मुलांच्या मनातील परीक्षेची चिंता घालवण्याचे काही उपाय

Submitted by balsanskar on 4 May, 2010 - 05:17

परीक्षा म्हटली की, सर्वांच्याच पोटात गोळा येतो. दहावी किंवा बारावीत असलेल्या मुलांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही त्यांच्या परीक्षेची चिंता लागून रहाते. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवूनही चांगल्या महाविद्यालयामध्ये आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवूनही आपल्या आवडत्या विषयात विश्वविद्यालयीन पदवी मिळवण्यासाठी आणि चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे परीक्षा जसजशी जवळ येते, तसतसा प्रत्येक विद्याथ्र्याला थोडा तरी परीक्षेचा ताण अनुभवास येतो. या तणावामुळेच विद्यार्थी रात्री जागून अभ्यास करतात आणि त्यांचे अभ्यासावर लक्ष वेंâद्रित होते; परंतु हाच ताण अधिक प्रमाणात वाढल्यास परीक्षेच्या काळजीमुळेच विद्याथ्र्यांचा अभ्यास होत नाही. त्यांची झोप उडते आणि ते निराश होतात. परीक्षा जवळ आल्यावर मग रात्रंदिवस अभ्यास करण्यापेक्षा विद्याथ्र्यांनी आपल्या शिक्षकांच्या सल्ल्यानुसार पहिल्यापासून जोमाने अभ्यास करावा.

