आज सकाळी जरा उशिराच जाग आलेली .अंथरुणातुन उठावेसे वाटत नव्हते .थकलेले डॊळे अर्धवट किलबिले करुन बघितले खिडकितुन दिसणारा तो सुर्यप्रकाश रोजच्या वेळेचा नव्हताच .मनात म्हंटले उशिर झाला पण उठायलाच पाहीजे ,नाहीतर तो घड्याळिचा काटा आपल्यासाठी थांबणार नाही आणि सुरु होईल आपली लगिणघाई .
रमानं उभ्यौभ्याच गँसवर चहा ठेवला आणि ब्रश हातात घेतला .दार उघडुन बाहेर बगह्ते तर आख्खी रात्र पाऊस जमिनिला ओलं चिंब करुन निघुन गेला होता .जमिन अनेक ठिकाणी उघडी बोडखी दिसत होती तर काही ठिकाणी हिरव्या गवताची जागा गढुळ पाण्याने घेतली होती तरीही एरवी मनाला प्रसन्न करणारे ते गवत वर डोकावतच होते.आज बागेतल्या झाडाना आनंदाचे उधान आले होते ती तर मोठ्या खुषीत न्हाहुन निघाली होती .यावेळेला मात्र रमाला होस्टेलला राहणारा तिचा लेक आठवला "राहुल’ त्याचे नाव दोघांच्याही नोक-या त्यामुळे त्याला मागच्याच वर्षी वसतिग्रुहात ठेवला होता .निर्णय अर्थात दोघांच्याही संम्मतीने घेतला होता. पाऊस आला कि पावसात चिंब भिजायला त्याला फ़ार आवडायचे आणि तो पावसात नाचायचा त्या ओल्या चिंब शरिराने ..घरात त्याला बघायला ठेवलेल्या त्या मावशीना पण ऐकायचा नाही.रात्री आम्ही दोघही घरी आल्यावर दुपारच्या पावसाची गम्मात सांगायचा.देव जाणे त्याला कधी सर्दि होतच नसे.पावसाची आणि राहुलची गट्टीच जमलेली होती .हेही बरेच झाले .नाहीतर तो दवाखाना आणि ति औशधांची सक्ती ..................
झाडावरील पाण्यावर रेंगाळलेला पाण्याचा थेंब माझ्या डॊक्यावर टपकन पडला आणि मला आठवण झाली ती गँसवर ठेवलेल्या चहाची .स्वयंपाकघरात येउन बघते तो रोहित चहा गाळण्याच्या तयारीला लागला होता.दोघांच्याही गप्पा सुरु झाल्या.कधी कमी तर कधी जास्त पण चहानंतर गप्पांची सुपारी आवश्यक .आज मला एक आनंद होत होता तो एक काम
निसर्गाने कमी केल्याचा.पावसानं अंगणात सडा घातला होता.आणि रांगोळी जर घातली असती तर पाण्याच्या प्रवाहासोबत धुवून नेणार होता.वाहत जाणारे रंग रांगोळीच्या कलाकाराला निश्चितच व्यथित करतात.मनापासून काढलेली रांगोळी आणि कसबीने त्यात रंग भरुन तिला शोभिवंत केले जाते.हेच रंग जर एका क्षणात उध्वस्त होत असतील तर त्या कलाक्रुतिचा अर्थ काय?याच विषयावर गप्पा चाललेल्या आमच्या.....आणि दारात वर्तमानपत्र घेउन भिजलेला तो पोरगा उभा होता.
मी पोर्चमधुन स्वत:च बाहेर गेले आणि तो पेपर हातात घेतला.........
पेपरच्या ठळक बातम्यावर नजर टाकते रोजच्याप्रमाणे कारण घरातली कामे आवरुन आँफ़िसला जायचे होते .एका बातमीवर नजर पडली आणि खिळूनच राहीली.बातमी तशी वेगळी नव्हतीच.रोजच अशा मनाला विषन्न करणा-या बातम्या असतात पाण या स्त्रीचे नांव वाचले आणि मी गर्भगळीतच झाले.ही तर माझी मैत्रीण "नीरा"एकाच वर्गात ,शिकलोय ना आम्ही ..माझे डबडबलेल्या डॊळ्याने रोहीतला सांगु लागले.
