीम...........................

Submitted by श्रीमत् on 16 September, 2012 - 04:17

प्रिय वाचक मित्रहो,
कथेचा शेवटचा भाग उशीरा टाकत आहे त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो.
श्रीमत्
मागील भाग वाचण्यासाठी खालील धाग्यांवर टिचक्या मारा.

भाग १ http://www.maayboli.com/node/37250
भाग २ http://www.maayboli.com/node/37349
भाग ३ http://www.maayboli.com/node/37569
भाग ४ http://www.maayboli.com/node/37739

झाला प्रकार दुसरयाच दिवशी पाटलाने सर्वांना कथन केला. आता देव कोपला तरी चाललं पण आपण काय त्या भोलागडीत आणि ऋषी आईच्या घळीजवळ फिरकणार नाही ज्याला जमल त्यानं करावं हे. देनबा मात्र काही घराच्या बाहेर पडला नाही. गड्याने धास्ती घेतली कालच्या प्रकाराची तापाने फणफणला नुस्ता. झाल्या प्रकारांमुळे समध्या लोकांना आता भीती वाटु लागली होती. यात्रा भरायला चारच दिवस उरले होते. गावासाठी आत्तापर्यंत फक्त एकच गोष्ट चांगली घडत होती ती म्हणजे अजुनही कोणाचा बळी गेला नव्हता.

आबा आपल्याप्रमाणे सर्व लोकांची समजुत घालत होते. परंतु ते पण झाल्या प्रकारांमुळे अस्वस्थ झाले होते. त्यात सकाळीच तालुक्याहुन काही लोक नानु गुरवाला बघुन आले होते. ते सांगत होते नानु गुरव मध्येच डोळे फिरवतो. काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला अजुनही बोलता येत नाही. मग डॉक्टर्स सलाईन मधुनच त्याला गुंगीच औषध देउन झोपवतात.

ईकडे अशोक सकाळीच कुणाला न सांगताच घरातुन निघुन गेला होता. आबांनी त्याबद्दल बायकोला विचारल असता त्यांनी सांगितल, "काय न्हाय, म्हणाला बस आजची रात्र शेवटची उध्या उलगडा होईल सर्व गोष्टींचा.
"कसला उलगडा? आबासाहेबांनी विचारल,
"ते तुमच्या सुपुत्राला इ्चारा! काय नीट समजावल तर ना.
आबासाहेबांच्या डोक्यात आता विचारांच न उलगडणार कोड सुरु झालं.

रात्री जेवंण वैगरे आटपुण तात्या सोफ्यात जोरात येरा-झार्‍या घालत होते. परंतु काही केल्या त्यांच्या विचारांची चक्र थांबत नव्हती. त्यांना आता सार कळुन चुकल बस अजुन किती दिवस लपवणार आपण गावापासुन, सुमणची आई गेल्यापासुन आपणच हिला लहाणाच मोठ केलं, तिला काय हवय नको ते पाहिलं. आजपर्यंत जिच्या साठी कमावल तिच पोरगी जर अशी वेड्यासारखी वागत असेल तर काय फायदा? आज नानु गुरव मरता मरता वाचला, पाटील आणि देनबाने पण याची प्रचीती घेतली. कदाचित उद्या आपली पाळी येइल. नको.. नको… बस आता हा पाठशिवणीचा खेळ यावर आता एकच उपाय, उद्या सार्‍या गावासमोर आपल्या गुन्हाची कबुली द्यायची. विचाराच्या गर्तेतच त्यांना झोप लागली.

