मराठा इतिहास दिनविशेष ... जून महिना.. भाग २

Submitted by सेनापती... on 29 June, 2011 - 03:20

१३ जून १६६५ - शिवाजी राजे आणि मिर्झाराजे जयसिंह यांच्यात इतिहास प्रसिद्द पुरंदरचा तह.

१३ जून १७०० - औरंगजेब स्वतः सज्जनगड बघण्यास गडावर पोचला. दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड ९ जून रोजी जिंकला होता.

१४ जून १७०४ - मुघलांच्या कैदेत असलेल्या छत्रपति संभाजी यांच्या पुत्र शाहूचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.

१५ जून १६७० - मराठ्यांनी सिंदोळा घेतला.

१५ जून १६७५ - कारवारची मोहिम आटोपून छत्रपति शिवाजी महाराज रायगडावर परतले.

१६ जून १६५९ - विजापुरच्या आदिलशाहने शिवाजी राजांविरुद्ध अफझलखान याला एप्रिल १६५९ मध्ये मोहिमेसाठी मुकरर केले होते. १६ जून रोजी आदिलशाहने वाई आणि तळकोकणातल्या सर्व वतनदरांना फर्मान पाठवले आणि शिवाजी राजांविरुद्ध खानाला येउन मिळण्यास सांगितले.

१६ जून १६७० - माहुली किल्ल्याची किल्लेदारी मनोहरदास गौडा याने सोडली. नविन किल्लेदार आला अलिवर्दि बेग. शिवाजी महाराजांनी छापा घालून माहुली - भंडारदुर्ग आणी पळसखोल ही दुर्गत्रयी जिंकली.

१७ जून १६७४ - राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब पुण्यतिथी. मराठा साम्राज्याचे २ छत्रपति निर्माण करण्याऱ्या या राष्ट्रमातेला कोटि कोटि प्रणाम...!!!

१७ जून १६३३ - अस्त होणाऱ्या निजामशाहीला नवसंजीवनी देण्याचे राजे शहाजी आणि मुरार जगदेवाचे अखेरचे प्रयत्न. ६ वर्षाच्या 'मुर्तिझा'ला गादीवर बसवून निजामशाही चालवण्याचे प्रयत्न.

१८ जून १६६५ - ९ वर्षाचे शंभूराजे मुघल छावणीमध्ये मनसबदारी स्विकारण्यास हजर. पुरंदरच्या तहानुसार शिवाजीराजांना बाळ शंभू राजांसाठी मनसबदारी स्विकारणे भाग पडले होते.

.
.
तळटीप: सदर तारखा, प्रसंग मी विविध संदर्भ पुस्तकांमधून मिळवलेले आहेत...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users