हर शाम - उनके नाम

Submitted by आनंदयात्री on 4 July, 2009 - 07:04

हर शाम...उनके नाम!

काल मैत्रीण भेटली, हट्टून बसली - म्हणे माझ्यावरही एक कविता कर!
मी क्षणभर गोंधळलो, विचारात पडलो -
"चालत्या-बोलत्या कवितेवर कसली कविता करायची?" असं काहीसं साहित्यिक वगैरे पुटपुटलो...
एकवेळ गर्लफ्रेंडची समजूत काढणं सोपे आहे,
हे इतरांच्या अनुभवावरून माहित होतं..
पण हिची समजूत कशी काढायची?
आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे -
या मैत्रीला वय नाही, त्यामुळे चढ-उतारांचं भय नाही.
इथे आहे फक्त नितळता आणि निखळता..
ती कशी मोजायची?
पण म्हटलं - ’बघुया शोधून आतमध्ये, काही सापडतंय का?’

मग शिलकीत साठलेलं एक एक सापडायला लागलं...
मग आठवले चहाचे कप, फाटक्या नोटा,
बोलण्यातले हट्ट, अर्धवट गप्पा,
हरवलेलं गिफ़्ट, विसरलेले बर्थडे,
चुकलेले रस्ते, संपलेलं पेट्रोल,
भर दुपार, गोंधळ फार!
मिस न करताही उगाच मिस कॉल्स,
आणि कुठलीही स्कीम नसताना एका तासातले ६० मेसेजेस् - मग त्यावरून भांडण!

पण नाकावरचा राग नाकावरच रहायचा,
कितीही भांडलो तरी एकमेकांवरच निघायचा...
कदाचित मैत्री व्याख्येच्या बंधनात तेव्हा अडकली नव्हती
"स्वत:ची स्पेस" नावाची पोकळी आयुष्यात तोपर्यंत शिरली नव्हती..
बरेचदा संध्याकाळ अंगावरून मोरपीसासारखी निघून जायची...
खिसे रिकामे पण मनं भरलेली असायची...

हां.. त्या आषाढवयात एकमेकांना एकमेकांबद्दल
कधीतरी काही वेगळं वाटलंही होतं - पण तेवढ्यापुरतंच.
त्या आषाढातलं ते वादळ सहज पेलल्यामुळे
नातं श्रावणासारखं टवटवीत झालं होतं...

आठवल्या मग खूपशा पुसलेल्या रेघा - वहीमधल्या, पाटीवरच्या, वाळुवरच्य़ा...
ती हातावरची रेघ मात्र पुसून हवी तिथे नाही काढता आली कधी...
यालाच नियती म्हणतात हे तेव्हा गावीही नव्हतं...
आणि आता नातं तर व्याख्येपलीकडे पोहोचलेलं.
भाग्याचा स्पर्श, सहवासाचं कोंदण,
ओंजळभर तहान, ढगभरून दान!
अजून काय हवं?

शेवटी आठवला - तिचं लग्न ठरल्यावर सगळ्यांत आधी मला आलेला फोन.
फोनवर तिच्यापेक्षा मीच जास्त एक्साईट झालो होतो..
आणि फोन ठेवताना दोघांच्या तोंडून एकदम आलेलं वाक्य -
"तो? आजसे हर शाम, उनके नाम, हं?"...

मग खूप वर्षांनंतर काल भेटली ती! आणि हट्टून बसली -
म्हणे, माझ्यावरही एक कविता कर!

- नचिकेत जोशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नचिकेत,
या कवितेतील कवितेनेच नचिकेतला 'आनंदयात्री' बनवलेले दिसतेय.
काहीही असुदे, पण कविता मनाला भिडणारी आहे.

अरे!
माझी एक खूप आवडती कविता वर काढल्याबद्दल पजो - विशेष धन्यवाद! Happy

प्रद्युम्न, एवढी आवडली? थँक्स!

वैभव, किंकर, Happy

हां.. आषाढवयात एकमेकांना एकमेकांबद्दल
कधीतरी काही वेगळं वाटलंही होतं - पण तेवढ्यापुरतंच.
त्या आषाढातलं ते वादळ सहज पेलल्यामुळे
नातं श्रावणासारखं टवटवीत झालं होतं... >>> किती बोलकं लिहिलय हो ! अप्रतीम!

अरे....... ही कविता मी कशी काय मिसली...... Sad
भन्नाट ........ !!
एक कडक सॅल्यूट बॉस Happy

जियो यार.. नच्या अशी मैत्री ज्यांनी केली नाही ते जगलेच नाहीत... १०त.

रेव्हूचे आभार ही कविता वर काढल्या बद्दल...!!!

सारखी वर येते ही कविता
कितीदाही वाचायचीच नाही ठरवलं तरी परत परत वाचली जाते...
आणि मग................ Sad

ओह्हो... ही वर आली का!

रेव्यु, तुमचा प्रतिसाद का कोण जाणे, पण भिडला फार... धन्यवाद.. लोभ असू द्यावा...

रीया, Sad

चिमुरी, मी काहीच बदललं नाहीये... अ‍ॅडमिननी बदललं असेल.. Proud

सत्यजित, फार मोठी भावनिक गोष्ट बोलला आहेस मित्रा... Happy

धन्यवाद सर्वांचे!

Pages