दुसर्याच दिवशी सकाळी अशोक घरी परतला. परंतु यावेळेला त्या्च्या बरोबर मास्तरांची दोन लहाण मुलं पण होती. त्या अजाण मुलांना आपले आईवडिल दुर कुठेतरी गेलेत एवढच माहीत होतं. अशोकच्या आईनेच त्यांना आंघोळ पांघोळ घालुण त्यांची न्याहरीची व्यवस्था केली. दरम्यान आबासाहेब आणि अशोक सोफ्यात काहीतरी गहण चर्चा करण्यात दंगले होते. इतक्यात देण्या बुवा सांगावा घेऊन आले.
“आबा हायत का घरात?
"अरे कोण हाय?, "देण्या ये. "आत ये. चहा घे ये बस.
आबा चहाच नंतर बघुया आदी मंदीरात चला तात्या सरपंचान मीटींग बुलावलीया आण जोडीला पंच आणि पोलीस पाटील बी हायत. आर पण आस झाल तरी काय? त्ये मला काय बी माहीत न्हाय फकस्त एवढीच खबर लागलीया की गावात जे काय अघटीत चाल्लया त्यासंबधी त्ये काय तरी खुलासा करणार हायतं. मी येतो. तुमी बी लवकर निघा.
"आणं वईनी, ही पोर कुणाची हायती? "ते पण तुम्हाला आजच कळल काका. अशोकने हसतच चहाचा घोट घेतला त्याच्या डोळ्यात आज वेगळीच चमक दिसत होती.

मंदीराच्या भोवताली सारा गाव जमला होता. चौथर्यावर तात्या सरपंच त्यांच्या मागे सुमण, पोलीस पाटील आणि गावचे पंच तर उजव्या बाजुला आबासाहेब आणि अशोक.काहीस चाचपडतच तात्यांनी बोलण्यास सुरवात केली. नेहमी बोलताना ताठ असणारी मान आज मात्र नजरेणेच खालची माती उकरत असावी असं वाटत होतं.

"समस्त ग्रामस्थ मंडळ, मौजे बोरणे, मी..........! मी........! मनापासुन तुम्हा सर्वांची माफी मागतो. सारा गाव काणात प्राण ओतुन तात्यांचे शब्द ऍकत होता. तात्यांनी एक मोठा आवंढा गिळला. आणि ते बोलु लागले. "मी आणि नानु गुरवाणेच मिळुन मास्तर आणि त्यांचा बायकोचा खुन केलाय.

क्षणार्धात गावकर्‍यांत चलबिचल माजु लागली. पंचासह सर्वजण तात्यांच्या या कबुली जबाबावर अवाक झाले. पंचापैकी एकजण बोलला "तात्या तुम्ही हे काय बडबडताय तुम्हाला कल्पणा आहे का?
"तुम्ही खुणासंदर्भात बोलताय तेही एक नव्हे तब्बल दोन दोन खुणांविषयी, ह्याचे परिणाम माहीत आहेत का तुम्हाला? "की तुम्ही कसल्या दबावाखाली हे असले विधान करताय?

"नाही नाही, "मी एकदम खर बोलतोय. "मी माझा खोटा स्वाभिमान लपवण्यासाठी आजतागायत तुम्हा सर्वांच्या डोळ्यात धुळ फेकत आलो. तुमच्या विश्वासाचा मी बळी घेतलाय. मला खरच फार पश्चाताप होतोय या सर्वांचा. माझ्या सारख्या करंट्याला नरकात पण जागा मिळणार नाही.

"अहो तात्या काय करुण बसलात तुम्ही, काय नव्हतं तुमच्याकडे? पैसा, अडका, प्रतिष्ठा आणि सोन्यासारखी एकुलतीएक मुलगी मग का केलतं तुम्ही हे सारं? आबा म्हणाले".

