नशिबाने आज थट्टा मांडली.

Submitted by suryakiran on 18 April, 2010 - 02:37

रोजच्या प्रमाणेच , शितल अरूणला उठवायला त्याच्या बेडरूम मधे गेली. अरूण बिचारा मस्त साखरझोपेची स्वप्न पाहण्यात मग्न असावा, तेवढ्यात शितल त्याला ऊठवून म्हणाली आज ऑफिसला जायचं नाहीये का? आता पुरे झाली झोप ऊठा आता. तोंड जरासं वाकडं करून अरूण उठला, अन म्हणाला ऑफिस , बॉसची कटकट रोजचं तेचं काही नविन घडेल का गं आयुष्यात आपल्या? शितल हसली अन म्हणाली आयुष्याचं माहीत नाही पण आज घडेलं. अरूण म्हणाला आज काय आहे असं, शितलं हसली अन उरका लवकर म्हणून लाजून निघून गेली. अरूण आपला, वेड्यासारखं डोकं खाजवतं शितलच्या बोलण्यावर तर्क करू लागलां , काही सुचलं नाही अन लगेच अंघोळीला निघून गेला.

शितल स्वयपाकघरात मस्त अननस शिरा बनवण्यात व्यस्त होती. हसतं होती, गालातल्या खळीत अगही मधाचे टपोरे थेंब झेलतं. अरूण अंघोळीवरून आला अन तिला मिठीत घेवून पुन्हा विचारलं , राणीं सांग ना काय आहे खास आजं? ती म्हणाली संध्याकाळी बाहेर जाऊ फिरायला मगच सांगेन. येताना जमल्यास लवकर या. मला जेवढी लाडि गोडी लावताय ना अता, तेवढीच बॉस ला लावा म्हणजे लवकर सोडीन तो तुम्हाला. अरूण डोळे मिचकवत निघून गेला, अन ऑफिसच ऊरकून जायला निघाला. पण जाता जाता पुन्हा एकदा त्याने डोळ्याच्या इशार्‍याने शितलला विचारलं सांग ना म्हणून , तेवढयात डोळ्यासमोर हजार चांदण्याचा सडा पडल्याचा आनंद घेवून ती थोडा धिर धरा म्हणाली.अन अरूण बाय म्हणून ऑफिसवर गेला. शितल खुश होती. आनंदात होती अरूणच्या डोक्यात मात्र एकच विचार , काय असेल आज. शितलंचा वाढदिवस तर नाहिये ना? आमच्या लग्नाचा वाढदिवस तर नाहिये ना? या सारखे विचार तो करू लागलां. बस स्टॉप वर सुद्धा त्याच्या मनात हेच सारे प्रश्न.

अरूण ऑफिसात पोहचलां खरं पण सारं लक्ष त्याचं घराकडे अन शितलच्या त्या मधाळ स्मिताकडेच होतं. पुन्हा एकदा त्याला करमेनासं झालं अन लगेच शितलंला फोन लावला. कित्येक वेळ रिंग वाजूनही फोन उचलला नाही यावरून अरूण थोडासा चिडलाही. पण पुन्हा विचारलं काय आहे राणी, सांग ना माझं अजिबात कामात लक्ष लागतं नाहींये. शितल पुन्हा हसली, अन म्हणाली मन लावून काम करा, संध्याकाळी नक्की सांगेन. अरूण बिचारा , फोन ठेवून कामात लक्ष देऊ लागलां, पण शितलचा आनंद आठवून तो मनास तिच्याशिवाय कुठेच एकाग्र करू शकत नव्ह्ता. डबा खायलाही त्याला मन लागत नव्हतं पण शितलंला हे कुठून जाणवलं कुणास ठाऊक तिने फोन लावला अरूणला अन म्हणाली शिरा खुप छान झालाय, माझ्यासाठी खाऊन घ्या, खुप आवडेल तुम्हाला. मीच तिथे येऊन भरवतेय तुम्हाला असं इमॅजिन करा अन खाऊन घ्या बघू.

