आई ग,
खर सांग न मला,
बाप्पा गेला चोरीला,
का बाप्पा निघून गेला?
डोके नाही दुखत,
बाम नको मला,
मी नाही झोपत,
खरच सांग मला.
आई ग,
आत्महत्या म्हणजे काय ग?
शेतकरी करतात तीच का ग?
तेच पिकवतात धान्य,
तेच उपाशी का ग?
शेतीप्रधान देश म्हणजे काय ग?
मग प्रधान शेती का नाही करत ग?
सरकार म्हणजे मोठ्ठा राक्षश का ग?
तो आंधळा आणि खादाड असतो ना ग?
तो झोपलेल्या लोकांना अचानक मारतो ना ग?
अण्णा आणि रामदेवबाबा हिरो न ग?
त्यांना तो राक्षाश का छळतो ग?
महागाई दुष्ट बाई आहे का ग?
ती रोज रोज कशी वाढते ग?
हवालदार मामाकडे बंदूक का नाही ग?
त्यांचे चिलखत लुटूपुटूचे असते का ग?
पोलीस अन सैनिक शूर असतात न ग?
रोज जंगलात का मरतात ग?
आपण प्रोमीस पाळतो न ग?
मग तेलंगाना का देत नाहीत ग?
रोज कित्ती कित्ती लोक मरून जातात न ग?
देव बाप्पा वरून पाहून कंटाळला का ग?
आमीर खान म्हणतो तसे आल इज वेल नाही न ग ?
म्हणूनच बाप्पा निघून गेले का ग ?
डॉ मकरंद जामकर
निरागस भाषेत इतके सारे अवघड
निरागस भाषेत इतके सारे अवघड प्रश्न? ते ही एकाच कवितेत?
फार आवडली ही कविता. आमच्या
फार आवडली ही कविता. आमच्या मनातल निरागस बालांच्या मुखातून वदवलत.
@ दामोदरसुत , मनापासुन आभार.
@ दामोदरसुत , मनापासुन आभार.