Submitted by sumati_wankhede on 10 April, 2011 - 03:45
’खोटाच बहाणा होता !’ अश्रूंनी पुसले मजला
काय खरे नि खोटे... मज उमजावे कसे रे !
मी काळीज घेऊन हाती, मध्यरात्रीच्या काठी
कुठवर सोडू उसासे... मम समजावे किती रे !
तो भ्रमर होऊना गातो, आकाशात भटकतो
कसे बेडी तोडून यावे... मन जाळावे किती रे !
मी गोंजारावी प्रीत, की पाळू जगाची रीत ?
हे देहभान, ही साद... तन गुंतावे किती रे !
काटेरी मायाजाल, की फसवी रानभूल ?
आत्म्याने कुडी त्यागता... राखेस पुसावे का रे !
गुलमोहर:
शेअर करा
कविता खूप खूप आवडली .खूप आर्त
कविता खूप खूप आवडली .खूप आर्त .पु.ले.शु.
सुमती ताई खुप छान! खुप आवडली
सुमती ताई खुप छान!
खुप आवडली तुमची कविता!
मस्तच "रे".
छानच.
छानच.
मस्तच.. आवडली..
मस्तच.. आवडली..
व्याकुळता चांगली व्यक्त केली
व्याकुळता चांगली व्यक्त केली आहे.
व्वाह !! नेहेमीप्रमाणेच थेट
व्वाह !! नेहेमीप्रमाणेच थेट अन प्रभावी !