नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनात आलं की घर सोडून जाऊ शकण्याची सोय ज्यांच्याकडे असते अशा लोकांचं मला फार कौतुक वाटतं! >>>>>>>>>>>> Lol अगदी अगदी.. खरचं

btw तुम्ही कोणत्या गाण्याबद्दल बोलताय? मी नाही ऐकलं अजून.. जाम पकवलं कालच्या भागात. सगळे काय एकमेकांना शपथा घालतात... एवढे कसे सगळे भोळसट ... Uhoh

btw तुम्ही कोणत्या गाण्याबद्दल बोलताय? >> मीही तेचं विचारणार होते, मला तर ते एकचं गाणं आठवतयं - मी तुला , तू मला Happy

हो ....खरच श्रीला नाचता येत नाही...पण त्याने ते प्रांजळपणे मान्य केल याच कौतुक वाट्ल .... Happy ...अनेक मराठी कलाकारांना नीट नाचता येत नाही ...कदाचित....अभिनयावर जास्त लक्ष असत....किंवा आत्मविश्वास आणि प्रशि़क्षणाचा अभाव असतो....पण नक्की जमू शकत त्यांना....पण एकुणच मराठी पुरुष कलाकार फारसे बरे नाचत नाहीत हे मात्र खरं...... Proud

लग्न झाल रे झाल कि लगेच आजी म्हणतील " चला मी आत्ता घर सोडतेय बर का. कोणाला काय रडारडी करायची असेल ती करून घ्या बघू. मग सगळ्या आया आणि श्री धाय मोकलून रडणार. आई नका ना जाऊ/ आजी नको ना जाऊ . इत्यादी इत्यादी . तयार राहा बघू सगळ्या या पुढच्या एपिसोड ला Happy

हो एकंदर मराठी पुरुष कलाकारांना चांगल नाचता येत नाही. पण मला सासू हवी मधले धाकटी सुनबाई आणि तिचा नवरा चागले नाचलेले दिसताहेत Happy

सगळ्या आया आणि श्री धाय मोकलून रडणार>>>>> आणि जान्हवी हे सगळ माझ्यामुळेच झालय अस म्हणुन लग्नाच्या पहिल्याच दिवशी ढसढसा रडत माहेरी.....

सगळ्या आया आणि श्री धाय मोकलून रडणार आणि जान्हवी हे सगळ माझ्यामुळेच झालय अस म्हणुन लग्नाच्या पहिल्याच दिवशी ढसढसा रडत माहेरी.....>>>>>>>>>>>>>>>>> अगदी खर....मग म्हणजे अजून थोड पाणी मालिकेमध्ये.... :).....लांबवणार कसे नाहितर भाग त्यांचे.....

हो ....खरच श्रीला नाचता येत नाही...पण त्याने ते प्रांजळपणे मान्य केल याच कौतुक वाट्ल>>>>> प्रचंड अनुमोद्न

भागिरथी बाईंना घर सोडून जाऊन काय मिळेल?
त्यापेक्षा सर्वांना समोरासमोर बसवून कोण काय बोललं, का बोललं याची खातरजमा करून मनातलं सगळं मळभ दूर करणं सोप्पं आहे हे या इतक्या मोठ्या बाईला कळू नये का? वेळ पडल्यास ज्या १८ स्थळांनी जान्हवीला नकार दिला त्यापैकी काहींना बोलवून खरंखोटं करून सर्वांचंच आयुष्य सोप्पं करावं. इथे जान्हवीला आधीच इतके टार्गेट्स आहेत लग्नानंतर. श्री, स्वतःचे घर, ६ सासवा त्यात य भागीरथी बाईंना घरी आणायचे टार्गेट कशाला? बिचारी संसार करेल कधी? ही टार्गेटं पुर्ण झाल्यावर?

दक्षिणा +१.
आणि काल भागिरथी बाई म्हणत होत्या श्री चं लग्न आनंदात झालं पाहिजे. त्याच्या आनंदात आपण सहभागी होउया वै वै. मग लग्न होउन घरी आल्या आल्या ह्या बाहेर पडल्यावर काय श्रीला आनंद होणारे का? कैच्याकै.

