कुठे बुडाला चरखा? : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 25 March, 2010 - 15:03

कुठे बुडाला चरखा? : नागपुरी तडका

राजकर्‍यांनो जनतेसाठी एवढे ध्यानी घ्यावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!

अकबर होता, जुलूम होता, अन सुलतानी सत्ता
खुशालचेंडू मजेत होते, घामाची हालत खस्ता
काय निराळे आज भासते, तितुकेची सांगावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!

इंग्रज होते, लूटत होते, येथिल कच्च्या माला
पक्का करूनी, चौपट दामा, विकत ग्राहकाला
काय निराळे आज आढळे, तितुकेची बोलावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!

रेल्वे आली, विमान आले, आले शाळा-रस्ते
कोर्ट-कचेर्‍या अन नोकर्‍या, त्याही गोर्‍या हस्ते
काय निराळे तुम्ही घडवले, तितुकेची हाकावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे ..!!

टीव्ही आली, संगणक आले, आली कॉटन-बीटी
इलेक्ट्रॉनने झेप घेतली, तुमचे योगदान किती?
काय निराळे तुम्ही मढवले, तितुकेची सांगावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!

काय झाले ग्रामोदयाचे? कुठे बुडाला चरखा?
स्वदेशी ते काय उरले, बघा काढुनी बुरखा
दिवे तुम्ही किती लावले, अभयाने दावावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!

गंगाधर मुटे.
……………………………………

गुलमोहर: 

तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!

हा प्रश्न तुम्हाला विचारायला आता कुणी धजावणार नाही.... यु आर रिअली डिफरंट ! Happy

चरखा बुडाला हा काळाचा महिमा
पण कल्याणकारी राज्याची कल्पना साकारली नाही हे फारच वाईट.

दवाइंडजी,रोहणजी,गणेशजी,नितीनजी
खुप खुप धन्यवाद.

नितीनजी,
चरखा हे केवळ शब्दविशेषन नसून ग्रामोद्योग आणि विकेंद्रीकरणाचे प्रतिक आहे.

गंगाधरजी ,तुंम्ही प्रत्येक सर्व समान्य मानसच्या मनातील भावनाच व्यक्त केल्या आहेत.या लोकांना असाच तडका देत राहा.