जी मुले आरंभापासूनच नियमितपणे अभ्यास करत नाहीत, त्यांना परीक्षा जवळ आल्यावर परीक्षेची भीती आणि ताण वाढणे हे स्वाभाविकच आहे; परंतु बर्‍याच वेळा उत्तम अन् नियमित अभ्यास करणार्‍या हुशार विद्याथ्र्यांच्या मनावरही परीक्षेचा ताण येतो; कारण त्यांच्या मनात ‘मला ९५ टक्के गुण मिळाले नाहीत किंवा माझा पहिला क्रमांक आला नाही, तर आई-वडिलांना आणि आपल्या नातेवाइकांना काय वाटेल’, ही भीती सतत डोकावत असते. अशा वेळी पालकांनी तू योग्य शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे आणि चांगला अभ्यास करावा, हीच आमची अपेक्षा आहे. ‘जास्तीतजास्त प्रयत्न करूनही तुला अल्प गुण मिळाले किंवा दुर्दैवाने तू अनुत्तीर्ण झालास, तरी आम्हाला काहीच वाटणार नाही’, असे आश्वासन मुलाला द्यावे. त्याला गीतेतील श्रीकृष्णाच्या वचनाची ‘फलाची अपेक्षा न करता कर्म करणे (अभ्यास करणे) हेच तुझे कर्तव्य आहे’, याची आठवण करून द्यावी.
आपल्या घरात अभ्यासू, शांत, आनंदी, वातावरण निर्माण करून देणे, हे पालकांचे उत्तरदायित्व त्यांनी पार पाडावे. मुलांचे अभ्यासात लक्ष लागून त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी खालील गोष्टी उपयोगी पडतील.
१. मुलाला अभ्यासासाठी वेगळी खोली द्यावी किंवा शक्य नसल्यास खोलीतील एका भागात छोटीशी विभागणी (पार्टीशन) करून द्यावी.
२. घरात दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी लावू नये.
३. घरात आई-वडिलांची किंवा इतर मुलांची भांडणे होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी.
४. घरातील भांडणतंटे मुलाच्या समोर सोडवू नयेत.
५. आपले मित्र किंवा आपल्या मुलाचे मित्र यांना घरी बोलावू नये.
६. अभ्यासासाठी मुलगा रात्री जागत असल्यास आपणही तत्त्वज्ञान किंवा आपल्या आवडीच्या विषयाचे वाचन करून त्याला साथ द्यावी.
परीक्षेचा विषय चांगल्या रीतीने समजण्यासाठी आणि परीक्षेत प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी तज्ञ शिक्षकांची योजना करावी. या तज्ञ शिक्षकांना शिकवण्याची आवड असावी आणि कठीण विषय सोपा करून सांगण्याची हातोटी असावी. विद्याथ्र्यांच्या अडचणी समजून घेऊन त्याच्या सर्व शंका त्यांनी प्रेमळपणे आणि न रागावता त्याला समजेपर्यंत समजावून सांगाव्यात. शिक्षकांनी आपल्या विद्याथ्र्यांकडून परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडवून घ्याव्यात. प्रश्नपत्रिका परीक्षेच्या ठराविक काळातच सोडवून त्याला आवश्यक ते मार्गदर्शन करावे. प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे मुलाच्या मनातील परीक्षेची भीती निघून जाईल आणि त्याचा आत्मविश्वास वाढेल.
विद्याथ्र्याला प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यास मनातील परीक्षेची भीती घालवण्यासाठी खालील उपक्रमांचा लाभ होईल. या कामी पालकांनी मुलांना सहकार्य करावे.
विद्याथ्र्यांनी एका आसंदीमध्ये पाठ टेकून बसावे आणि डोळे मिटून शरिरातील सर्व अवयव शिथील करून स्वस्थ अन् शांत मनाने पुढील सूचनांकडे लक्ष देऊन ऐकावे आणि सूचनांशी मनाने एकरूप व्हावे. ‘तुझी परीक्षेच्या सर्व विषयांची संपूर्ण सिद्धता झालेली आहे. उद्या परीक्षा आहे. रात्रभर शांत झोप मिळाल्याने तू सकाळी ताजातवाना होऊन उठलेला आहेस. आपल्या आजच्या विषयाचे टाचण तू भराभर चाळत आहेस. ‘आता कोणत्याही प्रश्नाचे उत्तर चांगल्या प्रकारे लिहू शकेन’, असे तुला वाटत आहे. थोडासा अल्पोपहार घेऊन तू परीक्षेच्या सभागृहात वेळेवर पोहोचलेला आहेस. पहिली घंटा (बेल) वाजलेली आहे. आपल्या जागेवर बसून, डोळे मिटून, निर्विचार अवस्थेत तू शांत चित्ताने बसलेला आहेस. आता दुसरी घंटा (बेल) वाजलेली आहे. तुझ्या हातात प्रश्नपत्रिका मिळालेली आहे. प्रत्येक प्रश्न वाचून आणि गुण पाहून तू कोणते प्रश्न सोडवणार आहेस, याचा विचार केलेला आहेस. परीक्षेचे सर्व प्रश्न सोपे आहेत. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर समाधानकारक लिहिले जात आहे. शेवटची १० मिनिटे राहिल्याची घंटा (बेल) वाजत आहे. तू भराभर सर्व पाने चाळून सर्व प्रश्न अचूक लिहिले आहेस का, याची निश्चिती करून घेतलेली आहेस. शेवटची घंटा (बेल) वाजली आहे आणि तू आपली प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांच्या हातात आणून देत आहेस. तू आता घरी आला आहेस आणि घरातील सर्वांना ‘प्रश्नपत्रिका सोपी गेली आहे’, असे सांगत आहेस. आता जेवून तू थोडा वेळ झोपणार आहेस आणि नंतर उद्याच्या परीक्षेची सिद्धता करणार आहेस. सर्व धड्यांचा सारांश वाचून झालेला आहे आणि आता तू शांत झोपत आहेस.’’ याप्रमाणे ५-६ वेळा सूचनांद्वारे मनाने परीक्षेच्या सभागृहामधून प्रश्नपत्रिका सोडवून आल्यामुळे विद्याथ्र्याची परीक्षेची भीती न्यून होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१)दहावी/बारावीची परीक्षा काही वेगळी नाही....शाळेतल्या परीक्षेसारखीच ..कदाचित वेगळ्या केंद्रावर जाऊन द्यायची, ती सगळेच कधी ना कधी देतात.
२) अभ्यास फक्त परीक्षेच्या वेळी न करता वर्षभर करण्याची सवय पहिल्यापासून (किंवा पहिलीपासून) लावलेली बरी.
३) १०-१२ ची परीक्षा ही साथीचा रोग (स्वाइन फ्लु सारखा भयंकर) नाही..सगळेच जण त्यातून जातात्...टीव्ही/खेळ बंद नको प्रमाणात पण हवेत.
४) पाहुणे/मित्रमंडळ यासाठी नको की ते परीक्षेचा ताण वाढवतात्..उपदेशाचे डोस पाजून.
५)रेडियोवर गाणी ऐकता ऐकता मी माझा सगळा अभ्यास केला...पण तेव्हा एफ एम नव्हते.
६) बर्‍याच मुलांना जबाबदारीची जाणीव असते...त्यांच्या मागे लागू नये.
७) मुलांचा झापड बांधलेला शर्यतीतला घोडा करू नये.
८) परीक्षेच्या वेळी पूर्वपरीक्षांचा दाखला द्यावा -चांगल्या गेलेल्या असल्यास - नसल्या तर यात कोणत्या चुका झाल्या ते कळले...त्या परत करू नको.
९) एवढे सगळे होऊन गुण मनासारखे नाही मिळाले..तर ही परीक्षा हे आयुष्यातले अंतिम नाही...१ दार मिटले..तर दुसरी १०० आहेत.

