गुलमोहर ५

Submitted by morpankhis on 8 July, 2016 - 16:36

गुलमोहर ५
गुलमोहर ५
गुलमोहर ५
गुलमोहर ५
गुलमोहर ५
गुलमोहर ५
गुलमोहर ५
गुलमोहर ५
गुलमोहर ५
गुलमोहर ५
गुलमोहर ५
गुलमोहर ५

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यापुरतं तरी आता दुसरा कोणताही सिनेमा बघताना एक प्रेक्षक म्हणून माझी नजर नक्कीच बदलली आहे.

सैराट हा नागराज आणि त्याच्या सहकार्‍यांनी तयार केलेला 'अभ्यासपूर्ण सिनेमा' आहे. एक कलाकृती म्हणून विचार करायचा झाला तर एक साधी गोष्ट - सद्य समाजात घडणारी गोष्ट, अतिशय उत्तम बारकाव्यांसह सादर केली आहे. सिनेमाची सगळीच पात्रं अशी दमदार लिहीली आहेत की एकेक पात्र त्याच्या त्याच्या परिघात हिरोच आहे - लंगड्या, सल्या, आनि, प्रिन्स हे सगळे साईड कलाकार न होता कथेचा अविभाज्य भाग होतात. आणि कायमचे स्मरणात राहतात. कथा जरी ओल्ड वाईन इन न्यु बॉटल असली तरी इतकी उत्तम पद्धतीने सादर झाली आहे की आपण रिलेट करू शकतो, आणि आपल्या नकळत त्या सिनेमातले एक पात्र होऊन जातो.

नावं लिहायची नाहीयेत पण बाकीचे काही सिनेमे बघताना हे काय चाललंय हाच प्रश्न आता मनात येत राहील. Happy

वैयक्तिक पातळीवर माझ्यासाठी सिनेमा बघणं या अ‍ॅक्टिव्हिटीमागचा दृष्टीकोन पण बदलतोय - पूर्वी रिकामा वेळ बहुतेक खूप असायचा, त्यामुळे अगदी टुकार सिनेमा असला तरी वेळ वाया गेला असं वाटायचं नाही, उलट कसला बिन्डोक सिनेमा होता म्हणून हसू यायचं. आता संसाराच्या रहाट्गाडग्यात रिकामा वेळ फारसा मिळत नाही. त्यामुळे फालतू सिनेमात घालवलेला वेळ दुप्पट निराशा घेऊन येतो. आणि त्याचमुळे एलिझाबेथ एकादशी /नटसम्राट / कट्यार किंवा सैराटसारखे सिनेमे अत्यंत आनंद देऊन जातात. अगदी चारपट सुखी करतात. Happy

क्रमशः

अजून बरंच लिहायचं आहे. काही वेळाने........

>>"सैराट" मुळे मराठी सिनेमा मध्ये आता काही नवीन बदल येतील का ?<<

मार्केटिंगवर भर दिला जाईल. ढिंच्याक गाण्याच्या जोडिला ऊत्तम मार्केटिंग असेल तर घिसीपिटी स्टोरी बेस्ड सिनेमा पण चालतो हे ऊदाहरण सैराटने दिलेलं आहे... Happy

धनश्री >> अगदी सहमत...

दुसर अस की..
मला अस लक्षात आलय की काहीजणाना असा एक खुप मोठा गैरसमज झालाय की सैराट हा मार्केटिंगवर चाललेला सिनेमा आहे, जो पुर्ण चुकीचा आहे..
सैराटच मार्केटिंग वा जे काही म्हणु ते सिनेमा रिलीज झाल्यावर खुप नन्तर सुरु झाल... त्या मध्ये पण सैराट टिमला वेगवेगळ्या शो मध्ये बोलवल गेल..

जेव्हा प्रोडक्ट उत्तम असत तेव्हाच मार्केटिंगचा खरा उपयोग होतो अस मला वाटत...
हा सिनेमा माउथ पब्लिसीटी ने चालला आणि प्रेक्षकानी उचलुन धरला ...