"सांगतो सर्व सांगतो. मला नानु गुरवाने सांगितल होते. येत्या आमावस्येला भोलागडीत जाऊन जर नरबळी देशील तर सत्ता आणि पैसा दोन्ही तुझ्या पायाशी लोळण घेईल. सुरवातीला मन मानायला तयार नव्हतं पण नंतर नानु गुरवाने मला पटवुन दिल की बघा रेड्याचा बळी जवापासनं बंद झालाय तवा पासनं काय बी तुमच्या मनासारख व्हत न्हायं सारी लोकं त्या आबाच्या मागं लागलेली असत्यात.
लोकास्नी ना ॠषी आईची महती पटत ना भोलागडीची मग आपला मीटर कसा चालु राहणार? मला पण त्याच म्हणन पटु लागलं. त्यात आदीच आबासाहेबांनी आमची मत झुगारुन मास्तराला भोलागडीच्या वाटंवर राहायला जागा पण दिली होती. सुरवातीला मी पाटलाला नी देनबाला भोलागाडीबाबत काय बाय सांगुन मास्तराला घाबरावयचं बघितल पण मास्तर भलताच चतुर आणि धीट निघाला.
"म्हणाला मी काय आता गावं सोडुन जाणार नाही. हीच अंधश्रध्दा मला आणि आबासाहेबांना गावातुन हद्दपार करायची आहे. मी काय त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही. हा कोण कुठचा मास्तर तात्या सरपंचाच बोलणं झिडकारुन आबासाहेबांच गुण गायाला लागला आमच्या समोर.

बस मग ठरल मास्तराचाच काटा काढायचा. म्हटल ह्यातल काय कळल तरी भोलागडीवर बील फाडता येइल. त्यादिवशी रात्री मास्तर त्याच्या बायकोबर गप्पा मारत बसला होता. तेव्हा मी आणि नानु गुरव पुर्ण तयारीनिशी त्याला तिकडे बोलवायला गेलो. तेव्हा कळलं मास्तर दुसर्‍या दिवशीच पोरांना आणायला जाणार आहे म्हणुन. आम्ही त्याला म्हटलं मास्तर तयारी नंतर करा आधी आमच्या बरोबर चला. आबासाहेबांनी तातडीने बोलावलय.

"एवढ्या रात्री? काही अतिमहत्वाचे आहे का? मास्तराने विचारल!
"तसंच समजा हव तर. नानु गुरव बोलला.

त्यांने आपल्या बायकोला येतो गं म्हनुन शेवटचा आवाज दिला. मग आम्ही त्याला आबासाहेबांच्या घराकड न नेता भोलागडीच्या दिशेने घेऊन जाऊ लागलो. आता मात्र मास्तराची पावल जड पडायला लागली. बांबरावर पोहचलो तोपर्यंत आमच्या आधीच दोन काळी धिप्पाड पारध्याची पोर तिथ येऊन उभी होती. त्यांनी बांबराच्या समोर व्यवस्थीत गुरवाने सांगितल्या प्रमाणे तयारी करुन ठेवली होती. मास्तराला नक्कीच काहीतरी वाइट घडतय याची चाहुल लागताच. पटकन आपल्या खिशातुन त्याने मोबाईल काढला आणि अशोकला फोन केला. पण आमच नशीब चांगल. तो पुढे काही बोलणार ईतक्यात त्या दोन पारध्याच्या पोरांपैकी एकाने त्याच्या हातातुन मोबाईल हिसकावुन घेतला. आणि कोयत्याने वार करुन तिथेच संपवला मास्तराला. मग नरबळीची पुजा संपवुन त्याच्या प्रेताच्या गळ्यात भला मोठा दगड बांधला आणि दिला तळ्यात टाकुन. त्यानंतर आम्ही सर्व पुन्हा मास्तराच्या घरी आलो तर त्याची बायको वाट बघत बसली होती. आम्हाला समोर बघताच ती नाना प्रश्न विचारु लागली. मग आम्हाला कळलं हिला जिवंत सोडल तर आपली कायं खैर नायं. मग पुरावा संपवण्यासाठी तिला पण संपवल गळफास लाऊन. समोर मरण बघताच जाम घाबरली होती बिचारी. सतत विनवनी करत होती. माझ्या पोरांसाठी तरी सोडा मला. पण आमच्याकडे पर्याय नव्हता. एक बळी लपवण्यासाठी आम्ही दुसरा बळी दिला होता.

