गाव रिकाम झालंय

Submitted by पल्ली on 16 March, 2011 - 03:19

गाव रिकामं झालंय
इतके ओळखीचे चेहरे
तरिही एकटेपणा
संवाद करायला
तो एक शब्द हवाय....
'मित्रा'
सवयीच्या गप्पा,
तोच तो आवडीचा कट्टा...
तीच ती छेडाछेडी
त्या उगीचच्या खोडी...
हम्म, अन आता हा दुरावा,
सगळे पक्षी दूर उडून गेलेत.
माझं गाव तिथंच आहे.
कुण्णाशी बोलायला मनच नाहीये,
कुणी काही बोलायला आलं तरि
माझ्याकडे कुठला विषयच नाहीये.
इकडे आलात तर नक्की भेटा,
गाव रिकाम झालंय.......

गुलमोहर: 

आवडली.!

कुण्णाशी बोलायला मनच नाहीये,

ही ओळ जरा खटकतेय..

ती
कुणाशी बोलावसंच वाटत नाहीये.

अशी केली तर.. अर्थात आपली इच्छा.

अप्रतिम आहे कविता. निवडक १० मधे गेली. नेहमीच मी 'गावं रिकामं झालयं' हे वेशीवर उभा राहून म्हणायचो. पण आत्ता कळलं कि गावात उभा राहून म्हणण्याचा खरा अर्थ काय आहे ते.

छान..!

पल्ली, खुप छान! खरं तर एकाकीपणाच्या वेदना इतक्या प्रभावी पणे उतरल्यात, की खुप छान असे कवितेला म्हणणे चुकीचे ठरावे!

आभारी....................................... या एकदा गप्पा मारायला... गाव रिकामं झालंय.............