कधी कधी तु येतोस श्रावणासारखा बरसुन जातो. ...मग सगळ्या जीवनात नवीन चैतन्य पसरऊन जातोस. रोजच्या चिंता काळज्या पळुन जातात मग. असाच का नाही बरसत नेहमी ? का नाही हरखवत नेहमी? प्रश्न पडतो मला.
आज valentine day. सकाळीच ऊठुन पहाते तर तु गायब. मला वाटले आता काय नवीन भांड्ण? पण नाही तु आलास तेच मुळी choclate घेऊन आणी मला आवडते म्हणुन आपला स्वयंपाक. उडालेच मी, मोहरलेच मी. किती साधे क्षण .. पण मी वेडी. मला हे क्षण खुप आवडतात. तुझ्या बरोबर आपले काही भवितव्य आहे असे वाटुन जाते.
नाही तर आपले तीन वर्षाचा हा प्रवास. पण त्यात नको हे सोबत जगणे असे वाटायला लागणारेच प्रसंग अधीक. तु खुप चांगला रे. मनापासुन प्रेम करणारा. मी पण कुठेही कमी पडणारी नाही. पण तु एकुलता एक. तुझ्या आईचा लाडका. लग्न झाले अन तुझ्या आईला कायमची एकच भीती, माझा मुलगा मला आता दुरावेल. ... मला कळु नाही शकली ती भीती.
मी आले होते तेच मुळी तुझ्या जगाला माझे करण्यासाठी. तुझ्या आईला माझी आई करण्यासाठी, तुझ्या मित्रांना माझे करण्यासाठी, तुझा संसार मला माझा करायचा होता. तुझी स्वप्ने माझी बनवायची होती. माझी स्वप्ने तुझ्यासोबत वाटुन घ्यायची होती. तसे आपले बोलणे झाले. मला तु आवडलास कारण तुला मी हवी होते. Doctor म्हणुन मिळणारा पैसा नको होता. तुला मी आवडले होते जिवनसाथी म्हणुन. मला तेच भावले.
मी लग्न होउन आले, आणी अचानक त्या भीतीने तुझ्या आईचे भावविश्व उध्वस्त केले. आधी अश्या नव्हत्या रे त्या. पण काय झाले कळले नाही. अचानक त्यांना लग्नात आपला मुलगा दान केल्यासारखे वाटु लागले. खर तर दान माझे झाले होते ना. घर दार सोडुन मी आले होते ना. अचानकच त्यांनी मला सांगीतले की आई म्हणु नकोस काकु म्हण. मी फक्त माझ्या मुलाचीच आई आहे. मग हनीमुनच्या दिवशी तु माझ्यासाठी आणलेला हार लपवला. आणी प्रत्येक शब्दापरत मला बोलणी. एकच दिवस झाला होता मला तुझ्या घरी. माझे स्वागत पण नाही झाले काही, घराबाहेर रांगोळी नाही का काही नाही, पहील्या रात्री सजवतात तसा पलंग नाही. मला एकदम माझ्या बहीणींच्या पहील्या रात्री आठ्वल्या. त्यांच्या सासरी आमचे झालेले जंगी स्वागत. त्यांच्या सासरी आम्ही सगळ्यांनी मिळुन सजवलेले पलंग. हास्यकल्लोळात बुडालेले त्यांचे घर. सासर आणी माहेरच्यांचा तो प्रेमळ मिलाप. ईथे ते काहीच नव्हते. माझे आई बाबांना तुझ्या आईने सांगीतले की आमच्याकडे राहु नका. असे मी कधीच पाहीले नव्हते. माझ्या भावाच्या वेळेला आणी बहीणींच्या वेळेला पण. मी पण दुखावले रे त्या दिवशी. खुप खुप दुखावले. तु कुठेच नव्हता तेंव्हा. तु बोलतच नव्हता.
तु हवा होतास. पण तु नव्हतास.
मला हवे असते तेव्हा तु नसतोच मुळी जवळ. घरची सगळी कामे पण मीच करायची अभ्यास करुन, त्याला काही ना नाही, पण जरा दोन प्रेमाचे शब्द नको का माणसाला ? सारखे हे नाही अन ते नाही झाले, जणु मी म्हणजे हेलाच की. काम केले तर फार काय मोठे त्यात. हं.. मी आज आले होते निर्णया वर. आता बस.... मी हुशार आहे, शिकलेले आहे, आणी भरपुर कमवु शकते, तुझ्यापेक्षा दुप्पट नक्कीच. बस.. आता नाही हे सहन करायचे. बसा म्हणा तुझ्या आईला आपल्या मुलाला कवटाळत. आणी तु बस आपल्या आईला कवटाळत....
आणी तु बरसलास.. माझा राग माझा निर्धार गळाला. असाच का नाही बरसत नेहमी.... ??
एक मनोगत...
Submitted by mee_na on 14 February, 2009 - 20:33
गुलमोहर:
शेअर करा
नायिकेबद्
नायिकेबद्दल निश्चितच सहानुभुती वाटते. आपल्या बहिणींसारखे वा इतर चारचौघींसारखे आपल्या वाटेला आले नाही ह्या खंत नायिकेला जरुर वाटणार. अशा विकृत सासवा आणि मुले ह्यांचे देवच भले करो. पण एका चांगल्या माणसाच्या आयुष्याची ते वाट लावतात हे मात्र निश्चितच.
निकोप संगोपन आणि मानसिकता असणारी मांणसे आपल्या आयुष्याचे साथिदार म्हणुन न लाभणे हि अतिशय दुर्देवी गोष्ट असेल.
नायिकेला नक्किच सहानुभुती आणि तीच्या आयुष्यात तो कायम असाच बरसत रहावो अशी देवाजवळ प्रार्थना.
विकृत नाही
विकृत नाही म्हणणार मी ! पराकोटीच्या असं म्हणेन फार तर! एकुलता एक असो की दोन, आपला मुलगा आपल्या हातून निसटणार ही भीती "आईला" वाटणारच! फक्त संतुलन ठेवता आलं पाहिजे.
नायिकेची सासू सरळसरळ तिरसटपणा करतेय हे नशीब, अशाही सासवा असतात कि ज्या सूनेशी कायम बरोबरी करण्यात धन्यता मानतात, मत्सर आणि जळफळात करतात. त्यातून त्यांच्या लाडक्याचे नुकसान झाले, संसार तुटला तरी चालेल.
नायिकेला देखील नवरा आवडतोय ना? डॉक्टर होणर्या मुलीला नवर्याच्या घरची परिस्थिती लग्नाआधी कळली नव्हती? "स्थळा"ची माहिती कोणी काढली नव्हती? एका क्षणी आपला पगार जास्त आहे हे जाणवलय का? स्पष्ट बोलून वेगळे व्हायचं, म्हणजे जवळपास दुसरे घर घेऊन तिथे संसार थाटायचा. सासूच्या जवळदेखील नि दूरदेखील!
दोन्ही बाजूंनी नमते घेतले तर "त्याने बरसण्याची" आणि मग "गळून" जाण्याची वेळ कदाचित येणार नाही.
हं ... असलाच
हं ... असलाच प्रकार आहे एक बघण्यात. ती आई कायम मुलाला ऐकवत असते तुझ्यासाठी मी अशा खस्ता खाल्ल्या , यंव केलं न त्यंव केलं , त्यामूळे मुलगा आईचा एकही शब्द खाली पडू देत नाही अन सून बिचारी सगळं निमुटपणे सहन करते . मुलगा ही आईचा स्वभाव माहीत असल्यामुळे सगळं काही आईचच ऐकतो. पण सर्वच आईवडील आपल्या मुलासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारे खस्ता खातच असतात , कष्ट करतच असतात पण त्या माउलीला वाटते की मीच खूप कष्टाने माझ्या मुलाला वाढवलं आहे . अन विचित्र म्हणजे ती त्या दोघांना एकांतही मिळू देत नाही. अन सगळ्याप्रकारे सुनेची बरोबरी !! मी त्या मुलाला समजवायचा प्रयत्न केला पण परिणाम शून्य . अन ती सून ही जरा जास्तच सहन्शील आहे म्हणून तीच जर काही म्हणत नाही तर आपण कशाला बोला... पण तीची नजर सगळं काही सांगते ... अन ते कुटुंब आमच्याच शेजारी राहायचे पुर्वी म्हणून हे सर्व माहीती ...