तात्यांच्या खुलाश्याने भर दिवसा गावकर्‍यांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. त्यांना त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. ज्या नानु गुरवाच्या शब्दाला आपण ॠषी आईचा शब्द मानुन चालत आलो. ज्या तात्यांना सरपंचपदाच्या निवडनुकीत बिनविरोध निवडुन दिलं त्यांनीच असा घात करावा. म्हणजे एवढे वर्षं देवाच्या नावाखाली निव्वळ आपली फसवणुक झाली. एवढ्यात आबासाहेब उठले आणि सरपंचाना उद्देशुन म्हणाले. सरपंच काय होत्याच नव्हत करुन बसलात तुम्ही. मी कधीच तुमच्याशी इर्षा बाळगली नाही नेहमी गावाच्याच भल्याचाच विचार केला. त्याचाच परिणाम म्हनुन गेल्या काही वर्षात सोन्याचे दिवस आले गावाला. पण तुमच्या अशा पाताळयंत्री कारस्थानामुळे गावाच नाव धुळीला मिळालं आज. पण मला एक गोष्ट कळत नाही तुम्हाला अचानक ह्या सर्व गोष्टींचा खुलासा करवासा का वाटला?

तात्या काही बोलणार ईतक्यात सुमनच म्हणाली, "मी सांगते आबासाहेब.

"मी तात्यांच आनि गुरवांच बोलण एकदा चोरुण ऐकल होतं. एकल्यानंतर माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मग तात्यांना धडा शिकवण्यासाठी मीच हे वेडेपणाच नाटक करायच ठरवलं. आपल्या स्वतच्याच हाताला चटका बसला की कसं जळजळतं हेच मला त्यांना दाखवुन द्यायच होतं आणि ते यशस्वी ही झालं. तात्यासाहेब माझे वडील असले म्हणुन काय झालं असल्या नराधम बापाची मुलगी म्हणुन जगण्यापेक्षा मी बांबरात उडी घेईन.

तात्यांनी त्यांच्या मुलीकडे आसवांनी भरलेल्या करुन नजरेणे पाहिले. तशी सुमन ने मान फिरवली.
एवढ्यात अशोक ने बोलण्यास सुरवात केली, "तात्यासाहेब मला फार पुर्वीच ह्या क्रुत्याची कल्पणा आली होती. कारण मास्तरांच्या गायब झाल्यानंतर, त्यांच्या शेवटच्या कॉलच्या टॉवर लोकेशनची माहीती मी मिळवली आणि ती आपल्याच गावचा पत्ता सांगत होती. त्यामुळेच मला या गोष्टींचा जास्तच संशय आला, आणि मग मी त्याचा पाठपुरवठा केला. मग विचार केला ज्या भीतीचा तुम्ही ईतके वर्ष वापर केला त्याच भीतीने तुमचा काटा काढायचा. मग गावातले आम्ही दहा-बाराजण एकत्र आलो आणि पहिलं भोलागडीच्या रस्त्यावर नानु गुरवाला टार्गेट केलं. मग त्यानंतरच्या बैठकीत आमच्या मानसांकडुन कळालं की देनबा आणि पाटील घळजवळ जाणार आहेत. मग ऋषी आईजवळ पाटील, आणि शेवटी तुम्ही. त्या किंचाळ्याचे आवाजही आम्हीच इंटरनेटवरुन डाऊनलोड केले होते. आणि काल रात्री पण आम्हीच मंदीराजवळ दबा दबा धरुन बसलो होतो. किंचाळीचा आवाज एकुण तुम्ही सुमन पाठोपाठ मंदीराकडे येताना दिसलात मग आम्ही ही संधी दवडायची नाही असे ठरवलं. निरनिराळे आवाज आणि प्रोजेक्टरचा वापर करुन आम्ही तुम्हाला घाबरवलं तुम्ही थेट घरी पळालात. आणि आज ईथे उभे आहात आरोपीच्या पिंजर्‍यात.आज तुमच्यामुळेच मास्तरांची पोर अनाथ झाली आहेत. तात्यांच्या तोंडुन शब्दही निघत नव्हता. पंचांनी त्यांचा जबाब नोंदविल्यानंतर रीतसर सर्वांच्या सह्या घेण्यात आल्या. पोलीस पाटलाने सर्व कागदपत्र गोळा करुन तालुक्याच्या पोलीस ठान्यात वर्दी दिली. पोलीसांची अटक होताच तात्यांना आपले अश्रु अनावर झाले ते आबांजवळ गेले आणि फक्त दोनच शब्द म्हणाले माझ्या सुमनला अंतर देऊ नका……!

