गीत भावानुवाद २ : इलाही मेरा जी आए....
Submitted by saakshi on 5 December, 2014 - 08:35
माणसानं आयुष्यभर भटकंच रहावं.
स्वाभाविक आहे की नाही, कोठेतरी सेटल व्हायलाच हवं वै. प्रश्न वेगळेच आहेत. त्यांचा इथे संबंधच नाही. भटकं म्हणजे मनातून भटकं.
नवीन गोष्टी जाणण्यासाठी उत्सुक असलेलं.जगण्यासाठी आसुसलेलं.
शामे मलंग सी
राते सुरंग सी
बागी उडान पे ही ना जाने क्यूं
इलाही मेरा जी आए आए ...
एखाद्या फकिरासारखं भटकावं. उद्याची चिंता न करता. कुंद संध्याकाळी पायाच्या पोटर्या सुजेपर्यंत आणि धुंद रात्री झोप उडेपर्यंत. दिशा, काळ, वेळ आणि भुकेची तमा न बाळगता.
त्या बंडखोर प्रवासावर मन भाळलेलं.
कल पे सवाल है
जीना फिलहाल है
खानाबदोशियों पे ही ना जाने क्यूं
इलाही मेरा जी आए आए
विषय:
शब्दखुणा: