मांसाहार जिंदाबाद ...!!

Submitted by अभय आर्वीकर on 18 April, 2010 - 01:55

मांसाहार जिंदाबाद ...!!

सोने गं सोने, रांधल्या का तुने
बेडूकाच्या खुला
खेकड्याची आमटी
अन गांडूळाच्या शेवया...!!

गोचीडाची खिचडी
टमगिर्‍याचं भरीतं
डासाचा अर्क घे
घुबडाच्या तर्रीतं
जरासा सुरवंट, थोडेसे ढेकून
घे पुरणात भराया .....!!

गोमाश्याचा लाडू कर
त्याला सरड्याचा रंग दे
ऊंवा-टोळ पिळूनी
सापा-विंचवाचा पाक घे
उंदराची चटणी, पालीची सलाद
घे तोंडास लावाया ....!!

कोंबडी नी बकरी
निरुपद्रवी जनावर
तुझ्या जीभेचे चोचले
उठती त्यांच्या जीवावर
गरीबाला सूळी, शत्रूला अभय
का करीशी अन्याया?....!!

गंगाधर मुटे
............................................
ही कविता प्रकाशीत करतांना मला खुप मानसिक त्रास झालाच.
आपल्या मनातील दुविधेपोटी कवितेची मुस्कटदाबी करायची नाही असे ठरवून प्रकाशीत केली.

मुख्य मुद्दा असा की पृथ्वीवरील सर्वात बुद्धीमान/शक्तीमान मनुष्यप्राणी असा का वागतो?
नेमका दुर्बळाच्या/सात्विकाच्या जीवावरच का उठतो?
पुर्वीच्या काळातही शिकार करणारेही नेमके हरिणाच्याच मागे लागायचे. का? तो निरुपद्रवी आणि स्वभावाने गरीब म्हणुनच ना? वाघसिंहावर मर्दुमकी गाजवायची इच्छाशक्ती मानवात नाहीच असा अर्थ घ्यायचा का?

या कवितेत "शाकाहार की मांसाहार" हा मुद्दा नाहीच. मुद्दा आहे मानवी वृत्तीचा.
अर्थात तसा कवितेत व्यक्त झाला की नाही हे महत्वाचे.
..............................................

गुलमोहर: 

प्राण्यांना खाणारी माणसे व माणसांना खाणारे प्राणी यांचे प्रमाण बघू जाता ते व्यस्तच आढळते!! Uhoh

ही मांडणी अशास्त्रीय,भावनिक व बालीश आहे.दुर्बळ,सात्विक इ.इ. माणसांनी प्राण्यांना चिकटवलेले गुण आहेत.प्राण्यांचे वागणे असे एकाच प्रकारात बसणारे नसते,त्यांचा पवित्रा परिस्थितीजन्य असतो. माणूस सर्वात बुद्धीमान/शक्तीमान आहे हा देखील आपला भ्रमच आहे.वेळ आली की 'साधा' विषाणूही आपल्यावर मात करतो.

लई भारी... माझ्यासारखाच विचार करणारा कुणीतरी आहे , हे पाहून मला आनंद वाटला... Happy उपासनेच्या बीबीवर तुम्हाला आग्रहाचे आमंत्रण.... Happy http://www.maayboli.com/node/13818?page=8#new

आणि मुळात या लोन्काच्या ग्रेट असण्याचा आणी शाकाहारी असण्याचा काय सम्बन्ध ?
केदारराव ! असा संबंध आहे ,अस मी कुठे म्हणतोय ?
मुटेजीचा रोख असा नव्हता पण आय_पियेल यान्च्या प्रतिसादानन्तर आता इथे नविन वाद नको म्हणून ही पोस्ट .
मुटेजींचा रोख असा नक्कीच नव्हता,मी आपलं काही शाकाहारी लोक सांगीतले ..एव्हढच !
तसंही "आय_पियेल" आणि नविन वाद हे सध्या ठरलेलंच आहे ....!

आपण कितीही आरडाओरड केली तरी पट्टीचे वशाट ''खाणारे'' खातातच की! काही काही प्राण्यांच्या हत्येवर सरकारनेच बंदी आणली आहे म्हणून.... नाहीतर ते प्राणीही रोज खाण्यासाठी मारले गेले असते.
काही राष्ट्रांमध्ये कुत्रा, गाय, बैल, म्हैस, मोर, हरीण व मृग जातीतील सर्व प्राणी, साप, मगर, सुसर, माकड, बेडूक इ. इ. प्राणी आजही मोठ्या चवीने खाल्ले जातात. त्याशिवाय नेहमीचे कोंबडी, डुक्कर, ससे, बकर्‍या, बोकड व इतर जलचर असतातच जोडीला. मुंग्या,मुंगळे, किडे, अळ्या इ. प्राण्यांनाही खाल्ले जाते चवीचवीने.
अनेकजण असेही सांगतात की माणसाशिवाय जे जे जिवंत ''हालते'' ते ते सर्व आम्ही खातो.
आता जर नरमांसभक्षणाला परवानगी मिळाली तर तेही चवीने खाल्ले जाईल. Wink