आपल्या वडिलांना असं आरोपी झालेल पाहुन सुमनच्या डोळ्यातुन अश्रु वाहु लागले. कसही झालं तरी जन्मदाते वडील होते ते आईच्या निधनानंतर त्यांनीच तिचं संगोपण केल होतं. सुमणला असं रडताना पाहुन आबा तिच्या जवळ गेले आणि म्हणाले, "पोरी मला तुझ्या धैर्याच कौतुक वाटतय स्वताच्या जन्मदात्या बापालाही त्याच्या चुकीची शिक्षा द्यायला तु कचरली नाहीस. बस आता तु कुठेही जायच नाहीस चल माझ्याबरोबर. सुमन, आबासाहेब आणि अशोक तिघेही घरी आले. मास्तरांची दोन्ही मुल जेवुन शांत झोपली होती. तर मंगलबाई शेजारीच त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवत बसल्या होत्या.
त्यांना त्या दोन चिमुकल्या जीवांकडे बघुन गलबलुन येत होतं.

जेवणं झाल्यानंतर सर्वजण माडीवर शांत गप्पा मारत बसले होते. थोड्याचवेळापुर्वी अशोकचे मित्रही येऊन त्यांच्या बैठकीत सामील झाले होते.

मग आबासाहेबांनीच विषयाला हात घातला. अरे पोरांनो तुमच्या हुशारीच आणि धाडसाच कौतुक केल पाहिजे. नाहीतर अशी भीतीदायक कल्पणा वापरुन खुद्द आरोपीलाच बोलत करायच म्हणजे खरच कठीण काम. पण मला एक सांगा तुम्ही नानु गुरवाला अस काय केलतं? ज्याने तो सरळ इस्पितळातच भरती झाला.

"आबा खर सांगु! "श्याम्या" बोलता झाला. त्यादिवशी अशोकने ठरवल्याप्रमाणे आम्ही शाळेच्या बाजुला “किंकाळीची” व्यवस्था करुन ठेवली. पण स्वतः अशोक काही त्यादीवशी आलाच नाही. मग आम्हीच इमानेइतबारे किल्ला लढवायच ठरवलं. मी सुर्‍या आणि रमेश बरोबर मास्तरांच्या घराकडं गेलो. तर तिथ आधीच रांगोळी वैगरे काढुन ठेवली होती. आणि आत दिवा पण लावला होता. आम्हाला वाटल अशोकने अगोदरच सर्व तयारी करुन ठेवली असावी मग आंम्ही निसटलोच तिथुन. आणि पुढचा प्रकार सर्वांना माहीतच आहे.

"अरे काय माहीत आहे? "अशोक सांगु लागला, मी तर त्यारात्री भोलागडीच्या दिशेने फिरकलोसुद्धा नव्हतो. त्यात जर तुम्ही तिथुन निसटला होतात. मग नानु गुरवाला कुणी घाबरवलं? त्याने अस काय पाहील? उलट दुपारीच तात्यांचा खुलासा ऐकल्यापासुन माझं मन बैचेन झालंय. आदल्या रात्रीच मला बांबरावरुन विचित्र स्वप्न पडले होते. अशोकने आपल्या भीतीदायक स्वप्नाविषयी सर्वांना सांगितलं.