माझ्या मते.. ह्या सिनेमाचा जो मोठा प्लस प्वॉइन्ट आहे तो त्याच्या " स्टोरी टेलिन्ग मध्ये आहे"....
पत्राची निवड, कथा, डिटेलिन्ग, आणि जोडीला सन्गीत हे सगळच उत्तम जमुन आलेल आहे......

सैराटमुळे सिनेसृष्टी बदलणार नाही. सैराटने नवीन तंत्र आणलेले नाहीय कि जे इतर लोक आपल्या सिनेमात वापरतील. त्यामागे त्या दिग्दर्शकाचा विचार आहे, जो पूर्णतः वैयक्तिक आहे. तसा विचार आपण करू हा विचार इतर दिग्दर्शक करू शकतील पण त्यात व्यावसायिक आणि वैयक्तिक अडचणी आहेत. वैयक्तिकरित्या एकाने दुसऱ्याची कॉपी का करावी?

प्रेक्षक म्हणून आपण थोडा वेळ चित्रपटातल्या त्रुटी काढू पण त्याचा लवकरच कंटाळा येईल. त्रुटी काढण्याच्या भानगडीत चित्रपटाचा आनंद घ्यायचे राहून जाईल.

मी हल्लीच मोहेंजोदारो चे एक गाणे आणि trailor पाहिला. 2016 bc मधले लोक 2016 ad मधल्या लोकांसारखेच कपडे, चेहऱ्याचा मेकअप, गीत संगीत, नृत्याच्या पद्धती वापरत असतील का हा प्रश्न पडला ते सगळे पाहताना. पण गोवारीकराचा चित्रपट म्हणून माझ्या अपेक्षा आहेत, त्यातही मी जोधा अकबर पेक्षा स्वदेस जास्त लक्षात ठेवलाय. थोड्याफार अपेक्षा पुऱ्या झाल्यातर कदाचित कपडेपट दुर्लक्षिला जाईलही.

सैराटची गोष्ट सांगण्याची पद्धत उत्तम हाती, आपण ज्याला detailing म्हणतोय तीच तर त्याची पद्धत होती प्रेमकहाणी मांडण्याची. नाहीतर नेहमी अर्ध्या तासात छेडाच्छेडी पासून प्रेम जुळून दोन गाणी होतात आणि उरलेले दोन तास विलन लोक या प्रेमी युगुलाचे हाल करण्यात घालवतात.

Z वर त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचे तितकेच मार्केटिंग होते जितके सैराटचे. निव्वळ मार्केटिंगने हवा तयार केलेल्या चित्रपटाला लोक चार चारदा भेटी देत नाहीत.

'सैराट' हा एकमेवाद्वितीय चित्रपट आहे, हा सूर खटकणारा आहे. 'सैराट'मुळे चित्रपटांकडे बघण्याची दृष्टी बदलली असेल, तर ते उत्तमच आहे, पण ती 'सैराट'मुळेच बदलली असेल आणि इतर सर्वच चित्रपट 'सराट'च्या तुलनेत नगण्य असं म्हणणं असेल, तर इतर चित्रपटांवर हे अन्यायकारक आहे.

'प्रभात'चे चित्रपट किंवा राजा परांजपे - राजदत्त - जब्बार पटेल - सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांचे चित्रपटही पटकथा आणि पटकथेतले तपशील यांबाबतीत कुठेही कमी नाहीत. बजेट किंवा त्या काळातली साधनं यांमुळे तांत्रिक बाबतींत हे चित्रपट कदाचित कमी वाटतील, पण आशय, पटकथा, अभिनय, संगीत अशा सर्वच बाबतीत हे चित्रपट सरस आहेत.

'सैराट' आवडला ही अत्यंत आनंदाची बाब आहे, पण मग जरा मागच्या काळातले उत्तम चित्रपटही या निमित्ताने बघितले जावेत.