ही मांडणी अशास्त्रीय,भावनिक व बालीश आहे.दुर्बळ,सात्विक इ.इ. माणसांनी प्राण्यांना चिकटवलेले गुण आहेत.प्राण्यांचे वागणे असे एकाच प्रकारात बसणारे नसते,त्यांचा पवित्रा परिस्थितीजन्य असतो. माणूस सर्वात बुद्धीमान/शक्तीमान आहे हा देखील आपला भ्रमच आहे.वेळ आली की 'साधा' विषाणूही आपल्यावर मात करतो.

हा सिद्धांत कोंबडीने मान्य करायला हवा.
मी मान्य करून काय उपयोग? Happy
कोंबडीचा जीव जातो आणि आपल्याला तो भावनिक आक्रोश वाटतो. Happy

देव ,यज्ञ हा मानवानेच निर्मिलेला तेव्हा त्याचा हवी ही मानवाच्याच आवडीचा -देवाच आस्तित्व हे
माणसाच रिअलायझेशन आहे व वेद हे अपौरुषेय आहेत [शरीरातीत अवस्थेत प्राप्त झालेल ज्ञान,जे
समाधी अवस्थेत गुरुमुखातून स्त्रवीत झाल ,जे शिष्यानी ऐकल व शरीरभान येताच गुरुना शिष्यानी
ऐकवल .तेव्हा गुरुनी हे ज्ञान तुम्हाला कुठून प्राप्त झाल अस शिष्याना विचारताच हे ज्ञान आपल्याच
मुखातून स्त्रवीत झाल अस शिष्यानी गुरूना सांगीतल .तेव्हाच जिथे तिथे मानवास अशी एक शक्ती
आस्तीत्वात आहे जी सर्व जीवांचा विचार करत असते याची मानवाला जाणीव झाली .आता हे गुरू
कोण होते?जेव्हा मानवाला उमजल की समुहात रहाण गरजेच आहे तेव्हा या समुहाच आचरण कस
आदर्श असाव यासाठी समाजहितासाठी तप:श्चर्या करणारे तेच गुरू व त्याना शरीरातीत अवस्थेत
प्राप्त झालेल ज्ञान म्हणजे वेद .सर्व विषयाबद्दलच्या ज्ञानाचे हे श्रोत आहेत अशी मान्यता आहे .यज्ञ
हे पण वेदातील आदेशाप्रमाणे विधीवत करण गरजेच आहे .]वेदात ,यज्ञात ''अज ''हवी म्हणून द्याव
अस विधान आहे.अज म्हणजे नवा तांदूळ .नव्या तांदळात सुर्यापासून आकर्शीत झालेली अनेक प्रकारची
दाहक ऊर्जा असते .त्यामुळे नवा तांदूळ खाउ नये ,पोटाला जड असतो ,पण तो यज्ञात उपयुक्त असतो.तो गाईच तूप व मंत्रांच्या कंपन उर्जेसह विसिष्ट प्रकारे निर्माण केलेल्या अग्नीत विसिष्ट वेळी जळल्याने वातावरणात त्याचा सर्व जीवांच्या हितावह असा परीणाम होतो .पुढे,पुढे माणूस जसा समाज
विमूख झाला तशा चुकीच्या प्रथा सुरू झाल्या ,''अज''या शब्दाचा अर्थ बकरा असा घेण्यात आला,
वगैरे ,वगैरे .यज्ञ हे सर्व जीवाना पोषक असेच आहेत त्यामुळे जीवाना विघातक असा विचार यज्ञात मुळीच नाही .

मुटे साहेब,

मांसाहारप्रेमी (मासे, कोंबडी, बोकड, बदक, मेंढा/मेंढी, तितर, ससा इत्यादी) असलो तरी आपली कविता आणि त्यामागचा विचार आवडला..

तात्या.

पुन्हा तेच, मांसाहार करणे हे अनैतिक कृत्य आहे हा कांगावा माझ्या अकलेच्या बाहेर आहे.(मांसाहार केल्यानेच माझी अक्कल अशी झाली आहे असेही लॉजिक पुढे कोणीतरी देइलच!)
छायाताई,मायबोलीवरचेच अन्न वै प्राणा: ही अत्यंत माहितीपूर्ण लेखमालिका वाचा,शोधू नका लिंक खालीच देतोय
http://www.maayboli.com/node/2802-भाग १
http://www.maayboli.com/node/3055?page=1-भाग २
http://www.maayboli.com/node/7685- भाग ३
आर्य मांसाहारी होते पण त्यामुळे वेद उपनिषदांचे महत्व अजिबात कमी होत नाही हो! ऐतिहासिक तथ्यावर आधुनिक निती-अनितीचे कलम करायचे कशाला?