सस्मित + १११११११११११११११११११११

कला, हा प्रकार योग्य दिसणार नाही. बांगड्या जानूला देऊन टाक...' असे अधिकारवाणीने सांगायला हवे होते. >>>मामा अगदी मनातले बोललात तुम्ही. मला वाटत होते तिचे बाबा आता बोलतील मग बोलतील पण नाहीच>>++१११११११११

दक्षिणा +१.
आणि काल भागिरथी बाई म्हणत होत्या श्री चं लग्न आनंदात झालं पाहिजे. त्याच्या आनंदात आपण सहभागी होउया वै वै. मग लग्न होउन घरी आल्या आल्या ह्या बाहेर पडल्यावर काय श्रीला आनंद होणारे का? कैच्याकै.>>>> भागीरथी बाईंनी गोखले गृहउद्योग भरभराटीला कसा आणला हाच प्रश्न पडला आहे मला. केवळ ऐकीव माहितीवर विश्वास ठेउन निर्णय घेणारी लोक जर इतका मोठा बिझनेस उभारु शकतात तर मग आम्ही अतीसामान्य माणस काहीही करु शकतो यात वादच नाही.

केवळ ऐकीव माहितीवर विश्वास ठेउन निर्णय घेणारी लोक जर इतका मोठा बिझनेस उभारु शकतात तर मग आम्ही अतीसामान्य माणस काहीही करु शकतो यात वादच नाह+++१११११११११११११११११११

मनात आलं की घर सोडून जाऊ शकण्याची सोय ज्यांच्याकडे असते अशा लोकांचं मला फार कौतुक वाटतं>> Lol

'उपासनेला द्रूढ चालवावे' >>> Lol

दक्षिणा..... भागीरथीबाई ह्याच नव्हे तर दस्तुरखुद्द सदाशिवराव सहस्त्रबुद्धेदेखील ते पडताळ्याचे काम करू शकले असते. श्री जान्हवीच्या जीवनात येण्यापूर्वी लग्नासाठी १८ स्थळे त्यांच्या घरी आली....मुलीला दाखविले गेले....मुलगी पाहताक्षणीच पसंदच पडेल अशी देखणी, सोज्वळ, बॅन्केत नोकरी करणारी....मुलगा आणि त्याचे आईवडील "आमचे देण्याघेण्याबाबत काही मागणे नाही...." असे म्हणणारे [हे दाखविले आहे...] असे असताना मुलाची आई जान्हवीच्या आईसोबत आत स्वयंपाकघरात जाते... आणि थोड्याच वेळाने भूत पाहिल्यासारखा चेहरा करून आपल्या माणसांना, "अहो, चला, चला. आपण इथून निघू या..." असे येड्यासारखे बरळत तिथून बाहेर पडताना दाखविले, ते सदाशिवराव, जान्हवी अचंब्याने पाहतातही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जे कुटुंब आता जणू काही लग्न ठरलेच अशा आविर्भावात तिथे उपस्थित होते त्यानी असा विचित्रपणा करून तिथून निघून जाणे हा काय प्रकार? हा प्रश्न वडील या नात्याने सदाशिवरावांना पडणे अपेक्षित होते. हाच माणूस आपल्या मुलीसाठी मोडक्यातोडक्या चालीने गोकुळ बंगल्यात येऊन भागीरथीबाईंच्या समोर उभे राहून हात जोडून "माझी मुलगी निर्मळ, निष्कलंक आहे" असे सांगतो, मग तोच बाप त्या १८ पैकी एकाच्याही घरी जाऊन खर्‍याखोट्याची खातरजमा करीत नाही ही बाब बिलकुल पटत नाही.