<सैराटच मार्केटिंग वा जे काही म्हणु ते सिनेमा रिलीज झाल्यावर खुप नन्तर सुरु झाल... त्या मध्ये पण सैराट टिमला वेगवेगळ्या शो मध्ये बोलवल गेल..>

चुकीची माहिती. 'सैराट'चं किंवा झीच्या कुठल्याही चित्रपटाचं मार्केटिंग हे अत्यंत पद्धतशीर, बराच आधीपासून केलं जातं.

माझ्यापुरतं तरी आता दुसरा कोणताही सिनेमा बघताना एक प्रेक्षक म्हणून माझी नजर नक्कीच बदलली आहे..
बाकीचे काही सिनेमे बघताना हे काय चाललंय हाच प्रश्न आता मनात येत राहील.
माझंही तसच झालयं..काल मुंबई पुणे मुंबई २ बघताना.. सुरवाती च्या १५-२० मिनिटात बोर झालं..!
हे.मा.वै.म.

चिनुक्स सहमत.

हल्लीच्या काळात नेट मुळे जगभरात कोण काय करतोय हे समजते. विचारांना चालना मिळून नवीन प्रयोग केले जातात. ह्या विरुद्द 75 वर्षांपूर्वी तुटपुंज्या सामग्रीत इथल्या लोकांनी जे प्रयोग केले ते सलाम करण्यालायक आहेत.

चांगले कितपत काय होईल माहित नाही पण सैराटचा फॉर्म्युला तयार करून त्या फॉर्म्युलाप्रमाणे बनवलेल्या सिनेमांची लाट येण्याची रास्त भिती वाटते. नुसता फॉर्म्युला, आतमधे आत्माच नाही अश्या लाटा कुठल्याही प्रकारच्या सिनेमाच्या आल्या तरि ते इंडस्ट्रीसाठी फार योग्य नाही.
अर्थात इतक्या दणदणीत यसानंतर त्याला पर्याअही नाही.

सैराटमुळे असे काही झालेच तर ते केवळ या एका ठराविक पद्धतीच्या सिनेमांबाबत होईल. जे या पठडीतील चित्रपट नाहीत त्यांची आपली एक खासियत आहे ती त्यांच्याकडून जपली जाणे अपेक्षित आहेच. वेगळ्या जॉनरच्या चित्रपटांनी का सैराटचा मार्ग जोखावा?
आणि हे विसरू नका कि सैराटने मारलेली झेप फारच उत्तुंग असली तरी याआधी मराठी चित्रपटाला पैसा दाखवायचे काम आणि अमराठी लोकांना आकर्षित करायचे काम 'दुनियादारी' या चित्रपटानेही केले होते. पण त्यानंतर आणखी एक दुनियादारी त्या टीमलाही बनवता आला नाही.

पण मुळात दुनियादारी देखील तोवरचा सर्वात भारी मराठी चित्रपट होता अश्यातला भाग नाही. तर ती एक क्रेझ होती. त्या क्रेझ अंतर्गत मी चार वेळा वेगवेगळ्या मित्रांच्या ग्रूपबरोबर तो चित्रपट थिएटरला पाहिला..

सैराटबाबतही तुर्तास आपण सर्वांमध्ये अशीच क्रेझ आहे. एखादा सुपर्रस्टार उदाहरणार्थ राजेशखन्ना बाबतही त्या त्या कालावधीत अशी क्रेझ निर्माण झालेली आपण पाहिली आहे.

बरेचदा ही क्रेझ ओसरली तर आपल्यालाच अचानक काही विशेष वाटेनासे होते. याचा अर्थ अचानक वाईट आहे असे वाटणे नाही तर एकेकाळी आपण ती कलाकृती जेवढी डोक्यावर उचललेली की त्यापलीकडे काही सुचतच नव्हते तशीही तितकी ती नव्हती हे जाणवते.