संध्याकाळचे चार वाजत आले, अरूण इतर वेळी बॉस कॅबिन मधे जायला घाबरायचा पण आज तो थेट गेला, अन म्हणाला आज मला ऑफिसातून लवकर जायचयं. बॉस ही काहिचं न विचारता जा म्हणाला याचं अरूणला खुपचं आश्चर्य वाटलं त्याचा विश्वासच बसेना. "खुशियों कि हो रही हैं बारीश्,तो भगवान भी साथ मे भिग रहा हैं" असचं त्याच्या मनात आलं अन तो बॅग उरकून घरी जायला निघाला. बसस्टॉपचं अंतर इतकं दुर नव्हत तरीही मैलो नं मैल चालल्यासारखं तो धापा टाकत चालत होतां. स्टॉपवर आला बसची चातका सारखी वाट पाहत होता. रोजची ती गुलाबाची फुले विकणारी मधूरा, तिथेच त्याच्या जवळ उभी राहून हसत होती, अन एक तरी फुल घ्या म्हणून आग्रह करत होती. रोजचा कंजूसपणा करणार अरूण आज फुलांचा बुके घेतोय, हे पाहून तीने एक फुल एक्स्ट्रा दिलं त्याला अन म्हणाली माझ्याकडून दया तुमच्या बायकोला. अरूण हसला अन नक्की देतो म्हणाला.

बस येत होत्या पण थांबत नव्हत्या, अरूण चिडत होता , मनातल्या मनात शिव्या देत होता. तेवढ्यात त्याला रस्त्याच्या पलिकडून एक बाई येताना दिसली, तिच्या डोक्यावर भलं मोठं ओझं , पाठिवर बांधलेलं नागडं लहान पोर, अन बोटाला धरलेली झिंज्या सावरत पुढे पुढे आईला खेचणारी पोरं दिसली. त्याला ते पाहून गरिबी काय असते याचं दर्शन घडतं होतं. त्या बिचार्‍या बाईला हा आयुष्याच्या ओझ्याचा बोजा घेवून बस रस्तादुभाजकावर असलेल्या झाडाखालचा अडोसा हवा होता. अरूणला ते पहावलं नाही थोडया वेळासाठी आपलं वैयक्तिक आनंद विसरुन तो त्या बाईच्या मदतीसाठी धावला. अन तिच्या जवळ जाऊन मदत करू का म्हणून विचारलं तेव्हा त्या बाईच्या डोळ्यातून टचकन पाणी आले अन हो म्हणाली, अरूणने तीच्या डोक्यावरचं ओझ घेतलं अन त्या पोरीला बोटाला धरून चल म्हणाला. रस्ता क्रॉस झाला, त्याने ओझ त्या झाडाखाली ठेवलं अन पोरीला तिथे बसवून, तिच्या हातात एक गुलाबाच फुल दिलं तो पर्यंत त्या पाठीवरच्या पोरालां उराशी कवटाळून ती झाडाखाली येवून बसली. अन म्हणाली दादा, खुप उपकार झाले तुमचे. अरूण सुद्धा गहिवरून आला ते ऐकून. तेवढ्यात त्याची बस समोर स्टॉपवर थांबतेय हे पाहून शितल अन लवकर घरी जायची आठवण त्याला झाली. तो बस च्या दिशेने धावला, बस जवळ गेला .. बस निघत होती अन तो बस मधे चढायची घाई करत होता, मधुरा अन इतर लोक अहो थांबा पडाल खाली म्हणून ओरडत होती पण अरूण त्याच्या धुंदित होता. अन फक्त तिन बोटांच्या आधारावर तो बसच्या दरवाज्याला लटकला, सिग्नल बर बस येताच ड्राइव्हर ने महाभारतात रथाचा आसूड खेचावा तसा ब्रेक दाबला अन अरूणचा तोल गेला अन तो खाली पडला,तो थेड त्याच्या डोक्यावरचं अरूण कसाबसा सावरणार तेवढ्यात वाळून भरलेला ट्रक वाहतूक पोलिसांना चुकवत, तिथून भरदाव वेगाने निघून गेला.

