सृजन..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

पानं गळून पाचोळ्या झालेल्या वाटेवर
पर्णहीन झालेल्या फांदीतून सुर्य येतो
विखरतात कोवळी किरणं अवतीभवती
दवात भिजलेली पाने सजीव होतात
पिकलेले रंग थेंबथेंब ओघळू लागतात
कधीतरी कुजून मातीत मिसळून जातात
सृजनाच्या क्रियेला सुरवात व्हायला लागते
भरगच्च पर्णसंभारात सुर्यकिरणं अडकतात
भुईवर झिरपत राहतो काळोख.. काळोख

- बी

प्रकार: 

या कवितेतुन भलते परस्परविरोधी सूर उठताहेत असं वाटतं. हे द्वंद्व आहे की निराशेच्या वाताने आशेच्या दिव्यावर घातलेली फुंकर आहे?