Submitted by गोगो on 15 July, 2013 - 23:50
आमची जुनी मारुती ८०० बँगलोरहून मुंबईला पाठवायची आहे. कशी पाठवावी लागेल? म्हणजे ड्राईव करूनच न्यावी लागेल की वेहिकल मधून ट्रान्स्पोर्ट करणे सोईचे पडेल? अशा कुठल्या एजन्सीज असतात का? की आपल्यालच ड्रायवर अरेंज करावा लागेल? प्लीज उत्तर द्या.
आपल्यापैकि कोणी कार ट्रान्स्पोर्ट केली असेल दुसर्या शहरात तर आपले अनुभवही शेअर करा.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
DTDC मध्ये चौकशी करा. ते
DTDC मध्ये चौकशी करा. ते करतात बहूदा.
हे घ्या.
हे घ्या. http://www.vishalroadline.com/car-transport.html
गाडी चालवत नेणे सोपे व स्वस्त
गाडी चालवत नेणे सोपे व स्वस्त पडेल.
बंगळूरात ओळखी असतील तर भरवशाचा ड्रायव्हर अॅरेंज करून याला त्याचा भत्ता व येण्याच्या तिकिटाचा खर्च देऊन मुंबईला गाडी पाठवता येईल. पण तो गाडीत शिटा भरीत जाईल याची खात्री बाळगावी.
सगळ्यात भरवशाचा उपाय म्हणजे कुणी मुंबैहुन येणारे पाहुणे असतील तर त्यांना गाडीत बसवून पाठवणे. अथवा घरातले हौशी तरूण ड्रायव्हर्स घेऊन जाऊ शकतात. मधे एकादा हॉल्ट प्लॅन करा. एका टप्प्यात इतके अंतर मारूतीने अनकंफर्टेबल होईल.
गाडीची पासिंग कुठली आहे?
कर्नाटकाची असेल तर ठिकठिकाणी पोलीस त्रास देतील. स्पेशली महाराष्ट्रात. खासगी गाडी (नॉन टूरिस्ट परमिटची) भाड्याने लावली आहे असा संशय बाळगून ते पैसे उकळायच्या /कारवाईचे आकडे पूर्ण करायच्या पाठी असतात. गाडीत मालक/नातेवाईक स्वतः असलेत तर सहसा असा त्रास होत नाही.
(फाऽरच जुनी गाडी असेल अन सेंटी व्हॅल्यू फार नसेल, तर तिकडेच विकून टाका अन मुंबैत नवी/सेकंड घ्या. कारण आरटीओ पासिंग बाहेरचे पाहून पदोपदी त्रास होईल, असे वाटते.)
(फाऽरच जुनी गाडी असेल अन
(फाऽरच जुनी गाडी असेल अन सेंटी व्हॅल्यू फार नसेल, तर तिकडेच विकून टाका अन मुंबैत नवी/सेकंड घ्या. कारण आरटीओ पासिंग बाहेरचे पाहून पदोपदी त्रास होईल, असे वाटते.)
>>>>>>>>>>>>>>१००%
बंगळुरात एखादं गटग करा.
बंगळुरात एखादं गटग करा. आम्हाला बोलवा. येताना घेउन येउ तुमची गाडी आणि योग्य जागी पोहोचती करु.
@ सेनापती: थॅन्क्स. तुम्ही
@ सेनापती: थॅन्क्स. तुम्ही दिलेली लिन्क पाहिली. चौकशी करते त्यांच्याकडे.
@ इब्लिसः भरवशाच्या ड्रायवरचा ऑप्शन चा पण विचार चालू आहे. आणि तुम्ही सांगितलेले मुद्दे (शिटा भरणे ई.) पटले. ते गृहित धरावच लागेल.
बाय-द-वे, गाडी जुनीच आहे. १५ वर्ष. रजिस्ट्रेशन मुंबईचंच आहे.
१५ वर्ष जुनी गाडी असेल तर
१५ वर्ष जुनी गाडी असेल तर खरोखर विकून टाकणे आणि मुंबईत आल्यावर नवीन घेणे. योग्य ठरेल.
जुन्या गाडीला पासिंगचा खर्च दर ३ वर्षांनी आहे. तसेच बंगलोरच्या कोरड्या हवेतून मुंबईच्या दमट हवेत आणणार आहात गाडी त्यामुळे मारूतीच्या जुन्या गाड्यांची इंजिन्स ठणठणीत असली तरी गाडी बारिक सारीक कामे काढत रहाणार आता.
हो नीधप, नविन गाडी घेतली आहे
हो नीधप, नविन गाडी घेतली आहे तेव्हा मारुती आता मुंबईला नेऊन विकायचीच आहे. तसंही आर टी ओ (मुंबई)चं प्रमाणपत्र लागेलच विकण्याआधी.