मि तुम्हाला शेतकरयां बद्दल आशी माहिती सांगणार आहे जी आजपर्यंत कोनत्याही मिडीयात किंवा पेपर मधे छापली जात नाही.
मराटवाड्यातील सगळ्यात मागसलेला जिल्हा म्हणुन बीड जिल्हाची ओळख होते तिथे ना रेल्वे , ना कोनतच उद्योग , बहुसन्खय लोकांचा शेती किंवा उसतोड मजुर म्हणुन पश्च्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यावर उस तोडनी चि कामे करने , शेतातील पीक प्रामुख्याने बाजरी , ज्वारी , करडी , पाणी आसेल तर उस कींवा कापुस . माझे वय २८ , पण मला जसे कळायला लागले तसा एखदाही दुश्काळ पडलेला नाही . पण पाण्यासाटी वनवन हि आहेच ,शेतकरी हा प्रामुख्याने आपल्याच शेतात काम करतो शक्य तो दुसर्या च्या शेतात किंवा ईतर जागेवर काम करन्यास जात नाही कींवा टाळतो , याचे मुख्य कारन म्हनजे त्याची गावात आसलेली पत . कींवा पुर्वी पासुन आसलेली परंपरा मग शेतात आसे किती रुपयांचे पिक येते व त्यावर त्याचे कुटंब चालते का नाही ?
शेतकरी हा ज्यावेळस शेतात काम नसते त्या वेळेस दुसरी कामे का करत नाहीत .शेतात पेरणी केल्या नतंर , १ ते २ महिने मशागत करावी लागते , त्याच्या नतंर ४ ते ५ महीने शेतकरी घरीच बसुन असतात या वेळी घरातिल लग्न समारंभ किंवा ईतर कार्यक्रम करतात , शेतकर्याच्या घरात जर लग्न आसेल तर , ही शेतकरी आपल्या मुलिला हुन्डा म्हणुन , १००००० रु वा या पेक्षा जास्ती जास्त देतात किंवा मुलासाठी घेतात .
वरति सोने , घरात लागनार्या वस्तु , ईतर काही , किंवा बाईक वगरे .
याचे कारन म्हण्जे शेतकर्या च्या गावातली परंपरा , लग्ना च्या वेळी सगळ्या गावात चुल बन्द आमन्त्रन आसते गावची लोकस्न्ख्या कमीत कमी १००० किवा जास्ती जास्त किती ही , परत मुलाकडची मन्डळी ट्र्कनेच लग्नासाटी येतात , कमीत कमी २ ट्र्क किवा जास्ती जास्त किती हि, हे सारे कर्ताना शेतकरी शक्यतो गावातिल एका मोट्या शेतकर्या कडुन व्याजाने रुपये घेतो ,
मग व्याज व मुद्दल त्याच्याकडुन फेडले जात नाही , तो व्यतित होतो व व्यसानाच्या आहारी जातो , व्यसानाच्या आहारी गेल्या नन्तर काही दिवसानी त्याच्या आसे लक्षात येते कि आपली दुसरी मुलगी कींवा मुलगा लग्नाच्या वयात आला आहे , मग तो शेती विकुन लग्न कर्तो ,राहिलेल्या शेती वर त्याची उपजिवीका होत नाहि व शेतकरी बाहेर हि कामाला जात नाही ....?
आता अनुदानाची गोष्ट सागतो , भहुसन्ख शेतकर्या अनुदान मिळते च मग शेतकरी हि आनेक प्रकरने सरकारी कर्याल्यात खोटिच दाखवतो ,आती वॄष्टि झालि यांना अनुदान , कमी पाउस यांना अनुदान , पिकावर रोग पडला यांना अनुदान, सारकारी आधिकारी ही थोडे फार पैसे घेउन फाइल मन्जुर करतात .
विविध बॅन्केचे काढलेल कर्ज हि तो फेडत नाही .अनुदाने , कर्ज , काढुन तो पैसे स्त्कार्याला लावत नाही ,
त्या पैस्यातुन तो मुला करीता बाईक घेतो , पत्ते खेळतो दारु पितो , देवाच्या वारया करतो , व ईतर ही गोष्टी करतो .
शेतात शेतकर्या पेक्षा शेत मजुरच काम करतात , मि ज्या वेळी गावाकडे जातो त्या वेळेस शेतकर्या चि ही मुले आपल्या गाडीवर फिरत आसतात .
शेतकरी हि शेतापेक्षा ईतर जागेवच जास्त वेळ घालवतात , आज हि मी सांगु शकतो कि शेतकर्या च्या शेतात शेतकर्या पेक्षा शेत मजुर च काम करतात , तिसरे कारन शेत मजुर एक वेळेस उपाशी राहिन पण आपल्या मुलाला शिक्षण देइल , शेतकर्या चे तसे नाही मुलगा शिकला तर शिकला नाही तर आहे आपली शेती आहेच , माझेच उद्दा देतो माझ्या गावात माझ्या वयाची १६० मुले आसतिल पण त्यातिल फक्त मी गावाच्या बाहेर शक्षिण घेतले जवळ पुरेसे पैसे नसतांना हि लोकांच्या मदतिवर ,मग हि मुले शिक्षण का घेत नाहित , याचे मुख्य कारन शेति कींवा त्यांचा पुर्वि पासुन आसलेला समज कि आपल्याला काय कमी आहे . शेत मजुराचे तसे नाही त्यांच्या कडे उपजिवीके चे साधन नसते त्या मुळे ते आपल्या मुलाला शिक्षण देतात आणि ति मुले आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज हि करतात , आसो.......
ज्या शेतकर्या कडे सुरवातिला ५ एकर जमिन होती आता त्यांच्याकडे १ एकर हि राहिलि नाही , कारन कुटंबाचा केलेला विस्तार , शेतकर्याला कमित कमी २ आणि जास्तीत जास्त ५ ते ६ मुले आसतात , एकत्र कुटुंब पध्दत आता खेडयात ही राहिली नाही , त्या मुळे त्याच्याकडे आसनार्या शेताची विभागनी होते ,
मग १ एकरात आसे किती पिक येनार , त्यात त्याचे घरही चालत नाही व तो दुसरी कडे कामाला जात नाही . आसे होत आसतांनाच त्या शेतकर्या च्या घरचे एखादे लग्न कींवा एखादा समारंभ निघतो व तो पुन्हा कर्जा ने पैसे काढतो व ते फेडता नाही आले कि आपली आहे ति शेती विकुन टाकतो मग पुढे काय ....