"मला तर काहीच कळत नाहीये. "रमेश पुढे बोलु लागला, आमचं कौतुक तर सोडाच आम्ही नेहमी तिघे चौघे बरोबर फिरायचो पण ही सुमण तर वाघीन आहे. कालच्या रात्री किंकाळीचा आवाज येऊन गेल्यानंतर कोणीतरी बाई काळी साडी घालुन बिनधास्त भोलागडीच्या दिशेन चालली होती. नक्की काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी जेव्हा सुर्‍या बाहेर पडु लागला तेव्हा कोणीतरी येण्याची चाहुल लागली पाहील तर तात्या दबकत दबकत त्या बाईचा पाठलाग करत होते. आणि ती बाई दुसरी तिसरी कोणी नसुन त्यांची मुलगी सुमन होती. तिचा तो अवतार पाहुन खरच आमचा धीर झाला नाही तिला थांबवण्याचा. इतक्यात मध्येच भोलागडीच्या दिशेने जोरात कोल्हेकुई ऐकु आली आणि जोरात वारा वाहु लागला तसे आम्ही चपापलो पुन्हा सावध होऊन पाहील तेव्हा सुमन तिथे नव्हती. मग आम्ही मात्र प्रोजेक्टरचा वापर आणि निरनिराळे आवाज करुन तात्यांना पळता भुई थोडी केली. घाबरुन तात्या जोरात घरच्या दिशेने पळत सुटले.

त्याचवेळेस अशोक इतर मावळ्यांबरोबर घळीजवळ दबा धरुन बसला होता. त्या सर्वांनी तिथे अशी काय वातावरण निर्मिती केली होती की पाहनार्‍यास वाटावे की साक्षात भुतंच आपल्यासमोर नाचत आहेत. पाटलाची चांगलीच तंतरली होती. त्यात रिंगणात बसलेल्या संज्या ने जेव्हा "सावज............... आलयं असा आवाज दिला तेव्हा तर पाटील भोवळ येऊन पडायचाच बाकी होता. गडी एकदम तुफान एक्स्प्रेस सारखा धावत सुटला गावाकडं.

"पण एक गोष्ट आम्हाला कळली नाही ती म्हणजे देनबाने असं काय पाहील? ज्यामुळे तो बेशुध्द होऊन पडला. दुसरया दिवशी काही विचारलं तर काही बोलायलाच तयार नव्हता. पण त्याच्या डोळ्यात मात्र विलक्षन भिती दिसत होती.

हे बघा काही कोडी न सोडवनेच चांगली असतात.नाहीतर उगाच गुंता वाढत जातो. "आबासाहेब बोलु लागले, मला आमच्या सैन्यातल्या एका अधिकार्‍याचे एक वाक्य नेहमी आठवते. प्रत्येक आघाताला प्रतिआघात होतोच. ज्यांनी केल त्यांना त्यांची शिक्षा मिळालीच. त्यामुळे काय दिसल? कसं दिसलं? ह्याच्या कथा रंगवण्यापेक्षा जत्रेच्या तयारीविषयी बोला. नाहीतरी लोकांची भिती कमी होण्यापेक्षा अजुन वाढेल. चला मी आता झोपतो. मला सकाळी तालुक्याला जायच आहे.

आबा आत मध्ये गेले तसे एवढा उशीर अवघडुन बसलेली सुमन सावरुन बसली. तिने समोर पाहीले तर अशोक तिच्याकडेच बघत होता. देनबाने काय पाहील हे मला माहीत आहे. सुमन आता काय उलगडा करणार म्हणुन सर्व उत्सुकतेने कान देऊन एकु लागले.