हाच माणूस आपल्या मुलीसाठी मोडक्यातोडक्या चालीने गोकुळ बंगल्यात येऊन भागीरथीबाईंच्या समोर उभे राहून हात जोडून "माझी मुलगी निर्मळ, निष्कलंक आहे" असे सांगतो, मग तोच बाप त्या १८ पैकी एकाच्याही घरी जाऊन खर्‍याखोट्याची खातरजमा करीत नाही ही बाब बिलकुल पटत नाही.>>>> अगदी बरोबर आहे मामा, पण मला काय वाटत की जान्हवीच श्रीवर असलेल प्रेम बघुन आणि श्री नाही मिळाला तर जान्हवी वेड्यासारखी परत अनिल आपटेसारख्या एखाद्या माणसाशी लग्न करायला तयार होउ नये म्हणुन सहस्त्रबुद्धे काकांनी तस केल असाव.. आणि लहानपणापासुन फक्त दु:खच आणि कष्टच वाट्याला आलेल्या आपल्या मुलीला लग्नानंतर इतक सुख तिच्या पदरात पडणार म्हटल्यावर तिच्या बाबांना हाच मार्ग सुचला असेल ना? कारण शेवटी त्यांना त्यांच्या मुलीच सुख हव आहे फक्त.....

उपस्थित होते त्यानी असा विचित्रपणा करून तिथून निघून जाणे हा काय प्रकार? हा प्रश्न वडील या नात्याने सदाशिवरावांना पडणे अपेक्षित होते. >> मग हि मालिका कशी चाललि असति.. मामा.. श्री आणी जान्हवी
लग्न कसे झाले असते ??

सृष्टी.....

आपली जी ही दीर्घ ( + १००० प्रतिसाद आजअखेर ) मालिका चालली आहे ती प्रत्यक्ष घटना नसून एका काल्पनिक कथानकाचीच असून ती तुमच्याआमच्यासारख्या एकदोन व्यक्तीने लिहिली आहे व त्यांच्यातीलच एकाने....तोही आपल्यासारखाच आहे... ते चित्ररुपाने उभे केले आहे; हे सर्वानाच माहीत आहे. त्यामुळे मालिका चालणे योग्यच आहे....प्रश्न आहे तो एकजात सार्‍या समाजाला ती मांडणी कशारितीने पटली पाहिजे या मुद्द्याची. कथानकाची चाल पटलावर मांडण्याचे स्वातंत्र्य त्या मालिका तयार करणार्‍या टीमला जरूर आहे, पण म्हणून सर्वसामान्यांना पटू शकणार नाहीत असे प्रसंग जर तिथे वारंवार घेतले तर आतापर्यंत उभी केलेली इतकी देखणी इमारत धुळीला मिळण्याचाही धोका असतो.

वाईट वाटते ते या भीतीपोटी.

जानु जेव्हा केव्हा श्री ला जाउ का म्हणुन विचारते तेव्हा तो नको ना म्हणतो. त्या वेळ्चा दोघांचा अभिनय मला फार आवड्तो. काल ही आवडला. बाकी मालिका सध्यातरी छान वाटतेयं !!

बाकी गोखल्यांचं घर म्हणजे 'राजा बोले आणि प्रजा हाले' या प्रकारातलं आहे.
भागिरथी बाई म्हणतात आनंदी रहा... लगेच सहा आया खुदकन हसणार. जर्रा रागवून पाहिलं की शरयू चिडिचूप.. कैच्याकैच.
बर आणि घर सोडून ह्या बाई काय दिवे लावणारेत?

मुग्धा...

"...अनिल आपटेसारख्या एखाद्या माणसाशी लग्न करायला तयार होउ नये म्हणुन सहस्त्रबुद्धे काकांनी तस केल असाव...." ~ बरोबर....पण माझे म्हणणे असे की, ज्या चाळीत ही मंडळी राहतात, तिथेच सहस्त्रबुद्धे यांचे मित्र रघुअण्णा [ज्यांच्याकडे ते पेपर आणण्यासाठी जात असतात] देखील आहेत. जान्हवीला पाहायला आज कुणीतरी येणार आहे, ही वार्ता रघुअण्णांच्याही कानी ते घालीत असणार याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही. मग सायंकाळच्या गप्पांत मुलीच्या लग्नाचे काय झाले ? अशा धाटणीचा प्रश्न आला {असे येतातच, मी साक्षीदार आहे अशा प्रश्नांना, लग्न जुळविण्याच्याबाबतीत} तर सदाशिवरावांनी रघुअण्णाला मुलाकडील लोकांनी घरातून तडकाफडकी निघून जाण्याचा प्रसंग सांगितला असताच....मग मित्र या नात्याने रघुअण्णा त्यांच्यासमवेत त्या मुलाकडे जाऊन आले असतेही.

