रिक्षावाले : मुंबईचे...

Submitted by स्वस्ति on 8 July, 2008 - 12:14

'मिल्यां'नी लिहिलेला रिक्षा की शिक्षा हा विनोदी ले़ख वाचला आणि मला काही किस्से आठवले - मुंबईच्या रिक्षावाल्यांचे.

मी मुंबईत जन्मले ,वाढले आणि अजून इथेच रहातेय ... त्यामुळे मुंबईत प्रवासाची अडचण कधीच जाणवली नाही.
ऑफिसला जायला लागल्यापासून माझा रिक्षा प्रवास जरा वाढला.
रात्री निघायला उशिर झाला की रिक्षासारखा दुसरा आरामदायी प्रवास नाही.

आमचा एक मनेजर बंगलोरवरून आला होता.
मी कधी साडेनउच्या नंतर ओफिसमधून निघाले की विचारायचा
"अब तु घर कैसे जायेगी ?"
"ऑटोसे " मी सहज म्हणायचे .
"इज इट सेफ ? बंगलोरमे तो इतने रात को लेडि़ज अकेले ऑटोसे नही जाती " त्याला फार काळजी वाटायची.
"ये मुंबई है सर . अभी मुझे हायवे पर ट्राफिक मिलेगा .और वैसेभी यहा के ऑटोवाले अछ्छे होते है" मला यात कधीच काही गैर वाटल नाही.

साडेनउ , दहा , कधी कधी पार्टी वगैरे असली की साडेबारा ..मी बिनधास्त रिक्षाने यायचे आणि अजुनही येते.
"टच वूड " घर ते ऑफिस - एका तासाच्या प्रवासात- मला आतापर्यन्त कधी वाइट अनुभव नाही आला .
पण बरेचसे मजेदार किस्से मात्र अनुभवले.

एकदा तासभर थांबुनही बस मिळाली नाही आणि मग मी रिक्शा पकडली. वाजले होते रात्रीचे साडेआठ.
अगोदरच माझ डोक तापल होत, त्यात ड्रायव्हरने गाणी लावली.
मी वैतागुन त्याला आवाज कमी करायला सांगितला.
त्याने डेक बंद करत मला काय म्हणावं
"माडम , आप के लिये ही लगाये थे . इतनी दूर जाना है ना ,अकेले बोर हो जाओगे. नही चाहिये तो बंद कर देता हूं"
मला हसावं की वैतागावं कळेना .
"थांक्यु . बजने दिजिये पर आवाज थोडी धीमी रखिये" या उपर मी काही बोलले नाही.

मी आणि माझी मैत्रिण , आम्ही रिक्षा पकडली.
त्याला म्हटल उजवीकडुन काढ त्याने डावीकडे वळवली. आता लांबचा वळसा पडनार म्हणून आम्ही वैतागलो .
थोडं पुढे गेल्यावर त्याने विचारलं "वाजले किती ?"
"साडेनाउ "
तो बिचारा अगदी कावराबावारा झाला
"माडम , बराच उशिर होइल मला परत यायला. मी तुम्हाला इथे हायवे जवळ सोडतो .तुम्ही प्लिज दुसरी रिक्षा पकडाल ? माझी सासुरवाडी इथेच आहे , मला तिकडे जायच आहे "
आम्ही दोघीही आज्ञाधारक मुलींसारख्या उतरलो आणी त्याला मीटरप्रमाणे १२ रुपयेही दिले.
पुढे येउन आम्ही दुसरी रिक्षा पकडली.
बोलता बोलता आमच्या लक्षात आलं - त्या रिक्षावाल्याला त्याच्या सासुरवाडीला जायचच होतं . त्याने आम्हाला वाटेत उतरवलं आणी आम्ही वर त्याला पैसेही दिले.