गाण्यांबाबत हे बरेचदा होत असते सर्वांचे. एखादे गाणे ईतके गारूड टाकते, आपण ते रीपीट मोडवर ईतक्यांदा ऐकतो की आपण आजवर ऐकलेले आपल्या आवडीचे सर्वोत्तम गाणे आहे हा निष्कर्श काढून आपण मोकळे होतो. पण दोन वर्षाने ते गाणे आपल्या मोबाईलमध्येही नसते तर पीसीच्या कुठल्याश्या कोपर्यात पडले असते.

मॉरल ऑफ द स्टोरी - सैराटचे खरे मूल्यमापन 10 वर्षांनी करूया Happy

अवांतर - मी थ्री ईडियट्स गर्लफ्रेंडबरोबर पाहिला आणि अश्या भारावलेल्या अवस्थेत थिएटरबाहेर पडलो की उद्या हा चित्रपट आईला दाखवायला परत यायचे हे तेव्हाच ठरवून टाकले आणि तसे केलेही.
सैराटबाबत मात्र तसे झाले नाही. म्हणजे मला तो फार आवडला. स्वता दोन वेळा पाहिला पण आईला घेऊन यावे असे वाटले नाही. याचा सोपा अर्थ हा चित्रपट सर्व वयोगटाला आवडेल याची मला तरी खात्री नव्हती. मग सारेच चित्रपट असे बनावे, जे मला माझ्या आईला दाखवायची प्रबळ इच्छा होऊ नये, अशी अपेक्षा मी कशी करणार?

सैराट हा केवळ मार्केटिंग वर चाललाय असा एक गमतीदार समज सैराट न बघितलेल्यांचा असतो. Wink
सैराट उत्तम व्यावसायिक सिनेमा आहे म्हणून तो बॉक्स ऑफिसवर चालला आहे. त्याव्यतिरीक्त एक सिनेमा म्हणून ती एक चांगल्या दर्जाची कलाकृती आहे, म्हणूनच इंटरनॅशनल फिल्म्स फेस्टिवलमध्ये त्याचे कौतुक झाले आहे. झीने त्याचे उत्तम मार्केटींग केले तरीही प्रेक्षक केवळ मार्केटींगला भुलून चित्रपटगृहात आले नाहीत. नागराजला फँड्रीच्या यशामुळे त्याला भरभक्कम पाठिंबा होताच, शिवाय संगीताने (मुझिक!!) बराच गवगवा केला. केवळ चारच गाणी असूनही सैराटची सर्वच गाणी चार्टबस्टर बनली आहेत. नवीन फ्रेश जोडी, प्रेमकथाच असली तरी मांडणीमधला वेगळेपणा प्रेक्षकांना बराच भावला आहे.

सैराटमुळे नवीन् बदल ऑलरेडी येत आहेत. अर्थात ही लीनिअर प्रोसेस कधीच नसते त्यामुळे ठळकपणे प्री सैराट आणि पोस्ट सैराट असे बदल बघायचे असल्यास थोडी वर्षे थांबावे लगेल. अमराठी निर्मात्यांनी मराठी चित्रपटामध्ये पैसे घालणे हा महत्त्वाचा बदल माझ्यादृष्टीने आहे. पण हा बदल डायरेक्ट सैराटनंतरच आलाय असं नाही. त्याही आधीपासून दोन तीन वर्षे अमराठी निर्माते पुढे येत आहेत. साजिद नाडियादवाल्याने देखील मराठी चित्रपट निर्माण केलाय.
मराठी चित्रपट आशयाइतकेच तांत्रिक अंगानीदेखील परिपूर्ण बनावेत ही अपेक्षा असेल तर चित्रपटसृष्टीत पैसा येत राहिलाच पाहिजे त्यासाठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालत राहणे हे उत्तम चिन्ह आहे.