आजकाल तर शेतकरी कोणत्याही बँकचे कर्ज हि फेडत नाही उलट कर्ज माफीची वाट पाह्तो , कींवा सरकारी अनुदाने लाटत आसतो , खोटी कागद पत्रे सादर करुन .
तुम्हाला जर हे खोटे वाटत आसेल तर तुम्ही प्रत्यक्ष कधितरी मराटवाडयातील एखादया खेडे गावात जाउन यावे .
सरकार भरपुर अनुदान देते उदा : गाई , मह्से, शेळी , कोबडी , मत्सपालन , वुर्क्ष रोपन , यावर सरकार अनुदान देते , पन शेतकरी काय करतात ज्यावेळेस बँकेचे कींवा सरकारी आधिकारी चोकशी साठी येतात त्या वेळेस शेतकरी दुसरयाचिच , गाय , शेळी दाखवुन बँके चा पैसा उचलतात सरकारी आधिकारी ही थोडेफार पैसे घेउन फाइल मंजुर करतात.
मग शेतकरी घेतलेल्या कर्जतुन ना शेतीला पुरक व्यावसाय करतो , ना बॅंकेचे कर्ज फेडतो यातच तो कर्जबाजारी होतो मग पुढे काय ......
पण माझ्या गावात आसेही काहि शेतकरी आहेत की ज्यांना ना अनुदान मिळते ना कोनत्या बँकेचे कर्ज मिळते
बिचारे ६ महिने शेतात काम करुन उरलेले ६ महिने उसतोडनी साठी जातात आणी त्यातुन आलेल्या पैसे तुन आपल्या मुला मुलीचे लग्न करतात.
बरे शेतकर्याने आत्महत्या केली तर त्याचि खरी कारने शोधली जात नाहित
उदा :
१ ) शेतकर्याने का आत्मह्त्या केली ?
२ ) त्याने कोणत्या बँकेचे कर्ज काढले होते , व ते कशासाटी काढले , ज्याच्यासाठी काढले त्याचा त्याने त्याच कारना साठी उपयोग केला होता का ?
३ ) त्याने कर्ज कधी काढले , बँकेचे हाफ्ते भरले होते का ?
४ ) कर्ज काढल्या पासुन त्याने शेतात कोणकोणती पिके घेतली होती , व ति पिके वाया गेली होति का ?
५ ) शेतकरयाला कोणते व्यसन होते का ?
६ ) शेतकर्या च्या कुटुंबात कीती व्यक्ति आहेत , व ति कोणती कामे करतात , कि घरीच बसुन आसतात ?
७ ) शेतकर्या चे घरातील काही प्रोबलेम होते का ?
८ ) शेतकर्या ने नेमके कशासाटी कर्ज काढले होते ?
९ ) शेतकर्याने या आधि जमिन विकली होती का व का विकली कारने दया ?
१० ) शेतकर्याच्या घरात एखादे लग्न , कींवा एखादे मोटा समारंभ झाला आहे का ?
वरिल कारना चा विचार न करता शेतकर्या ने आत्मह्त्या केली , ति कशामुळे , का , याचा शोध न घेता लगेच त्याने कर्जा मुले आत्मह्त्या केलि आसे म्हणुन विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष त्यावर राजकारण करतात .
बरे शेतकर्याने शेतिसाठी कर्ज काढले तर ते कोनत्या कारना साठी
उदा :
१ ) बि बियाने , खते , किटक नाशके ,
२ ) नागरनी , फवारनी
३ ) मशागत , शेतमजुरी
४ ) विद्दुत पंप , कींवा शेतात पाइप लाईन
५ ) विद्दुत जोडनी
६ ) बैल , गाय , शेळी, म्हैस , कोबडया , मत्स पालन , इत्यादी साठी .
७ ) विहीर कींवा बोअर घेने
८ ) ट्रक्टर , बैलगाडी , व इतर आवजरे
याची पण पडताळनी व्हायला पाहिजे ............
आसो मि हे सर्व काही शेतकर्या चा विरोधक म्हणुन नाही लिहले हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत
आमच्या कडे ५ एकर शेती होती ति कोनत्या कारना साठी विकली तर , माझ्या बहिनी चे व चुलत बहिनी चे लग्न , शेती विकुन माझे आई वडिल आता दुसर्या च्या शेतात शेतजुर म्हणुन जातात कींवा उसतोड मजुर म्हणुन साखर कारखान्यावर जातात .
खरोखरीच शेतकरी का आत्मह्त्या करतो , याची खरी कारने शोधली पाहिजेत कर्ज माफी कींवा अनुदाने हा त्या वर चा उपाय नव्हे आपय आहे ?
काही खरी माहिती ..
१ ) शेतकर्याच्या कोनत्याच पिकाला हमी भाव दिला जात नाही , त्यामुळे दलाल शेतकर्या कडुन शेतिमाल कमी भावाने विकत घेउन शहरा च्या ठीकाणी कित्तीतरी आधिक भावाने विकतात .
२ ) शेतमालाची बाजारपेठ शेतकर्या च्या हातात नाही तिथे मारवाडी कींवा ईतर लोक आसतात .
३ ) जसे भारतात कोनत्याही वस्तुची फिक्स कींमत आहे तर मग शेतीमालाचिच का नाही .
उदा : कांदे १० रुपये किलो आहेत तर संपुर्ण भारतात १० रुपये किलो ने विकली गेली पाहिजेत आज कसे होते शेतकर्या कडुन ३ रुपये किलो ने कांदे घेउन ति १५ रुपये कीलो ने विकली जातात महण्जे फायदा कोनाचा ?
