समाज

Submitted by सुशिल गणोरे on 13 March, 2011 - 10:51

सतीच्या चालीचा बोल बाला
विधवा विवाह मात्र बंद केला
तोंड्याळ मानस असतात जितकी
त्यांनाच समाज म्हणतात मुकी

पर जातीत विवाह केला
तर समाज बोट उचलतो
विधवा सती जाणार नसल्यास
तिला बळच जाळात ढकलतो

घरातले विचार चौपाटीवर
पोहोचतात तरी कसे
चूक आपली नसते
घरातलाच बाहेर भूकताना दिसेल

आवड गंज खेळाची मुलीला
समाजाची बंधनेही पाळावे लागतात तिला
मग ऑलम्पिकचे पदक जिंकल्यावर
बक्षिसे का इतकी देता तिला?

कवी- सुशिल गणोरे

गुलमोहर: 
शब्दखुणा: