असं म्हणतात कि,प्रेम पहिल्या नजरेत होतं
माझा तर यावर मुळिच विश्वास नाही
मला आपली पहीली नजरानजरच आठवत नाही !
तरीही माझं ह्रदय तुला पाहुन धडधडते
मी लाख प्रयत्न केला थांबवायचा तरी,
डोळे फक्त तुझ्या आस्तीत्वाचा वेध घेतात !
तु दिसलीस कि मग,रणरणत्या ऊन्हात
वळिवाची सर आल्याचा भास होतो.
जिवन-क्षीतिजावर,ईंद्रधनुचा साक्षात्कार होतो !
पण लगेच.....मी जागतो,मना समजावतो,
असे आभास,तो वळिवाचा,
अरे वास्तव ही ग्रिष्माची दाहकता
मी म्हनतो ,प्रेम म्हणजे "मृग-जळ"
मन म्हनते ,प्रेम म्हनजे " जिवन-सागर"
मी म्हनतो प्रेम म्हनजे ,खोट्या आशा !
मन वेडे सोडेना प्रेमाची अभिलाशा
संघर्ष मझा अन मनाचा, नित्याचा मला आहे
वेड्या मनाला, साथ तुझ्या प्रेमाची हवी आहे.
सार्या गणिताची बेरीज-वजाबाकी शुन्य आहे !
नियती पुढे मी एक शुन्य,अन तुही एक शुन्य आहे
कळले जर तुला काही तर,सारे काही सार्थ आहे
नाहीतर वेड्या माझ्या मनाचा, सारा अकांतच व्यर्थ आहे !
जगेन मीही तुझ्याविना,ध्येये सारी गाठेन...सारं काही विसरेन..!
पण हे मन जडलेले ईथेच असेल..तुझी वाट पहात....या नाजुक वळणावर !
-----------------------------------------------------
प्रकाश
आठ
आठ वर्षापुर्वी लिहिलेले हे पत्र(काव्य!)...ईंजीनिअरिंगच्या तिसर्या वर्षाला होतो तेव्हा !
बरेच दिवस डायरीत जपुन ठेवले होते. ज्यासाठी लिहीले होते ते कधी देणे झाले नाही !!
घरची परिस्थीती तशी बिकट.....डोक्यावर जबाबदारीचे होझे.....पुढची भविष्याची अंधारी वाट!
कठीन काळ होता तसा !
बाकी हे काहीच्या काही होते नक्कीच !!
आठ वर्षा
आठ वर्षा नी प्रयत्न केला काही हरकत नाही. तोच आठवणीचा ठेवा आहे. जपून ठेवा.
छान कविता
छान कविता
कोण होती
कोण होती तीsssssssssssssss ????????????!!!!
बाकी हे
बाकी हे काहीच्या काही होते नक्कीच !!>>>> हे काहीच्या काही असेल, पण कविता मात्र खुप छान, काहीच्या काही नाही
सुमेधा पुनकर
**************************************
पतंग्यानेच का जावं आगीजवळ ?
ज्योतीला सांग, नमन कर ना एकदा
**************************************
प्रकाश,
प्रकाश,
मनात आठवान्चा पाऊस दाटला,
पण, माझा इशारा तुला नाहीच कळला ?
------------------------------------------------
मी मराठी असण्याचा मला अभिमान आहे.