मि पुण्यात राह्तो ज्या वेळेस मी गावाकडे जातो त्या वेळेस वांगी , कांदे , भेंडी , टॅमाटो , ईतर भाजिपाला खुप झालेतर , ५ रुपये कीलो मिळतो कधी कधी तर २ कींवा ३ रुपये कीलो ने मिळतो मग शहरा च्या ठीकानीच का १५ ते ५० रुपये कीलो ने मिळतो महण्जे फायदा कोनाचा ,
आशी खुप कारने आहेत पण एक मत्र खरे , शेतकर्याने कष्ट करुन शेतीत माल पिकवला तरी तो त्या शेतमालाची व त्याच्य कष्टाची किंमत टरवु शकत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल, ति कींमत सरकरी आधिकारी , दलाल कींवा तुम्ही आम्ही ठरवतो .
४) साखरकारखाने ही उसाचे राजकारण करतात , एक कारखाना उसाला १५०० रुपये भाव देतो तर दुसरा कारखाना उसाला ६०० कींवा ७०० रुपये भाव देतो , मग मला प्रश्न्न पडतो की १५०० रुपये भाव देनार्या कारखान्याची साखर पांढरी आसते आणी ६०० कींवा ७०० रुपये भाव देनार्या कारखान्याची साखर काळी आसते का ?
कधीकधी तर ही साखरकारखाने शेतकर्या चा उस शेतातच राहुन देतात कारन काय तर तो आमुक तमुक पार्टीचा माणुस आहे , गरीब शेतकर्यांचे तर हाल विचर्याला नको .
५ ) महाराष्ट्रातील साखरकारखाने , कॄषीउत्तपंन्न बाजार समीती , भु विकास बँक , जिल्हा सहकारी बँक ,
या संस्थाशी शेतकर्या जास्त सबंध येतो पण या संस्था कोनत्या कोनत्या राजकीय पुढारयाच्या ताब्यात आसतात , म बँक , कारखाना तोट्यात चालतो आहे आसे दाखवुन त्यावर सरकारी पॅकेज मीळवायचे , ते पॅकेज स्वता: कडेच ठेवायचे शेतकर्याचे काय तो त्याचा काही करेल
मुळात महाराष्ट्रातील कोणतीच सह्कारी संस्था तोट्यात चालत नसावी पण सह्कार खात्याला लागलेली भ्रष्टाचारी नेत्याची धुळ ....
दिंनाक : ८/०९/०९ रोजी , लोकमत या र्वतमान पत्रात शेतकर्यांच्या आत्मह्त्या संबधी आलेली माहीती देत आहे .
सहा वर्षात बीड जिल्हायातील ३८२ शेतकर्याच्या आत्मह्त्या .
बीड , दि. ७ बीड जिल्हात गेल्या सहा वर्षात ३८२ शेतकर्याने आत्मह्त्या केल्या आहेत . यातील ११९ शेतकर्यांच्या आत्मह्त्या या कर्जबाजारीला कंटाळुन झाल्याचे सिध्द झाले आहे . १११ जणांच्या वारसांना शासनाची एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे, तर आट जणांच्या वारसांना मदत देण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरु आहे .
जिल्हाधिकारी भारत सासने यांच्या उपस्थितीत सोमवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात या आत्मह्त्या संदर्भात बैटक झाली. यात उर्वरित प्रकरणांवर चर्चा झाली . कायमस्वरुपी दुष्काळी हे बिरुद चिटकलेल्या बीड जिल्हात शेतकर्यांच्या आत्मह्त्येचे लोण पसरले आहे गेल्या सहा वर्षात ३७८ शेतकर्याने आत्मह्त्या केल्या आहेत . यात २००४ सली ११ जणांच्या आत्मह्त्या केल्या. त्या पैकी एक ही आत्मह्त्या कर्जबाजारीपणामुळे झाली नसल्याचे प्रशासनाने नमुद केले आहे . तर २००६ या एकट्या वर्षात जिल्हात १२४ शेतकर्यांच्या आत्मह्त्या झाल्या आहेत . या पैकी फक्त २३ आत्महत्या प्रशासकीय मदती साटी पात्र ठरल्या तर १०१ प्रकरणात कर्जबाजारीपणामुळे नसल्याचा शेरा प्रशासनाने मारला.
२००७ यावर्षात आत्मह्त्येचा सिलसिला कायम राहीला .याही वर्षी एकुण ९५ जणांनी आत्मह्त्या केल्या . पैकी ३९ प्रकरणात वारसांना शासकीय मदत मिळाली तर ५६ प्रकरणे नाकारण्यात आली . २००८ यावर्षी ८६ जणांनी आत्मह्त्या केल्या त्यातील ४४ शेतकर्यांच्या आत्मह्त्या मदती साठीग्राह्य धरुन उरलल्या ४२ प्रकरणात आत्मह्त्याचे कारण कर्ज बाजारीपणा नसल्याचे नमुद केले . २००९ वर्षात ५४ जणांच्या आत्मह्त्या झाल्या . यातील १४ जणांच्या वारसांना मदत मिळाली तर ३२ प्रकणे आपात्र टरविण्यात आहेत ४ शेतकर्यांचे अहवाल अद्दाप नाहीत
२००९ या चालु वर्षात आत्मह्त्या केलेल्या ४ प्रकणांचा अहवाल अद्याप प्रशासनाकडे आलेला नाही . या बाबत पोलिस आणि प्रशासन चोकशी करीत असुन अहवाल मिळाल्यानंतर ती प्रकरणे चर्चेसाटी येणार आहेत .
वरील माहीती जशासतशी मी दिली आहे ,
म्हण्जे सहा वर्षा कर्जबाजारीपणा मुळे फक्त ११९ शेतकर्यांने आत्मह्त्या केल्या बाकीच्या शेतकर्याची २६३ शेतकर्याची आत्मह्त्येची कारणे कोनती ? आणी ते कोनशोधनार ..
आसो माझी ही माहिती सर्व शेतकर्या चि आहे आसे नाही , काही शेतकरी आपल्या कष्टा ने आगदी खडक माळावर ही पीके घेतात . काही बीच्यारे शेती आसुन ही उपाशी राह्तात , काहीच्या शेतात तर काहीच पीकत फक्त नावाला शेती .
मायबोली वर पहीलाच प्रयत्न
वरील विचार आणि निरिक्षण एकदम
वरील विचार आणि निरिक्षण एकदम अचूक आहे यात काही शंका नाही...
