भ्रष्ट नेत्यांना सत्तेसाठी सोबत घेत मोदीजी भ्रष्टाचार कसा हटवणार ?

Submitted by ashokkabade67@g... on 5 May, 2024 - 01:19

आज भारतात राजकारणाचे अत्यंत गलिच्छ रुप पहाण्याची वेळ सत्तजीवी राजकारण्यांनी मतदारांवर आणुन ठेवली आहे ,आधी विरोधीपक्षातील नेत्यावर भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करायचा त्याच्यामागे सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या ईडी ,सिबिआय सारख्या तपास संस्थाना त्याच्या मागे लावत त्याला बदनाम करायचे भाजपसोबत तो नेता गेल्यास त्याचा मानसन्मान करत त्याला मंत्रीपद बहाल करायचे व तो तत्ववादी निघाल्यास त्याला जेलमधे टाकायचे हा फंडा ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणनारे मोदीजी वापरत आहेत प्रत्येक राज्यात हीच स्थिती आहे सत्तजीवी असलेल्या मोदींनी हाच फंडा वापरत निवडणूक लढवली नाहीतर मोदींच्या फुग्यातील हवा कधीच निघून गेली आहे आज भाजप हा पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी नेत्यांचे आश्रयस्थान बनला आहे अशा स्थीत मोदीजी भ्रष्टाचार हटवण्याच्या हास्स्यास्पद गोष्टी जाहीर सभेतून करत आहेत पण जर सरकारमधे असे भ्रष्ट ना ते मंत्री असतील तर भ्रष्टाचार हटणार कसा याचे उत्तर भाजप व मोदी देत नाहीत जगातील सर्वात भ्रष्ट पक्ष भाजप बनला असतांना जनता व विरुद्ध धक म्हणतात की मोदीजी फेकू आहेत है सत्य वाटायला लागले आहे अशा स्थितीत भ्रष्टाचार हटणार कसा ?

Group content visibility: 
Use group defaults