"सुमन सर्वांकडे पाहुन बोलु लागली. " एक तर त्या रात्री मी मंदीराजवळ आलेच नव्हते. मी घराच्या बाहेर पडले तसा मला कडी लावण्याचा आवाज एकु आला. मला कळालं की तात्या माझ्या मागे येतायत मी पटापट चालत पुढे गेले आणि आधी वाड्याला वळसा मारुन वर गेले आणि घळीच्या वाटेने परत खाली जात होते. चांदण्यात सार स्पष्ट दिसत होतं त्यामुळे जरा कमी भीती वाटत होती. इतक्यात समोरच्याच दगडावर कुणीतरी आमच्या वाड्याच्या दिशेने पाहात बसलं होतं नीट निरखुन पाहीलं तेव्हा कळालं हा तर साबळ्याचा देनबा. मग मी न घाबरता पुढे गेले आणि त्याच्या पाठीवर हात ठेवला. तसं आधीच घाबरलेल्या देनबाने मागे वळुन पाहीले. आणि डोळे मोठे करुन तिथेच बेशुध्द होऊन पडला बिचारा. मी जाम घाबरले होते. कदाचित माझा पेहराव पाहुन देनबा काहीतरी वेगळच समजला असावा. इतक्यात वर झाडीत अस्पष्टशी सळसळ जाणवली. बहुतेक कुणीतरी जोरात पळत खाली येत असावं. आणि खाली आबा धापा टाकत वाड्याकडे येताना दिसत होते. मग मी वेळ न दवडता घरी सटकले आणि झोपायच सोंग घेतल. जणु काही झालचं नाही.

आता पुन्हा नवीनच तिढा निर्माण झाला होता. हे सर्व आपण केल की आपल्याकडुन कोन करुन घेत होतं? जर सुमन वाड्याजवळ होती तर मंदीराजवळ कोण होतं? की खरोखरच मास्तर आणि त्यांच्या बायकोचा आत्मा.................? मंगलाबाई पोरांजवळच पहुडल्या होत्या. इतक्यात माडीवरचा दिवा लुकलुक करु लागला. बाहेर जोरात सोसाट्याचा वारा सुटला तसं माडीचं तावदान खडकण आतल्या भिंतीवर आदळलं तसे आतमध्ये बसलेले सर्वजण आपआपल्या जागेवर सावरुन बसले. अशोकने तोंडावर बोट ठेऊन हातानेच सर्वांना गप्प बसण्यास सांगितले. बाहेर सुन्न पसरलेली शांतता आणि तिला छेदणारा वारा यापलीकडे कसलाच आवाज नव्हता. वार्‍याच्या झोताबरोबरच दोन पांढर्‍या आक्रुत्या वेगाने आतमध्ये आल्या आणि जिथे मुल झोपली होती तिथे गेल्या. एक दोन-तीन मिनिटेच झाली नसतील की तडक वीज लपकावी तश्या त्या नाहीश्या झाल्या. मगापासुन चाललेल्या संवादापेक्षा आत्ताच्या अबोल शांततेत सर्वांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती.

**************************************************************************************************

यावर्षी मोठ्या दणक्यात यात्रा भरली. भोलागडीनेही तिच्या शिरस्त्याप्रमाणे काही केलं नव्हतं त्यामुळे सर्व गावकरी खुष होते. संध्याकाळी सर्वजन कुस्त्यांच्या फडावर जमा झाले. कारण आज अशोकची कुस्ती सांगलीच्या एका नामचीन मल्लाबरोबर होती. पण त्याचवेळेस भोलागडीत हळुहळु काही घटना वेग घेत होत्या.

बोंडारवाडीचा शिरपा त्याचा गेल्यावेळचा केदारबाला केलेला नवस फेडण्यासाठी बोरण्यात जात होता. पोचायला उशीर होईल म्हणुन तो भोलागडीच्या वाटेने येत होता. संध्याकाळची कातरवेळ त्यात भयान शांतता. त्यात सतत कुणीतरी आपल्या पाठुन चालतय असा होणारा भास. एकदोनदा त्याने मागे वळुन पाहीलही पण कुनीच नाही. चालत चालत तो बांबराजवळ पोहचला. तसे ढोल ताश्यांचे आवाज त्याच्या काणी पडु लागले. गाव जवळ आल्यामुळे तो मनोमन खुश होता. पण त्याला साधी कल्पणाही नव्हती की त्याच्यापेक्षाही जास्त अजुन कोणीतरी खुष झाल होतं. भरपुरवेळ चालल्यामुळे त्याला तहान लागली होती. समोरच बांबर शांत पसरला होता. शिरपाने हातातली पिशवी बाजुच्याच करवंदाच्या जाळीत अडकवली. आणि तो तळ्याच्या दिशेने चालु लागला.