हा विषय ज्वलंत आहेच. शेवटी
हा विषय ज्वलंत आहेच. शेवटी ज्याचे जळते त्यालाच कळते असे आहे. अन्नदात्याकडे भीक मागायची पाळी येते ही गोष्ट सुपरपॉवर बनू इच्छिणार्या देशासाठी घातक आणि लाजीरवाणी आहे.
अभ्यासपूर्ण लेख! पुलेशु!
अभ्यासपूर्ण लेख! पुलेशु!
क्या बात है, खुपच अभ्यासपुर्ण
क्या बात है, खुपच अभ्यासपुर्ण लेख.
विषयांतरः
माझी पण गावाला शेती आहे, वडिल असेपर्यंत आम्ही शेती करायचो, पण शेतात विहिर नसल्यामुळे फारसं पिकायचं नाही, मला शेतीचा फारच कंटाळा आला होता. शेती करणे म्हणजे निव्वड मुर्खपणा, असे वाटायचे, कारण राबराब राबुन हातात काही येत नव्हतं. नौकरी व पुण्याची फार आसक्ती होती, इथे येऊन ७ वर्ष झालीत. आता मात्र शेतीत पैसे गुंतवावेसे वाटु लागले. व तसं गावकडच्या भावाशी बोलणही झालं. शेतात विहर खोदली की अर्ध चित्र बदलतं असा इतर नातेवाईकांचा अनुभव आहे. आता मलाही तो अनुभव घेऊन बघायच आहे.
विषयांतर समाप्त.
मायबोली वर पहीलाच प्रयत्न ---
मायबोली वर पहीलाच प्रयत्न
--- प्रयत्न चांगला आहे. खुप ज्वलंत विषयाला हात घातला आहे.
लक्ष्मण, चांगलं लिहिलं आहेस.
लक्ष्मण, चांगलं लिहिलं आहेस.
छान लिहीलयस लक्ष्मण !! विचार
छान लिहीलयस लक्ष्मण !! विचार करण्यासारख , खरच ज्वलंत विषय आहे.
विषय चान्गला आहे. खास करून
विषय चान्गला आहे. खास करून विदर्भातलाच शेतकरी का आत्महत्या करतो हा मला बर्याच दिवसाचा पडलेला प्रश्न आहे!!
छान लिहीलस लक्ष्मण .
छान लिहीलस लक्ष्मण . आत्महत्येच्या मागची खरी कारण शोधली जात नाहीत हे सत्य आहे .
सरकारी कार्यालयात गरीब शेतकरी कश्या विनवण्या करतो , त्याची कशी पिळवणुक होते , कर्ज मिळण्यासाठी किती खेटे घालावे लागतात , खोटी कागदपत्रे तयार करणारे तयार असतात , त्यांना पण पैसा मोजावा लागतो . सरकारी दरबारी लुटतात . इतके सगळे करुन किती पैसा हाती पडतो. परत परतफेड .. दिवसेंदिवस वाढत जाणारे व्याज.
नापिकी ... कर्जावर कर्ज ... लग्न , गांवजेवण..इतर कार्य लोक लाजेस्तव , रुढीपरंपरा , मोठेपणा दाखवण्यासाठी ... व्यसन .... पैश्याची आवक कमी अन खर्च खुप
सावकाराकडे , मायबाप सरकारकडे पैश्यासाठी विनवण्या अन मग घेतलेले कर्ज माफ करण्यासाठी प्रार्थना .
कोण पावणार नवसाला ..... मग हाच जातो धावुन महादेवाच्या भेटीला
खरच खुप ज्वलंत विषय आहे हा.
खरच खुप ज्वलंत विषय आहे हा. नुकताच या विषयावरचा "गोष्ट छोटी डोंगराएवढी" हा सिनेमा पाहिला. डोक्याला सुन्न करणारा विषय आहे हा. आणि आपण काहिच करु शकत याची खंत.
फारच छान लेख आहे. केवळ जुने
फारच छान लेख आहे. केवळ जुने रीतिरिवाज पाळायचे म्हणून पैशाचा अपव्यय हे आधी थांबवले पाहिजे. शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे.
अमेरिकेत काय झाले, मोठ्या कंपन्यांनी शेतीची अवस्था पाहिली. त्यांना कळले की शेतकर्यांना शेती हा धंदा म्हणून कसा करावा, जास्तीत जास्त नफा कसा मिळवावा, हे कळत नाही. मग त्यांनी त्यांच्याकडच्या काही एम बी ए लोकांना हाताशी घेऊन बरीचशी शेती चक्क विकत घेतली. नि ती, जणू कॉर्पोरेशनच, असे समजून चालवली. म्हणजे आता इथे हे नवीन, शिकलेले शेतकरी आले. अशिक्षित शेतकर्यांना झक मारत शिक्षण घेऊन इतर कामे करावी लागली. पिके जोरात येतात, भाव मर्यादेत, शेतीचे काही प्रॉब्लेमच नाहीत.
एकदा शेतकरी म्हणून जन्माला आला म्हणजे शिकायचे नाही? शेतीच करायची तर जरा डोके चालवून नाही करायची? आम्ही अशिक्षित, आम्ही दलित म्हणून नुसते रडणार्यांचे हे जग राहिले नाही. आजकालच्या तंत्रयुगात शिक्षणाखेरीज काही इलाज नाही हो.
चांगला लेख. असे असेल माहीतच
चांगला लेख. असे असेल माहीतच नव्ह्ते.
(No subject)
लेख आवडला.
लेख आवडला.
विषय चान्गला आहे. खास करून
विषय चान्गला आहे. खास करून विदर्भातलाच शेतकरी का आत्महत्या करतो हा मला बर्याच दिवसाचा पडलेला प्रश्न आहे!!>> विदर्भातीलच नाही, आंध्र मध्ये पण शेतकरी आत्मह्त्या करतात हे वाचलेलं आहे. आत्महत्तेची काही कारण खालीलपैकी.
१) पाण्याची (सिंचनाची )सोय नाही.
२) पश्चिम महाराष्ट्रीय माणसाच्या तुलनेत विदर्भीय माणुस जरा आळशी व उधळया स्वाभावाचा आहे.
३) शेतात विहिर खोदुन पाणि पुरविणे वैगरे तिकडे तेवढे प्रचलित नाही.
४) दोन पिक घेणे पण फारसं दिसत नाही.
