मुंजीसंबंधी एक प्रश्न

Submitted by वाट्टेल ते on 19 May, 2015 - 13:35

भिक्षावळ का मातृभोजनपैकी कोणत्यातरी वेळेस मुलाच्या आईने पांढरे वस्त्र \ साडी नेसावी अशी काही रूढी आहे का? यामागे काय कारण आहे ? जाणकार यावर प्रकाश टाकतील काय?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भिक्षावळीचा वेळेस बटूच्या आईला तिच्या माहेरचे लोक पांढरी साडी देतात. ती नेसून तिने मुलास भिक्षा घालावी.

यामागचे कारण (आमच्या गुरुजींनी सांगितलेले) असे की भिक्षा मागून झाली की बटू घर सोडून विद्यार्जनासाठी गुरुगॄही जात असे. त्याचा विरह होणार याचे दु:ख आईला असते, म्हणून ते शोकसुचक असे पांढरे वस्त्र तिच्या माहेरची मणसे तिला देऊन तिचे सांत्वन करतात.

जाणकार यात काही उणीव/तॄटी असतील तर त्या सांगतीलच.