मांसाहार करणे योग्य की अयोग्य हे ज्याने त्याने ठरवाव आवडीनिवडीनुसार्,हवामानानुसार ,उपलब्धते
नुसार ,तब्येतीनुसार तसच मनाच्या मान्यतेनुसार .यज्ञात अज बळी देण या विषयावर माझी पोस्ट आहे.

अज शब्दाचा अर्थ नवा तांदूळ असा असूही शकेल... पण वरच्या श्लोकात मात्र अजचा अर्थ बकरा आहे...अजापुत्र... तांदळाला पुत्र नसतो.. Happy

जामोप्या माझ्या पोस्टमध्ये ते ''वगैरे वगैरे''लिहिल आहे ना त्यानंतर यज्ञातील हिंसा पाहून तो श्लोक
लिहिला गेल्याची शक्यता आहे .

<< श्लोकात मात्र अजचा अर्थ बकरा आहे.>>

देवामध्ये सुद्धा वर्गीकरण करावे लागते.
देवामध्ये सुद्धा पोटजाती आहेतच.

१) उदबत्ती - नारळाला पावणारे देव.
२) दुधाभाताला पावणारे देव.
३) कोंबडी-बकरी बळी घेवुन पावणारे देव.
४) नरबळी घेवुनच पावणारे देव.

वगैरे वगैरे. Happy

जामोप्या माझ्या पोस्टमध्ये ते ''वगैरे वगैरे''लिहिल आहे ना त्यानंतर यज्ञातील हिंसा पाहून तो श्लोक
लिहिला गेल्याची शक्यता आहे .

होय.. तुम्ही जी माहिती दिलेली आहे, ती अतिशय चांगली आहे, यात वादच नाही.. यज्ञातील हिंसेनंतर या श्लोकाचा जन्म झाला असणार.

बाप रे.. काय काय प्राणी आले आहेत कवितेत.. Happy

शाकाहार करणे हे एखाद्याला आपोआप 'हाय मॉरल ग्राऊंड'वर कसे नेते हे मला कळत नाही.
>>
हा कदाचित नंतर झालेला विपर्यास आहे. त्याचा संबंध अध्यात्माशी आहे. आध्यात्मिक तत्वज्ञान आणि त्याचा प्रसार जसजसा झाला तसतसा शाकाहार वाढत गेला असावा.

भारतीय आध्यात्मिक तत्वज्ञान मुख्यतः असे सांगते की मनुष्य हा सत्व, रज आणि तम ह्या गुणांनी युक्त आहे, आणि जर आध्यात्मिक प्रगती जर करायची असेल आणि ते विशिष्ठ ध्येय साधायचे असेल तर रज आणि तम हे गुण कमी झाले पाहिजेत आणि सत्वगुण वाढला पाहिजे. त्यामुळे अशा साधकांसाठी जीवनातील सर्वसाधारण गोष्टींसाठी आचार-विचार तयार झाले. त्यात मग 'खरे बोलावे' पासून ते 'अहिंसे'पर्यंत पुष्कळ आचारसंहिता आल्या. त्याच अनुषंगाने मग खाण्यापिण्यातही 'सात्विक' म्हणजे सत्वगुणाचा प्रभाव असणारे खावे असे झाले. मांसाहार हा तमोगुणी आहे असे म्हटले जाते. बरेच शाकाहारी पदार्थ जसे कांदा, लसूण हे सुद्धा तमोगुणी मानले जातात आणि म्हणून अध्यात्मात ते निषिद्ध आहेत. अशा प्रकारे अध्यात्माचा संबंध नैतिकतेशी आणि शाकाहाराशी आला आणि कालौघात त्याला शाकाहार म्हणजे नैतिकता असे स्वरुप प्राप्त झाले. भारतीय जनमानसावर पूर्वीपासून धर्म आणि अध्यात्म ह्याचा बराच प्रभाव आहे. त्याचा हा परिणाम असावा.

विवेकानंद हे शाकाहारी नव्हते हे खरे आहे. अमेरिकेत जेव्हा ते आले होते तेव्हाही 'आपण जे ताटात पडले ते खाल्ले' असे बर्‍याच पत्रांमध्ये लिहिले आहे. रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना मांसाहार करण्याची परवानगी दिली होती. पण हेही खरे आहे की इतर शिष्यांनी शाकाहारीच असावे असा त्यांचा आग्रह होता. 'नरेंद्राची कॅटेगरी वेगळी आहे' असे ते म्हणत. असो.

Pages