५) जास्तित जास्त शेतकरीवर्ग अशिक्षीत आहे.
६) आधुनीक शेतीची आजुन सुरुवात व्हायची आहे.
७) माझ्या सारखे शिकलेली शेती करुन मालक वणन्यापेक्षा नौकरी करण्यात धन्यता मानतात हे एक मोठी शोकांतिका आहे.
८) विदर्भातील शेतकरी मुलीच्या लग्नासाठी जसे शेती विकतो, तसेच शाळेत बाबु (कारकुन) ते प्राध्यापक अशा १०-१५ हजार पागाराच्याअ नौक-या मिळविण्यासाठी शेती विकून ८ ते १५ लाख रुपये डोनेशन देण्यात धन्यता मानतो.
९) माझ्यासारखे सुशिक्षीत तरुण शेतीकडे उदासिनतेने बघतात हि आहे खरी शोकांतिका.
१०) विदर्भातिल राजकारणि शेतक-याच्या विकासा संबधीत पाऊल उचलतान कमी पडतात.
विदर्भातिल तरुण वर्ग शेती करण्यापेक्षा पुण्या मुंबईत येऊन नौकरी करण्याला प्राधान्य देतो.
हायब्रीड बियाणांचा अतिरेक,
हायब्रीड बियाणांचा अतिरेक, रासायनिक खतांचा अतिरेक, शेतीविषयक धोरणाचा अभाव, शिकलेल्यांना शेती करायची लाज वाटणं असेही काही मुद्दे यात आहेतच.
पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद
पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद , लेखनात चुका आसतील पण देवनागरी लीपीत माझा हा प हीलाच प्रयत्न आहे (की बोर्डवर टाईप करण्याचा )सवयीने हळु हळु चुका सुधारण्याचा प्रयत्न करेल .
चांगला लेख, आत्महत्यां मागची
चांगला लेख, आत्महत्यां मागची खरी कारणं कुणिच शोधणार नाही कार्ण त्यात राजकारण्यांचा फायदा नाही. काही वर्षांपुर्वी अशाच वेठबिगारींच्या खोट्या केसेस बघितल्या होत्या ज्यात श्रीमंत शेतकर्याकडुन पैसे उकळ्ण्याचा प्रकार व्हायचा, पेपरात मात्र या खोट्या आदिवासी नेत्यांच्या नावाने उदोउदो व्हायचा.
शेतीमालाला हमी भाव- हे सुद्धा अर्ध सत्य. उदा. भात खरेदी केंद्रांवर भाताला हमी भाव मीळतो. तीथे जाडे,किंवा न साफ केलेले भात विकायचे आणि धान्य दलालाना चांगला माल विकायचे असे होते.
फलोद्यान, कृषीपंढरी या आणि अशा अनेक चांगल्या योजनांची अशीच वाट लागली. केवळ सरकारला दोष देणे सोप्पे आहे .
अर्थात शेतकर्यांची अशीही बाजु आहेच पण त्यात राजकारण नको येव्हढेच
खुपच अभ्यासपुर्ण लेख.
खुपच अभ्यासपुर्ण लेख.
लक्ष्मणराव, अत्यन्त अचूक
लक्ष्मणराव, अत्यन्त अचूक नेमक्या वर्मावर बोट ठेवले आहे
व ते ही अन्य कोणत्या जातीला/पश्चिम महाराष्ट्राला वगैरे नावे न ठेवता केलेले हे आत्मपरिक्षण (हा शब्द चूकीचा आहे - परिस्थितीचे मूल्यमापन असे हवे) मनास सहज भिडते.
वरील बाबी बघता, कोकण व पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील परिस्थितीची तुलना ओघानेच येते व केली जाते
अगदी परवाच घरात हा विषय चर्चेला होता
पन्चवीस वर्षान्पूर्वी "कोकणातील" बहुसन्ख्य ठिकाणची परिस्थिती अशीच वा याहून बिकट होती, मूळात तिकडे पाणी नाही, पावसाळ्याच्या दिवसात पडणारे पाणी जसेच्या तसे वाहून जाते, सिन्चनाचि काडीचीही सोय नाही, जी काय धरणे झालीत ती वीजनिर्मितीसाठी, पिके म्हणाल तर एकही पीक नगदी नाही. सर्व शेती केवळ अन केवळ निसर्गावर अवलम्बुन
जमिनी म्हणाल तर त्याही सलग नाहीत, दोन चार गुन्ठ्याना तुकडा असला तरी फार मोठ्ठा म्हणाव लागेल अस वास्तव
अन्य निसर्गसम्पदा(?) मात्र भरपुर
रोजचे खाणे अन वस्त्र लेणे याबाबत आनन्दीआनन्द!
बहुतान्श घरे पुण्यामुबैहून येणार्या पैक्यावर चालायची!
उण्यापुर्या वीसपन्चवीस वर्षान्पूर्वीचे हे डोळ्याने पाहिलेले चित्र
मात्र यात बदल होत गेले
ते आपोआप झाले नाहीत तर घडवुन आणले गेले, कुणा एकाच्या प्रयत्नाने नव्हे तर सगळ्यान्नीच आवश्यक बदलाची नान्दी ऐकुन त्याप्रमाणे निश्चितपणे कृती करत गेले
कसे?
ज्यावेळेस मराठवाडा नि विदर्भ "नामान्तराच्या" प्रश्नावरुन एकमेकान्ची डोकी फोडण्यात व्यग्र होते, तेव्हाच, कोकणात, कोकण कृषी विद्यापीठ, अन तेथिल "पुढारलेले" शेतकरि यान्च्या सुयोग्य प्रयोगशील प्रयत्नान्चे योग्य ते अनुकरण करुन बाकी शेतकर्यान्नी शेतीव्यतिरिक्त अन्य उद्योगात लक्ष घालावयास सुरुवात केली
आम्बा लागवड हा त्यातिलच एक छोटा भाग. आज कोकणात गावोगावी आम्ब्याच्या रसाच्या क्यानिन्गचा गृहोद्योग चालू आहे. अक्षरष सिझनला डोळ्यान्चे पारणे फिटते ते बघितल्यावर
कोकणातल्या कोणत्याही देवस्थान्/पर्यटन स्थळावर जा, तुम्हाला हुकमी कोकम सरबत व अन्य प्रॉडक्ट्स मिळतील
पन्चविस वर्षान्पूर्वी हे असले काही नव्हते, व हे घडले ते आपोआप घडले नाही. तेथिल लोकान्नी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन हे घडवले
पूर्वजान्नी लावलेली झाडे केवळ सरपणाकरता वा घरासाठी वा अन्य पैशाकरता तोडून सर्व परिसर "वैराण" रखरखित वाळवण्ट बनण्याचे आधीच, त्या लोकान्नी जाणिवपूर्वक लागवडी केल्या, असलेल्या देवराया व गावकीची राने राखून ठेवली, स्वतःच्या जागेत कावडी कावडीने वा डोक्यावर हण्डे घेऊन पाणी घालून झाडे जगवली, अन आज तीच लोक त्याची फळेही चाखताहेत.