यावरून आठवले.

एकदा शाळेत श्याम मानव यांचे व्याख्यान होते. तेव्हा त्यांनी एका पांढर्‍या कागदावर एक काळा ठिपका काढला आणि विचारले की कागदाकडे नीट पाहा आणि सांगा तुम्हाला काय दिसते? शिक्षकांसह सगळ्यांनी सांगितले की एक काळा ठिपका दिसतोय. ते म्हणाले, हेच ते. एवढ्या मोठ्या कागदावर आपण फक्त काळा ठिपकाच पाहतो. त्याच्याभोवतीचा त्याच्यापेक्षा कितीपरी अधिक क्षेत्रफळाचा पांढरा भाग आपण पाहतच नाही. इंजिनीअरींग, मेडिकल म्हणजे काळा ठिपका. प्रत्येकजण जीवाच्या आकांतानं उडी घेतोय तो काळ्या ठिपक्यावर चढण्यासाठी. जगात फक्त इंजिनीअरींग आणि मेडिकलच नाही. इतरही अनेक संधी आहेत. त्यांच्याकडे पाहा. तुम्हाला तुमच्या आवडीचे क्षेत्र गवसेल आणि आयुष्यभर तुम्ही आनंदी व्हाल. दहावी बारावीच्या परिक्षेला विनाकारण महत्त्व येण्याचं कारण हेच. केवढे दडपण या परीक्षांचे. इथे कमी पडले तर आयुष्य घडायचे थांबलेच म्हणून समजा.

चांगली माहिती. खरे तर शाळेच्या टेस्ट्स, परीक्षा आणि क्लास मधील टेस्ट्स यांमुळे मुलांना ब्रीदिन्ग टाइम, स्ट्रेस कमी करण्यासाठी वेळच मिळत नाही. बसून अभ्यास करून वजन वाढू शकते आणि चालायला देखील वेळ मिळत नाही. वेळेचे योग्य नियोजन केले पाहिजे.

एक चांगला उपाय माझ्या योग गुरुंनी स्वतः आचरणात आणलेला आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी सुध्दा मुलगी १२ वीत असताना उपयोगात आणलेला.

योग निद्रा ही सी.डी. योग विद्या धाम नाशिक यांनी प्रसिध्द केलेली आहे.

यात ४५ मिनिटांची योग निद्रा विद्यार्थ्याने घेणे अपेक्षीत आहे. ह्यात सकारात्मक संकल्प अत्यंत महत्वाचा आहे.

याव जास्त न लिहता अनुभव घ्यावा.