एकदा असचं आम्ही एकत्र येत असताना रिक्षावाल्याने मधेच रि़क्षा थांबवली आणी गायब झाला .
वाटेतच रिक्षा थांबलेली ,ड्रायव्हर गायब, आम्ही दोघी वाट बघतोय , येणारे जाणारे आमच्याकडे बघतायेत ...आमचा पारा चढला.
परत येताच त्याला जरा घुश्शातच विचारलं
"कुछ नही माडम , जरा गुटखा खानेकी तलफ आयी ."
त्याने शांतपणे गुटख्याची पुडी (स्वतःच्या) मुखात उपडी केली आणि आमची तोंड बंद झाली.

आतापर्यन्त मला एकच प्रसंग मला आठवतोय , जेव्हा मी रिक्षा पकडताना प्रचंड चरकले होते ....
रात्री साडे दहा - अकराची वेळ . मी मेन रोडला रिक्षा शोधत होते. जरा पुढे वीस पावलांवर एक दिसली.
झपाझप चालत तिच्यापाशी पोचले आणी ड्रायव्हरला विचारलं .
त्याने हो म्हणायला मागे वळुन पाहिलं आणी माझ्या पायापासून मस्तकापर्यंत थंड लहर सळसळली . मला काही सेकंद काही सुचेचना. अर्थात दोष त्याचा नव्हता .माझ्या मनाचे खेळ ... .
त्या सुमारास काजोल (डबल रोल ) आणी आशुतोष राणा यांचा चित्रपट बराच चर्चेत होता - दुश्मन.
त्यातला आशुतोष राणा चा 'गोकुळ' आज ही अंगावर शहारे आणतो
गळ्यात काळा दोरा , तेल लावलेले केस आणि डोळ्यात काजळ , असा रिक्षावाल्याचा अवतार पाहुन मी प्रचंड हादरले होते. आज आठवलं की हसु फुटतं.

वाटेत रिक्षा बंद पडली किंवा इथपर्यंत सोडेन असं ठरलं असेल तर दुसरी रिक्शा बघुन देणं, कोणी दुसरा तयार होइ पर्यंत थांबण इतकी माणुसकी तर नेहमीच पहायला मिळते.

आणि शेवटी एक टाक्सीवाल्याचा किस्सा ...
मी , माझी मैत्रिण आणि एक मित्र आम्ही एका लग्नावरून परत येत होतो .
वाशी ते सायन टाक्सी आणि मग पुढे रिक्षा असा आमचा पैसे वाचवण्याचा प्लान.
रात्री साडेबारा वाजता ,आम्ही सायनला पोचलो.
रिक्षांची भली मोठी रांग उभीच होती.
आम्ही त्याला थांबायला सांगितल.
तो म्हातारासा ड्रायव्हर आम्हाला म्हणाला
"यहां से नही , थोडा आगे छोडता हुं. ये लोग बडे बदमाश है .इतनी रात, दो लडकियोंको लेके जाओगे ,थोडा संभालके"
त्याने आम्हाला पुढे नेउन व्यवस्थित चांगलासा रिक्षावाला बघुन , येणार का विचारुन मगच सोडलं .
यातला रिस्क फाक्टर सोडला तर त्याचा चांगुलपणा मी आयुष्यात कधी विसरणार नाही.

मी मुंबईत बिन्धास्त असते अस मी मनापासुन म्हणते ते अशा लोकांमुळेच.

गुलमोहर: 

पुण्याचं नाव घेताय का? जरूर घ्या. पब्लिक ट्रान्स्पोर्ट कसा असू नये याचे उत्तम उदाहरण आहे पुणे शहर. यात बस, रिक्शा सगळेच आलेत.

जवळच्या अंतराला तुच्छतेने नाही म्हणणारे रिक्षावाले कधी पाह्यले नसतील मुंबईत तर पार्ला इस्टला स्टेशनच्या इथे संध्याकाळी ६:३० ते ८ दरम्यान स्टेशनपासून बिस्किट फॅक्टरी, हनुमान रोड किंवा पार्ला इस्टात कुठेही जायला रिक्षा पकडायचा प्रयत्न करा. एकगठ्ठा भरपूर अनुभव जमा होतील>> हे अगदी खरंय..

Pages