सामाजिक रितीन्बाबत तर हे फरक भयानकरित्या जाणवतात
पुणे जिल्यातील मावळ भाग अन कोकणचा भाग सोडला तर आख्ख्या महाराष्ट्रात, "गाव जेवण" या करता स्वयम्पाक रान्धण्यापासून वाढून होईस्तोवर सर्व सर्व काही "यजमानासच" करावे लागते
नेमके याचे उलट, मावळ व कोकणात होते, तिथे यजमानास त्याची खर्चाची व कामाची "तयारी" विचारली जाते, तो सान्गतो, गाववाल्यान्ना विनन्ती करतो की हे कार्य निभावुन न्या, गावकरी माना डोलावतात, शिधा उचलतात, नि आख्खा स्वयम्पाक रान्धण्यापासून वाढून शेवटी गावकीची भाण्डीकुण्डी घासुन पुसुन जागेवर जाईस्तोवर आख्ख गाव घरच्या कार्यागत खपत व दोन अडीचशे पासून हजारभर माणसे, प्रसन्गोपात गावातील वा पन्चक्रोशीतील, दोन घास सुखाने जेवुन "तृप्त" होऊन जातात, ते ही यजमानास दुवा देत, त्याचे नाव काढीत!
जर यजमानाकडे पुरेसा पैसा/शिधा नसेल, तरी देखिल गाव "सवाईकीने" त्याची तरतुद करते, कमित कमी खर्चात "कार्य कसे निभावेल" हेच बघितले जाते.
हा असा प्रकार मी माहाराष्ट्रात अन्य कुठेही बघितला नाही,
अन जे काही बघितले, त्या बद्दल लिहायचे तर या व्हाईट कॉलर्ड भाषेत लिहीणे मला शक्य नाही!
असे अनेक मुद्दे तुलनेकरता आहेत.
माझा प्रश्न इतकाच की, व लक्ष्मणरावान्च्या वरील लेखातील प्रामाणिक विवेचनावरुन तो प्रकर्षाने जाणवला की, दर वेळेस प्राप्त परिस्थितीबाबत उच्चवर्णियान्नाच जबाबदार धरण्याची व त्यात त्यान्चे "कावे" शोधण्याची, मोस्टली "राजकारणी व नक्षलवाद्यान्नी पसरवलेली" वैचारिक "धुन्दी" बाकी ग्रामिण/शहरि भागातील समाज केव्हा सोडून देणार???
कृपया माझ्या वरील पोस्टला
कृपया माझ्या वरील पोस्टला "झब्बू" समजण्यात येऊ नये
लक्ष्मणरावान्नी प्रश्नाचि एक बाजू निरलसपणे मान्डलि
त्याचाच दुसरा कन्गोरा, स्थान/प्रान्त विषयक वेगळेपणातून मान्डायचा मी प्रयत्न केला!
मावळ व कोकणातील माणसे जात्याच
मावळ व कोकणातील माणसे जात्याच महाचिवट, त्यान्च्या चिवटपणाचे एकेक किस्से आहेत. भगिरथानन्तर हीच लोक अस म्हणता येईल इतकी कष्टाळू
ही लोक कसल्याही कामास लाजत तर नाहीतच पण अन्गचोरपणा करुन मागेही हटत नाहीत हा स्वानुभव आहे.
शेतमालास मिळणार्या "भावाचा(?)" प्रश्न यान्नाही सतावत होता/सतावतो.
यान्नी यावर काढलेले उपाय बाकी जनांस डोळ्यात अन्जन घालणारे ठरावेत
आख्ख्या गावचेच नव्हे तर पन्चक्रोशी, अशा अनेक पन्चक्रोशा, यातिल ठराविक प्रकारचे उत्पन्न ठराविक दरानेच द्यायचे अन्यथा वस्तू झाडावर्/खाली सडू द्यायची पण कमी भावात्/भाव पाडून व्यवहार करायचा नाही असा अलिखित नियम, "कोणत्याही सन्घटना/फुडारी/सन्स्था' यान्चेशिवायच लोकान्नी घालुन घेतला, सुरवातील महाजड गेले, पण एकदा ती वहिवाट झाल्यावर आता पन्चवीसएक वर्षानन्नत त्यात वेगळे विशेष काही वाटेनासे झाले इतका तो तेथिल सामान्य नियम झालेला आहे.
यास कोठेही कागदोपत्री पुरावा नाही
पण परिणाम व सद्य परिस्थिती हाच याचा पुरावा
तेथे नम्बर एकचा आम्बा, तुम्ही आम्ही पुण्यामुबैच्या बाजारात बघुच शकत नाही, तो सर्व निर्यात होतो व चढ्या दराने!
तेथिल नम्बर एकची सुपारी येथिल बाजारात बघायला देखिल मिळत नाही
तेथिल एक नम्बर नारळान्चे तसेच! येथिल बाजारात केरळी व इतर नारळ घाउकमधे अगदी चार पाच रुपयान्पासून दहा बारा रुपयान्पर्यन्त दलाली/वाहतुक खर्च धरुन इथे मिळतात, तर तेथिल नम्बरी नारळ जागेवर आठ रुपयान्पासुन पुढेच विकला जातो.
कोकम, हे एकेकाळचे अत्यन्त दुर्लक्षित व रानटी ठरवले गेलेले पीक, आज कोकमच नव्हे तर चक्क करवन्दापासूनचे प्रॉडक्ट्स देखिल त्यान्नी तयार करुन लोकान्चे गळी बाजारात उतरवले आहेत. आवळा/हिरडा-बेहडा अन अनेक, कितीकान्ची जन्त्री करावी?
