गझल
खेळलो उंदरामांजरासारखे!
प्राण गेले पहा पाखरासारखे!!
जिंदगी दावणीलाच ही बांधली....
हे जिणे वाटते वासरासारखे!
काय मी बोललो? लोक का ते असे....
तांबडे जाहले गाजरासारखे!
दावते जग मला का अशा वाकुल्या?
वाटते जग मला वानरासारखे!
चारचौघांप्रमाणे जरी वाटलो;
काव्य लिहिणार ना पामरासारखे!
लोक उर्दूतली शायरी लाटती!
लोक ते वाटती तस्करासारखे!
ते भले मस्करी वा टवाळी करो!
स्थान माझे उरी पाझरासारखे!!
सूर्य होताच मी, ओघळू लागले....
रंग दुनिये तुझे डांबरासारखे!
नोकरी वाटली नोकरी ना कधी;
वागलो ना कधी नोकरासारखे!
मूल होते बडे, मात्र बापास ते...
वाटते नेहमी लेकरासारखे!
धबधब्यासारखी शायरी वाचली!
झुळझुळू लागलो निर्झरासारखे!!
लोक माझाच वापर करू लागले!
दामटू लागले नांगरासारखे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
व्रृत्त मस्त वाटले लयीत
व्रृत्त मस्त वाटले
लयीत वाचताना छान वाटत होते
काही खयाल इतके भावले नाहीत
क्षमस्व
प्राणीसंग्रहालयात बसून
प्राणीसंग्रहालयात बसून लिहिलेली एकटाकी कविता आहे का ही? मानवी कविता लिहिण्यात काय प्रॉब्लेम आहे?