गेला पाउन एक तास झाला पण कुस्ती काही निकाली लागत नव्हती. अशोकच्या अंगातुन घामाच्या धारा वहात होत्या. तर समोरचा मल्लसुध्दा चांगलाच दमलेला दिसत होता. आणि एका क्षणी तर अशोक पुर्ण खाली गेला त्याची पाठ धरणीला लागनार इतक्यात विजेच्या चपळाईने अशोकने गिरकी मारली आणि पुढच्याच क्षणी अशोक त्या मल्लाच्या छातीवर स्वार झाला. तशी आबासाहेबांनी जोरात आरोळी ठोकली."वा.....र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र माझ्या पठ्या....! त्यांनी आपल्या डोक्यावरचा फेटा उजव्या हाताने काढला आणि जोरात उडवला. तसे अशोकचे मित्र शाम्या आनि सुर्‍या धावत फडात गेले आणि त्यांनी अशोकला खांद्यावर ऊचलुन घेतला.

इकडे शिरपा जसा पाण्याचा जवळ गेला तशी वार्‍याची संथ झुळुक पाण्यावरुन गेली आणि तळ्यातल हिरवं पाणी शहारुन गेलं. शिरपाने आपल्या शर्टाच्या दोन्ही बाह्या वर सारल्या आणि तो पाण्यात उतरला. चालुन चालुन गरम झालेल्या पायांना तो गार स्पर्श हवाहवासा वाटु लागला. तो अजुन जरा पुढे गेला. आपल्या ओंजळीत पाणी घेऊन तो चेहर्‍यावर हलकेच हबके मारु लागला. चेहरयावरच पाणी दोन्ही हातांनी नितळुन टाकताना त्याच्या दोन्ही हातांना पाण्याचा गरम स्पर्श होऊ लागला आणि श्वास घ्यायला जड वाटु लागले. त्याने आजुबाजुला पाहील तसं त्याच काळीज चरकल. आता त्याची फक्त मानच पाण्याबाहेर होती.
कुणीतरी हळुहळु त्याला पाण्याच्या खाली खेचत होत...............................................................!

गावात बैलगाडीतुन अशोकची मिरवणुक निघाली होती. गावच्या पोरांनी जोरदार गुलाल ऊधळला आणि ढोल बडवायला सुरवात केली. धमडक तमडक.....धमडक...तमडक.............!

भोलागडीत पुन्हा एकदा भयान शांतता पसरली. हळुहळु अंधार पसरु लागला होता. जेऊन सुस्त झालेल्या जनावराप्रमाणे बांबरातलं पाणी निपचित पडलं होतं तर बाजुलाच करवंदीच्या जाळीत शिरपाची पिशवी येणार्‍या हवेबरोबर शांत झोके घेत होती...........................................!

शिरपाच्या श्वासाप्रमाणेच मिरवणुकीतल्या ढोलांचा आवाज वातावरणात विरळ होत जात होता.
धमडक तमडक......धमडक तमडक......धमडक तमडक........................!

समाप्त...........................!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा........ छान कथा.....

मात्र .............. शेवट कळाला नाही.

तिथे खरोखरच आत्मा वावरत होत्या का ??????

शेवट थोडासा स्पष्ट करा.

छान.

@ महेश आणि भाग्यश्री अमित,
तुमच्या अमुल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद, तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कथा पहिल्या भागापासुन नीट वाचल्यास आपोआप मिळेल.
तरीही नाही मिळाल, तर मलाच भोलागडीत जावं लागेल असं दिसतय बहुतेक.
Wink

छन आहे!
मात्र शुद्धलेखनाच्या बर्‍याच चुका आहेत, प्रत्येकच भागात..त्यामुळे थोडासा रसभंग होतोय!
पुढच्या वेळी तेवढं बघाल का?