काजुचे तसेच, नम्बरी काजु इथे बघायलाच मिळत नाही!
या सर्वच झाडान्चि मुद्दामहून लागवड करुन, असलेली रानं टिकवुन ठेवून त्यान्नी हे साध्य केले.
कितीही गरीबी असेल, वेळेस लन्गोटी लावुन अर्धपोटी असतील, पण तिकडच्या लोकान्च्या चेहर्यावर कधी दीनवाणेपणा वा लाचारी क्वचितच दिसेल.
निसर्गदत्त गोष्टीन्चा कणनकण वापरुन घेण्याचे त्यान्चे कसब अवर्णनीय! कोणतीही गोष्ट "टाकुन्/फेकुन्/जाळून" टाकायच्या आधी त्या त्या वस्तुची परमोच्च उपयोगिता करुन घेतली की नाही हे तपासले जाते. त्याकरता कोणत्याही एमबीए वा अन्य पदवी शिक्षणाची गरज त्यास नसते. समृद्धी आपोआप येत नाही, तर असलेली साधनसम्पत्ती कशाप्रकारे "खर्ची" टाकली जाते त्यावरही असलेली समृद्धी टिकून रहाणार, वाढणार कि नष्ट होणार हे निश्चित होते, व हे सम़जण्याची त्यान्ची कुवत दान्डगी आहे. त्यान्च्या प्रत्येक कृतित ते दिसुन येते.
खर्चिक कम्बरडे मोडू शकणार्या रुढी परम्परान्ना एकदम औरन्गजेबी थाटात फाटाच देण्यापेक्षा, त्याच रुढी-परम्परात सोईस्कररित्या आमुलाग्र बदल घडवुन आणल्याची उदाहरणे देखिल येथेच पहायला मिळतात. त्यामुळेच आधिच्या पोस्ट मधे वर्णन केलेले "गावजेवण" ही शिक्षा न वाटता त्यान्ना एक "पुण्यकर्मच" वाटले तर त्यात् नवल नको.
अन तरीही, एकजण हे खर्च करतो तर मी "लोकान्ना दाखविण्यासाठी" अजुन दुसरे त्याहुन जास्त खर्च करीन ही इर्ष्या तिथे फारच कमी आहे. या ऐवजी, याने येवढे उत्पन्न काढून या वर्शी हे हे केले, तर मी पुढल्या वर्षी त्याहुन जास्त करुन दाखविन हीच इर्षा जास्त प्रमाणात दिसते. अन्थरुण पाहून पाय पसरावे ही उक्ति तिथे जागोजागी आढळते. तर हुन्डा/वरदक्षीणा इत्यादी प्रथा जवळपास "नाममात्र" उरल्याचे दिसून येते. लाखालाखान्च्या भाषा या देशावरल्या/घाटावरल्या! कोकणी समाज मात्र अजुनही आणे/रुपयाच्याच भाषेत बोलतो.
अत्यन्त नशिबाने, पश्चिम महाराष्ट्र - उसासारखी नगदी पिके जी तिन वर्षेपर्यन्त माणसास "आळशी" बनवुन ठेवू शकतात, नसल्याच मुळे, त्यान्ची उद्यमशीलता शाबूत राहिली आहे असे म्हणावे लागते.
पुण्यामुबैशी पहिल्यापासुन म्हणजे जवळपास शम्भर वर्षे, या ना त्या कारणाने सम्पर्क असल्याने, वैचारिक सुधारणान्चे वारे यान्ना लौकर अनुभवायला जरी मिळाले, तरी ते वेळेत आत्मसात करण्याचे यान्चे कौशल्य नाकारता येत नाही.
लीबुजी , तुमचे विचार आणी
लीबुजी , तुमचे विचार आणी आभ्यास पुर्ण माहीती मला आन्खी काही गोष्टी वर प्रकाश पाडण्यास मदत करते . मुळात मराठवाडया पाउस खुप कमी पडतो , नदया नाहीत धरने कमी आहेत , आणी जीराइती जमीन पण कमी आहे , कोकणात जसे आम्बे , नारळ , काजु , फणस , सुपारी , करवन्द , मासे, आण्खी काही उत्पन्न देनारया गोष्टी आहेत मराठवाडयात आसे काहीच नाही ज्याच्या पासुन काही उत्पन्न मीळु शकेल . मुळात पीण्याच्या पाण्यासाटीच ४ ते ५ कीलोमीटर पायपीट करावी लागते तिथे दुसरे काय पिकनार . जसे कोकणाचे फळ -आंबा , नासि़क - द्रांक्ष , जळगाव - केळी , नागपुर - संत्रा , मराठवाडयात - ????? मराठवाडा हे ज्वारी आणी बाजरी यांचे कोठार समजले जाते बाकी काही नाही . बरे नवीन काही पीके घेयाची म्ह्टली तर तो एक मोठा विनोद आहे , उदा: एका शेतकर्याने कापुस केला आणी त्यात त्याला थोडे पैसे मीळाले की पुढच्या वर्षी गावातले सगळे शेतकरी कापुसच करनार , मग भरपुर कापुस झाल्या मुळे त्याचा भाव पडणार अन तुर डाळ , हरभरा डाळ , यांचे भाव वाढनार , कारन लोकांनी खाण्याचे आन्यधान्य च पीकवले नाही , परत सगळे शेतकरी पुन्हा तेच ...नावीन्य काहीच नाही , आसो मराठवाडयात शतर्यांना चांगल्या मार्गदर्श ना ची गरज आहे . लोक खुप कष्टाळू आहेत पन राजकीय उदानसीता आणी आनखीन काही .
दरवर्षी संकरीत बियाणांमधे
दरवर्षी संकरीत बियाणांमधे जाणारा पैसा शेतीला सगळ्यात महाग पडतो.