चिनूक्स >>
मार्केटिंग च्या बाबतीत मला एवढच म्हाणायच जे साधना ने वर म्हन्टल आहे..
सैराटच तितकेच मार्केटिंग झाले जेवढ बाकी चित्रपटाचे मार्केटिंग होते.
प्रोडक्शन हाउसने पुर्व प्रसिद्धी साठी म्हाणुन जे मार्केटिंग केल ते बाकी चित्रपटा सारखच होत... ते अगदी मान्य आहे..

पण बर्‍याचजणान्ना या सिनेमाच जे जास्त मार्केटिंग झाल हा जो गैरसमज आहे तो अशासाठी की..
हा सिनेमा रिलीज झाल्या नन्तर जवळपास एक आठवड्यात झडुन सगळ्या चॅनल्सनी सैराट टिमला बोलावल..
.. Twitter/fb वर तुफान चर्चिल गेल .. त्यावर सगळ्या मोठ्या नॅशनल/इन्टरनॅशनल न्यज पेपर मध्ये लिहल गेल...
ते सगळ अ‍ॅप्रिसीएशन या प्रकारात मोडत ...त्यालाच ...बरेचजण मार्केटिंग असा गैरसमज करत आहेत..एवढच.

सैराट हा मला प्रचंड आवडलेला, उत्तम सिनेमा आहे हे मान्य करुनही तो आत्ताच इतर मराठी सिनेमांसाठी 'मानदंड' वगैरे आहे हे फारच अती होते आहे. श्वास च्या बाबतीत (किंवा हिंदीमध्ये हआहैकौ) जसे स्पष्टपणे प्री-पोस्ट दिसते तसे सैराट्चे होईल का याबद्दल मला जबरदस्त शंका आहे. However good, it is still an anomaly - aberration - outlier.

सैराट छानच आहे त्यात वाद नाही पण त्याची तूलना इतर चित्रपटांबरोबर पुर्णतः चूकीची आहे. चित्रपटाचे यश केवळ व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहू नये . मला अजूनही रहना है तेरे दिल मे चित्रपट आवडतो जरी तो बॉक्स ऑफीसवर दणकून सपाट झाला होता, असेच खूपसे चित्रपट आहेत , सरते शेवटी कथानक जरी सारखे असले तरी ते मांडण्याची कला चित्रपटाप्रमाणे बदलणारच आज सैराट चालला उद्या दूसरा चालेल. सैराट नवोदीत कलाकारांना घेवून करण्याचे धाडस मात्र कौतूकास्पद आहे. विषय जरी सामाईक असला तरी त्याचे चित्रीकरण आणि संगीत वेगळे आणि उत्तम होते हे सर्वांना माहिती आहे.
कट्यार असो कि नटसम्राट आपापल्या ठिकाणी ग्रेट आहेतच.

सैराट" मुळे कळत नकळत Evaluate केला जातोय...
असहमत

पण सैराटच्या व्यावसायिक यशामुळे कदाचित बॉलीवूडचीही लोक मराठी सिनेमात रस घेतील असे वाटते.

चित्रपट उत्तम आहेच पण सैराट चालला त्याची दोनच कारणे होती

एक तर पब्लीसीटी आणि दूसरी निगेटिव्ह पब्लीसीटी .................

आपण भारतीय आहोत , एखादा चित्रपट पाहू नका म्हटले तर लोक मुद्दाम सिनेमा गृहात जावून बघातात.

"सैराट" मुळे मराठी सिनेमा मध्ये आता काही नवीन बदल येतील का ?
जर उत्तर "हो" अस असेल तर ते कोणते बदल असतील वा असलेले/झालेले आवडतील ?>>>

बदल होतिल का हे कस सान्गणार? आपण प्रेक्षक आहोत निर्माते नाही, हा! बदल झालेले आवडतिल हे नक्की.
प्रेक्षकानाच आयक्युच नाही किवा वरचा मजला घरी ठेवुन आमचा रद्दड सिनेमा त्यानी आपल्या पैशानी बघुन सिनेस्रुष्टिला हातभार लावावा ही अपेक्षा आता बासच! हे कितितरी काळापासुन हवे अस्लेले बदल आहेत.
तरी मराठी आणी हिन्दी कपेर केल तर मराठीचा आशय जरा बरा तरी असतो.

