Submitted by मीन्वा on 16 April, 2008 - 06:45
फांदीपासून तूटलेलं पान..
पुन्हा जोडलं जाण्याची वाट पहात..
झाडाच्या बुंध्याशी, किती काळ थांबेल?
जीवनरस असेपर्यंत झगडेलही कदाचित,
ते वार्याच्या झोताशी.
एकदा का जीवनरस संपला,
की उरतं केवळ वाळलं पान,
वार्याच्या झोतानिशी भरकटणारं..
वारा नेईल तेव्हा,
वारा नेईल त्या दिशेला वहात जाणारं..
झाडाला आठवत असतील का ती सारी पानं?
आणि पानाला..?
गुलमोहर:
शेअर करा
मीनु : सही..
मीनु : सही.. काहितरी आत तुटल्यासारखे झाले वाचून...
visit http://milindchhatre.blogspot.com
खूप छान
खूप छान आहे ही कल्पना !!
-- शकुन
झाडाला
झाडाला आठवत असतील का ती सारी पानं?
आणि पानाला..?>>.
छाने...
वाचली ही
वाचली ही कधीच. मिनू, प्रतिक्रिय आज देतेय.
सुंदर. खरच!
....पानाला? आठवत असेल?
भरकटण्यावाचून नशिबी काही नाही अशांनी काय करायचं असतं?
छान... सुंदर
छान... सुंदर कल्पना.