सगळ्या शेतकर्यांनी शेताच्याच
सगळ्या शेतकर्यांनी शेताच्याच एका कोपर्यात गांडूळशेती करुन अक्षरशः सोन्यासारखं असणारं गांडूळ खत करावं. शेणखतापेक्षा कितीतरी अधिक पटीने पाणी धरुन ठेवायची क्षमता या खतात असल्याने दुष्काळी भागात फार उपयुक्त आहे. पिकांना वेगवेगळी रासायनीक खते (एकप्रकारे विषच) देऊन मिनरल्सची कमतरता दूर करण्यापेक्षा हे खत द्यावं कारण या एकाच खतात सर्वच्या सर्व आवश्यक मिनरल्स जमिनीला मिळतात आणि पुर्णपणे नैसर्गिकरित्या वाढलेलं पिक हे नक्कीच सकस अन्न पुरवतं. रोपांची पानं फुलं फळं याच्या क्वांटीटी व क्वालिटी मधे लाक्षणिक फरत दिसून येतो.
सर्वतर्हेचे अन्न खाण्याच्या बाबतीत चोचले असलेली आणि त्यामुळे स्वास्थ्यासाठी औषधांवर कशीबशी तब्बेत सांभाळणारी व्यक्ती व सर्वप्रकारचं अन्न योग्यप्रमाणात घेवून योग्य अंगमेहनत करणारी व्यक्ती यांच्यात जसा फरक असेल तसा फरक शेतीच्या बाबतीतही दिसेल.
बरं, गांडूळ शेतीसाठी कच्चा माल तर जवळजवळ फुकटच उपलब्ध असतो. फक्त विशिष्ठ जातीची गांडुळे (ज्यांची विष्ठा, सिक्रीट होणारे द्राव हे घाण वास नसणारे असतात) सुरुवातीला विकत घ्यावी लागतात तिही अल्प मोबदल्यात. नंतर ती आपोआप मल्टिप्लाय होतच जातात. जास्तीची गांडुळे इतर गरजू शेतकर्यांना फुकट द्यावीत. पेंढा, गोवर्या, पालापाचोळा, उरलेले आंबोण, घरातला बायोडिग्रेडेबल कचरा हाच तर कच्चा माल असतो. फक्त त्या वर्मिकल्चरची नीट काळजी घ्यायची. ती तर एरव्हीही आपापल्या व्यवसाय नोकरीत घ्यावीच लागते.
कचर्याचे निर्मुलन, प्रदुषणाला आळा व कचर्यातून सोनं. किती फायदेशिर सौदा आहे ना? फक्त योग्यप्रकारे मार्गदर्शन करणार्या संस्थांकडून माहिती करुन घ्यावी कारण या संस्था पुर्ण प्रोसेसभर तुम्हाला हे प्रशिक्षण देवू शकतील. कुठल्यातरी प्रदर्शनातून मिळालेली तुटपुंजी माहिती व गांडुळे घेवून घरी आल्यावर पुढे काही गरज पडली तर हे प्रदर्शनवाले गायब झालेले असतात व त्याच बरोबर आपला उत्साहसुद्धा गायब झालेला असतो (हे मी पाहिलेल्या उदाहरणांवरुन सांगत आहे).
ठाण्यात DIL ही कंपनी त्यांच्या कर्मचार्यांना हे प्रशिक्षण देववून त्यांच्या कँपसमधून गांडुळखतापासूनचे अॅडिशनल उत्पन्न घेतेय. हेच खत त्यांचे लॉन, झाडेही गुटगुटीत करतंय.
बरेच विषयांतर झालंय खरं पण अगदीच राहवलं नाही. छोटासा का होईना पण शेतकर्यांच्या बाबतीतला "खत" हा महत्वाचा मुद्दा आहे.
खूप सुंदर लेख आणि अभ्यासपूर्ण
खूप सुंदर लेख आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद. खतांचा मुद्दा अगदी रास्त. हे कुणीतरी त्या शेतकर्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. झुलेलाल???
शेतक-यांच्या आत्महत्यांच्या
शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर सद्ध्या
बरीच चर्चा आणि उहापोह सुरु आहे. या समस्येची
उकल करतांना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे
आणि सुचविलेले उपाय बघितले तर "शेतकरी
मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्त्येची
कारणमीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद
करा" अशा स्वरुपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया
शेतकरी समाजमनात उमटल्याशिवाय राहत नाही.
ज्यांना शेतकरी आळशी किंवा कामचुकार आहे
असे वाटते त्या सर्व मान्यवर तज्ञानी आयुष्यात
एकदा तरी सलगपणे काही दिवस शेतकरी
समाजासोबत (पाटलाच्या वाड्यात कि वा
राजकीय पुढा-याच्या बंगल्यात नव्हे ) घालवायला
हवे. त्याखेरीज शेतकरी कशाला म्हणतात आणि
तो किती कष्ट करतो हे समजणे शक्यच नाही.
४-५ तास किंवा अर्धा-एक दिवस शेतक-याच्या
झोपडीत घालवल्याने जर कुणाला शेतकरी
समजला असे वाटत असेल तर खुशाल वाटू दे,
पण हा देश आपण कोण्या कामचुकार,आळशी,
अलायक तज्ञांच्या हातात सोपवला असा प्रश्न जर
कोण्या ग्यानबाला पडला,तर त्याच्याशी वाद
घालता येईल पण त्या ग्यानबाच्या प्रश्नाचे समर्पक
निराकरण करता येईल.?
अपूर्ण ...
गंगाधर मुटे
For More Pls Visit .
http://gangadharmute.blogspot.com/
अगदी माहितीपूर्ण लेख. आज,
अगदी माहितीपूर्ण लेख. आज, एवढ्या उशीरा वाचला मी. प्रतिसादही चांगले आहेत.
Why Indian farmers are
Why Indian farmers are committing suicide:
World Bank forced India to open up its seed sector to global corporations like Monsanto; corporate seeds need fertilizers and pesticides and cannot be saved... poor peasants forced to buy new seeds for every planting season (huffingtonpost.com)
http://www.huffingtonpost.com/vandana-shiva/from-seeds-of-suicide-to_b_1...
http://www.reddit.com/r/reddit.com/comments/cgdvv/why_indian_farmers_are...
लक्ष्मण, चांगला विषय घेतला
लक्ष्मण, चांगला विषय घेतला आहे ...
रंगासेठ्,मुटेजी पुर्ण अनुमोदन !
मधुकर ....तुम्ही अगदी सत्य मांडलय ..!
Pages