Submitted by रसप on 29 June, 2012 - 00:36
बोललो जे जे कधी मी बोललो नाही खरोखर
पण तरीही वाद झाला चूक होते की बरोबर !
तोडले नात्यास ह्याचे फारसे ना दु:ख झाले
का न सांगितले कधी तू सत्य लोकांच्या अगोदर ?
भिजवल्या मी पापण्या अन भास झाला पावसाचा
स्वच्छ डोळ्यांनी कधी नव्हते बघितलेले मनोहर
मी तुझ्या डोळ्यांत गंगा पाहिली अन धन्य झालो
लपवतो डोळ्यांमधे लोणारचे खारे सरोवर
दाखवा माणूस जो म्हणतो "सुखी आहे इथे मी"
चेहरा हसरा खरा मी शोधण्या फिरलो घरोघर
एक ठिणगी वेचली मी जाळताना हृदय माझे
तीच ठिणगी आणि ही कविता असे बहुधा सहोदर
सांगती सारेच, "जीतू, जा तिला विसरून आता"
काय सांगा लागते देण्यास हे सल्ले अगोचर ?
....रसप....
२७ जून २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_29.html
गुलमोहर:
शेअर करा
तोडले नात्यास ह्याचे फारसे ना
तोडले नात्यास ह्याचे फारसे ना दु:ख झाले
का न सांगितले कधी तू सत्य लोकांच्या अगोदर ?..... आवडला
छान खयाल आहेत, मला असे वाटते
छान खयाल आहेत, मला असे वाटते की शेर जरा अधिक वजनदार होऊ शकले असते
काफियेही छान आहेत
मस्तये......... एक ठिणगी
मस्तये.........
एक ठिणगी वेचली मी जाळताना हृदय माझे
तीच ठिणगी आणि ही कविता असे बहुधा सहोदर
यातली वेदना आवडली.........
धन्यवाद !
धन्यवाद !
आवडली बरोबर ,अगोदर ,सहोदर,
आवडली
बरोबर ,अगोदर ,सहोदर, अगोचर,....... चे शेर मस्त आहेत
बेफीजी म्हणत आहेत तेही लक्षात घेण्याजोगे आहे .....नेमके काय कारायला हवे या बाबत बेफीजींचे मार्गदर्शन घ्याच.......
काफिये मस्त आहेत.
काफिये मस्त आहेत.
डोळ्यांमधे लोणारचेच खारे
डोळ्यांमधे लोणारचेच खारे सरोवर का म्हणुन ? मद्रासला खुप आहेत की.