१८ मुलांच्या आयांना एकटी शशीकलाबाई पुरुन उरते.... धिस इज रादर टू मच टु अ‍ॅक्सेप्ट.

अशोकमामा, ह्या मालिका डोकं बाजूला ठेवून बघण्याच्या कॅटेगरीतल्याच असतात. त्यातल्यात्यात ही बरी म्हणून ही बघायची एवढंच Happy

मामा यो बिंगो... आय सेकंड यू.
पण त्यातल्या त्यात ही सिरियल बर्‍यापैकी पचनी पडण्याजोगी आहे. फक्त काही गोष्टी अति दाखवल्यात. कला बाईंचं कळा लावणं आणि मामाच्या चोर्‍या... आणि ते त्याचं भविष्य सांगणं तर अगदी डोक्यात जातं.

१८ मुलांच्या आयांना एकटी शशीकलाबाई पुरुन उरते.... धिस इज रादर टू मच टु अ‍ॅक्सेप्ट.>>> अगदी बरोबर, पण ज्या पद्धतीने साक्षात भागिरथीबाई शशीकलाबाईंवर विश्वास ठेवतात त्याच प्रकारे बाकीच्याही ठेवतात अस दाखवल आहे आणि मुलाकडचे तडकाफडकी निघुन गेल्यावर शशीकलाबाईच आधी खोटा आरडाओरडा करुन सहानुभुती दाखवतात ना जान्हवीला.. "तु काही काळजी करु नको" वगैरे बोलुन. परत कित्येकदा जानुचे बाबा आईच्या विरोधात बोलत असताना खुद्द जानुनेच बाबांना बोलु दिल नाहिये आणि आईला पाठीशी घातल आहे. आणि पुन्हा लहानपणापासुन फक्त दु:खच आणि कष्टच वाट्याला आलेल्या आपल्या मुलीला लग्नानंतर इतक सुख तिच्या पदरात पडणार म्हटल्यावर तिच्या बाबांना हाच मार्ग सुचला असेल ना? कारण शेवटी त्यांना त्यांच्या मुलीच सुख हव आहे फक्त..... हे आहेच ना?
शिवाय सगळ्यात महत्त्वाच म्हणजे ही मालिका आहे. सगळच रिअ‍ॅलिस्टीक नाहि ना दाखवत कधीच, कोणीच Happy

अगो....आणि मुग्धा....

शतप्रतिशत तुमच्याशी सहमत ह्या मुद्द्याशी की "सगळंच रिअ‍ॅलिस्टिक नाही ना दाखवत....आणि अशा मालिका डोके बाजूला ठेवून बघायच्या असतात....". होते असे की ही कर्ताकरवीता मंडळी ज्यावेळी माध्यमांना बेताल मुलाखती देतात त्यावेळी ते जरूर हा आव आणतात की त्यानी समाजचित्रण केले आहे, समाजातील अमुकतमुक प्रश्नांला वाट करून दिली आहे....ती एक समस्या आम्ही प्रेक्षकांसमोर मांडत आहोत....इ.इ. त्यामुळेच त्यांचा हा अभ्यास पडद्यावर का प्रतीत होत नसेल ? इतकी चांगली चालली आहे मालिका आणि अचानकच भागीरथीबाई यांच्यासारखी कणखर व्यक्तिरेखा अगदी शपथ घेऊन एका अत्यंत अविश्वसनीय बाईने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून त्या निर्मळ जान्हवीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सार्‍या मालिकेच्या अस्तित्वालाच सुरुंग लावतात. एरव्ही त्यांचे अनेक सोर्सेस आहेत म्हणे.... मग अशावेळी त्याना का वाटू नये की या गोष्टीचीही खातरजमा झाल्याशिवाय शशीकलाबाईवर विश्वास ठेवायचा नाही.

दक्षिणा..... मतैक्याबद्दल धन्यवाद.

Happy

Pages