असतात अश्याही विकृत आया ...
-----------------------------------------
सह्हीच !
छान
छान लिहिलय. पण या विषयावर व्यक्तीगत मत व्यक्त न करणे मी जास्त पसन्त करेन.
शरद
हा विषय
हा विषय फार फार नाजूक आहे .
नवीन येणार्या सुनेच्या सासूकडून तसच सासुच्या सुने कडून अपेक्षा असण अगदी स्वाभाविक आहे .
पण त्या अपेक्षा रास्त आहेत का हे वेळोवेळी पडताळण्याची गरज असते .मुळात कसल्या अपेक्षाच कुणीच
कुणाकडून ठेवू नयेत अस मला वाटत .अमकीच अस कौतुक झाल माझ तस झाल नाही म्हणून माझी सासू
वाईट अस असू शकत नाही .उद; '' पलंग सजवणे ''वगैरे सर्व सामान्य घरी फारच फिल्मी वाटत .आपल
घर जर सरळ साध असेल तर ते आहे तस स्विकारल गेल पाहिजे .''तू चांगला मनापासून प्रेम करणारा ''
अस जर आहे तर अश्या मुलाच्या आईबद्दल आदर वाटायला पाहिजे .''आई अशा पहिल्या नव्ह्त्या ''अस
जर आहे तर अचानक बद्लायच जे काही कारण असेल त्याचा विचार करायला पाहिजे .अनेक वेळेला
माहेरच्या माणसांच बेजवाबदार वागण सास्वाना नाउमेद करत .लग्न झालेल्या मुलीच्या घरच्या दैनंदिन
व्यवहारात लक्ष घालण ,घरच्या खाजगी व्यवहारात लक्ष घालण याने उलटपक्षी सासूचाच छळ होतो .
दोघांच्या प्रेमात'' मी जास्त कमावते''असले विचार योग्य नव्हेत .सासू बरोबरी करते अस मनात येण्यामधे
गैरसमज सुद्धा असू शकतात .आवडी सारख्या असू शकतात .''हार लपवला ''अशा निश्कर्शावर सहज
येवू नये ,सासूच्या तस मनात पण नसेल तर या अशा शुल्लक बाबीने वय झालेली व नवर्याच छत्र हरवलेली
सासू खचण्याची आधीक शक्यता .आपण फार शिकलो असा अभिमान न ठेवता ''ढाई अक्षर प्रेम का ''
शिकलो का याचा विचार करण गरजेच आहे .सास्वानी छळ करायचे दिवस गेले आता घरोघरी सासवाच
मुलाचा संसार तुटू नये म्हणून मुकाट्याने सहन करतात .राईचा पर्वत होउ नये म्हणून जपताना दिसतात .
आजची सासू सुशिक्षित आहे .करीयर सांभाळून संसार केलेली आहे .तीन वर्ष सतत काही समजवायचा
प्रयत्न करत असेल तर स्कारात्मक वागायला हव .समजून घ्यायला हव .निदान सासूच्या वयाला तरी
मान दिला तरी खूप .आपल्याला शुभेच्छा .
छायाकाकु
छायाकाकु नाही बा समजलं आपण लिहीलेलं
कुठल्याही
कुठल्याही विषयाचा एकतर्फी विचार होउ शकत नाही अस वाटल म्हणून दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न
केला .काकू तुम्हाला जर समजल नसेल तर क्षमस्व .
लेख बराचसा
लेख बराचसा विस्कळित आहे. नायिकेला नक्की काय म्हणायचय??
सासू छ्ळ/जाच करतेय? मानसिक त्रास देतेय?? सासू जर मुलाबद्दल इतकीच पझेसिव्ह असेल तर सासू आणि सुनेमधे काही संवाद झालाच नाही आहे का??
मी लग्न होउन आले, आणी अचानक त्या भीतीने तुझ्या आईचे भावविश्व उध्वस्त केले. आधी अश्या नव्हत्या रे त्या. पण काय झाले कळले नाही. अचानक त्यांना लग्नात आपला मुलगा दान केल्यासारखे वाटु लागले.
