Submitted by मी_आर्या on 12 July, 2011 - 04:53
या कवितेची प्रेरणा कोण हे सांगण्याची गरज आहे?
कुठे रवीने घोटलेला
आंबटढाण ताकासारखा असलेला तु
नि कुठे खमंग भजीच्या पीठासारखी मी
कसे कुठुन कोण जाणे,
तुझ्यात विरघळत गेले...
कढीपत्ता नि मिरचीची फोडणी
असो की लसुण जीर्याची
तु तुझा स्वभाव सोडणार नाहीसच
पण तरी..
एक लक्षात आलं असेलच तुझ्या
माझ्याशिवाय तु म्हणजे 'मठ्ठा'च बरं!
जाऊदे, शिळ्या कढीला किती ऊत आणायचा...!
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
मला ही पुर्ण "पानं" सिरिज जाम
मला ही पुर्ण "पानं" सिरिज जाम आवडते
सगळ्याच कविता मस्त आहेत!
माझ्याशिवाय तु म्हणजे 'मठ्ठा'च बरं!
>>>
एक नंबर!
Pages