गर्दि जमली, ट्रफिक जाम झाला , पोलिस आले. लोकं तोंडावर हात घेवून बघतच राहीले. काय झालं काही कळेचं ना, त्या तिकडून ती लेकराची माय सुद्धा पाहू लागली. मधूराही गर्दिजवळ धावली अन पाहून सुन्न होऊन बेशूद्धच झाली. क्षणात गर्दिने फुललेला तो चौक ग्रहण लागल्यासारखा शांत झालां. अरूण रक्ताच्या थारोळात , निवांत निजला होता,ती फुले आपल्या छातीला कवटाळून, फुलाची एक पाकळीही चुरली नव्हती पण अरूणचं मस्तक छिन्नविछिन्न झालं होतं. पोलिसांनी गर्दिला पांगवलं अन अ‍ॅंबुलन्स आली, अरूणला दवाखान्यात नेलं, अन कोणीतरी त्याच्या मोबाईल बरून लास्ट डायल कॉल वर फोन लावला,तो थेट शितललाच केला. शितलं काही ऐकून घेण्याआधीच मला ठाऊक होतं आजही तुमच्या बॉसने सोडलं नाही अन तुम्ही लवकर आला नाहीतं पण तो माणूस ओरडला, अन म्हणाला अहो ऐकून तर घ्या तुमच्या नवर्‍याला अपघात झालायं , अमुक हॉस्पिटल मधे लगेच या, शितल हे ऐकून जागेवरच बसली. काही वेळानंतर ती निघाली, हॉस्पिटल मधे पोहचली तेव्हा खुप उशिर झाला होता. तिच्यासाठी कधी नव्हे तो लवकर निघाणारा अरूण कायमचा झोपी गेला होता. हे पाहून शितल , मोठ्या मोठ्याने रडू लागली. तेवढ्यात मधूरा , तिच ती फुलवाली तिच्या जवळ आली अन शितलला कवटाळून म्हणाली, मी पाहिलं त्यांना आज ते तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी जगलेलं. तेव्हा मधुराने सर्व हकिकत सांगितली शितलला. शितलं सारं ऐकून अरूण जवळ गेली अन मिठित घेवून म्हणू लागली, अरे अरूण उठ ना, किती झोपतोयेस, आपल्याला बाहेर जायचयं ना फिरायला ? तु उठ आता डोळे उघडं. थांब तुझ्या कानात सांगितल्यावरच तू डोळे उघडशील. ती त्याच्या कानाजवळ गेली अन म्हणाली अरे अरूण वेड्या तू बाबा होणार आहेस बाबा, एवढं देखील कसं कळलं नाही तुला. चल उठ आता अन हे म्हणत म्हणत रडत रडत शितल कोसळली.

आता तुम्ही सांगा चुक कशाची होती? इथे कोणाची नशिबाने थट्टा मांडली? अरूणची, शितलची, की त्या जन्माला येणार्‍या कोवळ्या कळीची ?

चुक नव्हती कोणाची,
तरीही नशिबाने थट्टा मांडली,
तहानलेल्या संसारासमोर,
सुखाची घागर क्षणात लवंडली...

-- सुर्यकिरण

वाचकांनो , माझी ही कथा काल्पनिक आहे. पण खरोखरचं हि वाचताना मी ही इतका भावूक झालो होतो की डायरीत पुन्हा लिहिताना मी ती अर्धवटच लिहिली. अन तसा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तेव्हा चुक भुल माफ असावी. तुम्हाला आयुष्य नेहमी सुखाचे, समृद्धिचे अन सुखाचे जावो हिच प्रार्थना.

गुलमोहर: 

छान Happy

विशाल, होय रे पहिलीच कथा आहे, क्लाईमॅक्स जास्त हाईड नाही करता आला, पण इथून पुढे नक्कीच , सुधारणा होईल. वर्षा, लाजो, केदार, नितीनजी धन्यवाद !

छान लिहिली आहेस. पण सून्न करणारी आहे Sad
पु.ले.शु. माझ्याकडून दया तुमच्या बायकोला>> हे जरा सुधार. द्या असे लिही.

सुमेधा, सुनिता, अन अरुंधती .. धन्यवाद. ठाऊक आहे म्हणूतरी अंधातरीच राहिला ना शेवट.

आता शितलंच आयुष्यही अधांतरीच राहिलं ना .. Uhoh

पुढची , कथा अशीच काहीशी असेल ... लवकरचं तुम्हाला वाचायला मिळेल.

ह्या कथेच्या प्रतिसादाबद्दल अन शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद.

पहिल्या कथेबद्दल अभिनंदन !

कथेचं शीर्षक वाचून शेवट काय असेल त्याचा अंदाज सहज येतो, त्यामुळे शीर्षक देताना ते इतकं सूचक असणार नाही असं बघितलं तर वाचकांची उत्कंठा टिकून राहू शकेल. पु ले शु !

nahi avadali. ugachch emotional karanyacha pryatn karata ase vatale. shirshak adantari chya aivaji chuk konachi pahije hote. Dev nahi he sidha kelet.....garaj nasatana arunla marale.