>>> याचा अर्थ काय?? सासूला जर इतका त्रास असेल तर मानसोपचारतज्ञाचा सल्ला घ्यावा हे उत्तम .
मला हवे असते तेव्हा तु नसतोच मुळी जवळ. घरची सगळी कामे पण मीच करायची अभ्यास करुन, त्याला काही ना नाही, पण जरा दोन प्रेमाचे शब्द नको का माणसाला ? सारखे हे नाही अन ते नाही झाले, जणु मी म्हणजे हेलाच की. काम केले तर फार काय मोठे त्यात.<<<<>>>>> मला तु आवडलास कारण तुला मी हवी होते. Doctor म्हणुन मिळणारा पैसा नको होता. तुला मी आवडले होते जिवनसाथी म्हणुन. मला तेच भावले.
एकाच लेखातली हे दोन वाक्ये. परस्परविरोधी.
बाकी मीना या डॉक्टर आहेत हे समजल्यावर मुळीच आश्चर्य वाटले नाही.
--------------
नंदिनी
--------------
पण या
पण या विषयावर व्यक्तीगत मत व्यक्त न करणे मी जास्त पसन्त करेन.>> ह्म्म्म्म खर आहे! मी पण
लिहिलय छान!
Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!!
छान
छान
मांडणी जरा
मांडणी जरा विस्कळित आहे.
तुझ्या
तुझ्या आईला कायमची एकच भीती, माझा मुलगा मला आता दुरावेल. ... मला कळु नाही शकली ती भीती.>>>>

कशावरून? तुमचाही असा त्यांच्याविषयी गंड असू शकेल!
मी लग्न होउन आले, आणी अचानक त्या भीतीने तुझ्या आईचे भावविश्व उध्वस्त केले. आधी अश्या नव्हत्या रे त्या. पण काय झाले कळले नाही. >>>>
लग्नाआधीपासून त्यांना ओळखत असाल तर काय झाले हे सहज कळेल.. एकदा सिंहावलोकन करा की!
माझे आई बाबांना तुझ्या आईने सांगीतले की आमच्याकडे राहु नका. असे मी कधीच पाहीले नव्हते. माझ्या भावाच्या वेळेला आणी बहीणींच्या वेळेला पण. मी पण दुखावले रे त्या दिवशी. खुप खुप दुखावले. तु कुठेच नव्हता तेंव्हा. तु बोलतच नव्हता.>>>>>>>>>
तो बोलला नाही तर तू बोलायचस ना.. तो त्याच्या आईसारखाच किंबहुना जास्त स्वार्थी अन आपमतलबी असणार..
आणी तु बरसलास.. माझा राग माझा निर्धार गळाला. असाच का नाही बरसत नेहमी.... ?? >>>>>>
तो बरसला अन तू विरघळलीस.. नेहेमी नाहीच बरसणार.. जो माणूस कधीच तुमच्या बाजून राहिला नाही, तुमच्या आईबाबांचा अपमान झाला तरी दोघांनी सहन केलात..
हे सगळं लेखातल्या काल्पनिक लेखिकेला उद्देशून आहे बर..
असतात
असतात अश्याही विकृत आया ...
अश्याही
अश्याही सासू असतात ????
बाप रे.... अवघड आहे.... आधीच सासू ह्या व्यक्तीबद्द्ल बरंच काही बोलल्या जातं....ते ऐकुनच लग्न करावं की करू नये हे कन्फ्युजन होतं... त्यात असं काही ऐकलं की आणखी भीती वाटायला लागते!!!!
....................
निवडणुकीव्यतिरिक्त माझे मत फारसे कुणी विचारात घेत नाही...
आणी तु
आणी तु बरसलास.. माझा राग माझा निर्धार गळाला. असाच का नाही बरसत नेहमी.... ??>>>>>>>>>>>>>
मला वाटतं हाच मुद्दा महत्त्वाचा आहे....
नायिकेचं त्याच्यावर मनापासून प्रेम आहे पण त्याच्याबद्दल confusion आहे का?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जाने क्या ढुंढता है ये मेरा दिल.......
तु़झको क्या चाहिए जिंदगी............................
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~