सैराटची तुलना बा़की चित्रपटाशी करणे योग्य नाही तरी सैराट मधौन डिटेलिन्ग, प्रेक्ष्काना रिलेट करता येइल अशी कथा. उत्तम सन्गित , सहज अभिनय करणारी पात्र अशा गोस्टि घेता येतिल.

अर्थात वर चिनुक्स म्हटल्याप्रमाणे हे काही पहिल्यादा एखाद्या चित्र्पटात घडलेय अस नाही यापुर्वीही उत्तम मराठी चित्र्पट येवुन गेलेच आहेत.देवुळ, ए.एकादशी ही ताजी उदाहरण.

काही मुद्दे...
१) सैराटची तुलना ही "वळु , दुनियादारी, देउळ, एकादशी, कट्यार, नटसम्राट" व इतर अश्याच सकस व उत्तम कालाकॄतिन्शी करण्याचा हेतु अजीबात नाही, व अशी तुलना होउच शकत नाही...प्रत्येक सिनेमाची त्याची त्याची शक्तीस्थळ आहेत...

२) हा सिनेमा 'मानदंड' वगैरे ठरेल अस वाटन पण खुप धाडसाच आहे.. पण या सिनेमा मध्ये ज्या प्रचलीत
गोष्टीना छेद दिलाय ते ही नाकारता येनार नाही.. जस की..
- तगडी स्टारकास्ट असली पाहीजे..
- नाजुक हिरॉइन आणि तिचा तोन्डी लावण्यापुरताच सिनेमातला वावर..
- फारच स्टीरिओ टाइप्ड असे खलनायक...
- प्रेक्षकाना ते बाळाला बोळ्यान दुध पाजतात तशी सान्गितलीजाणारी कथा...
- पुर्ण अनैसर्गिक वाटनारे कपडे, मेकअप्स व कधी कधी सन्वाद ..
- गाणी ..त्या बाबतीत काय बोलणार.. ते एकाच प्रकारचे ड्रेस घालुन नाचनारे एक्स्ट्रज...
- फुल्ली प्रीडीक्टेबल शेवट... इ..इ..

३) आपेक्षा ही नाही कि आत "सैराट" च्या धाटणीचे सिनेमे झेरॉक्स मारल्या प्रमाणे निघायला हवेत..
पण या सिनेमाने प्रेक्षक म्हणुन माझ्या ज्या थोड्याफार आपेक्षा वाढवल्या आहेत त्या यापुढे थोड्या तरी पुर्ण व्हाव्यात या आहेत..

४) मराठी सिनेमाने पुढे गेलेल सगळ्यानाच आवडेल.. जेव्हा माझा मराठी न समजणारा मित्र कोण्याएका न्यज मध्ये "सैराट" वर आलेल आर्टिकल वाचुन मला ढिगभर प्रश्न विचारतो..आणि त्याच्या फोनच्या प्लेलीस्ट मध्ये "सैराट" ची गाणी टॉपला ठेउन एकतो... तेव्हा खुप छान वाटत..

५) आणि शेवटच म्हणजे कमर्शीयल सक्सेस.. उत्तम कालाकॄति या जर कमर्शीयली सक्सेसफुल झाल्या तर दुधात साखरच... नाही का...

चिनूक्स, आगाऊ, अनुमोदन.

सैराट मलाही आवडला. पण सैराटसारखा सिनेमा मराठी, हिंदीत झालाच नाही किंवा होणारच नाही हे मत अजिबात पटत नाही. (इंग्रजी, फ्रेंच, जर्मन किंवा इतर एकाही भाषेत सैराटसारखा ग्रेट चित्रपट झालाच नाही, असे मत अजून वाचनात आले नाही.)