आठवले मला सर्व .,माझ्या आयुष्यातला तो स्वप्नांचा मोरपिशी काळ.....ते सुंदर जग तो आसमंतात जिकडे तिकडे आनंदाचे कारंजे दाखवणारा काळ ..आनंदाने परावर्तीत होणारी किरणे नीरा तूझ्या चेह-यावर पडायची तेव्हा तू अधिकच सुंदर दिसायचेस .फ़ुलपाखरा सारखे बागडत होतो आपण.एकाच शाळेत एकाच वर्गात ...आठवल अग किती मजा यायची वर्गात बेंचवर पहिली जागा मिळवली की कोंढाणा सर केल्याप्रमाणे होणारा तो आनंद कितीतरी वेळ बारक्या आवाजात हसण्यात घालवायचो....तूझा हसरा चेहरा ,बोलके डॊळे आणि तूझी कुशाग्र बुध्दी .त्या दिवसात आनंद आपल्याला शोधत आपल्या जवळ यायचा .........आपले आणि आनंदाचे असे हे अतुट नाते होते .येणारा प्रत्येक दिवस एक नवी सकाळ घेउन यायचा आणि प्रसन्नेत नवे नवे स्वप्न आपण बघायचो .अग क्षितीजाला हात लावायची स्पर्धा खेळायचो कित्येकदा शाळेच्या मैदानात..क्षितीज फ़ार लांब आहे हे धावता धावता दमल्यावर कळायचे ,पण जिद्द कायम होती .एक दिवस मी हे करुन दाखवेलच किती जिद्दीने बोलायचीस ..................
प्रत्येक वादविवाद स्पर्धा ,काव्य स्पर्धा यात मी आणि रेवा नाही हे कधीच नाही झाले.आमच्या बाई किव्हा आंबेकर सर आवर्जुन आम्हाला भाग घ्यायला लावायचे .तुझं आणि माझे एक साधेसुधे स्वप्न स्वत:च्या पायावर उभे रहायचे म्हणजे स्वंयसिध्दा व्हायचे.आपले आंबेकर सर आमच्यात या बिजाला रुजवले .ते शिकवण्यासोबत जगातल्या घडामोडी,सामाजिक जाणिव सुनांना लेकींना होणारा सासुरवास आणि विषेश म्हणजे सरांच्या मुलीचा हुंडाबळी झालेला ........अशा अनेक गोष्टी ते सांगत असत.आमचे खेडेगाव होते खेड्यातच लहाणपन गेले माझे.किती विलोभणीय ते गाव आमचे ..झुळझुळ वाहणारी नदी आणि नदीच्या किना-यावर ते माझ्या विठुचे मंदीर .नदीच्या पलिकडे माझी शाळा होती.शाळेतले ते दिवस तूझ्या आठवाशिवाय पूर्ण होणारच नाही गं ...आपण काय ठरवले होते ,जगात जे काही आनंद आहे तो आपल्या ओंजळीत साठवायचा आणि देता येइल तितका आनंद ईतरांना द्यायचा ,हे करीत असतांना आपण आपले क्षितीज देखिल ठरवीले होते..किती सिमीत आणि समाधानी होते ते .....
आपल्याला फ़क्त स्वयंपूर्ण व्हायचे होते.आणि आमच्यात ही भावना रुजवायला आमचे सर कारणीभुत होते...जगाचे नियम चालीरिती याही आमच्या कल्पनेत विस्त्रुत झाल्या त्या सरांमुळेच .आपण दोघिंही MSc झालो .मी गावाजवळच नागपूरला
साधासा व्याखाता या पदाव्र नियुक्त झाले.पण तूझ्या घरच्यांनी तूला लग्नबंधणात बांधले.ईतके शिकू दिले आणि काय साधले तुझी कुशाग्र बुध्दी उपयोगात यायला हवी होती ना.किती दूर गेलीस तू गावापासून .उन्हाळ्यात भेट व्हायची .निराश दिसत होतीस .चेह-यावर पूर्णत्वाची एकही रेष नव्हती.मला वेदना झाल्या गं .मी काय करु शकत होते ...कळलेच शेवटी तूला रहावलेच नाही ........सगळ दुख माझ्यापूढे उघड केलस ....तूला जायचे नव्हते तिकडे पण आई बोलली तूझी जागा आता नव-याजवळच .जावे लागले तूला.
माझेही लग्न झाले .रोहीतसारखा संमजस पती मिळाला ,राहुलसारखा लोभस मुलगा आहे आणि माझ्या आवडत्या क्षेत्रात मी काम करते आहे आणि माझे छंदही जोपासते आहे.माझ्या यशाला सहकार्य देतो मला रोहीत प्रत्येक वेळेस आणि पाठीशी खंबीरपणे उभा असतो..मी भाग्यवान समजते स्वत;ला
तूझी प्रत्येक भेट मला व्यथीत करीत होती.तुझा तो तेजस्वी चेहरा तूफ़ान आल्यावर अस्त्याव्यस्त झालेल्या गावासारखा उजाड दिसत होता.पापणीला ओल अन काळजाला भोके घेऊन तू जगत होतीस.सहनशक्तीला बांध घालत होतीस.काकू सांगत होत्या तू एक छोटी मूलगी दत्तक घेतलीस म्हणून .मला जरा हायसे वाटले.आता तू जरा जगण्यात रस घेऊ लागली होतीस.तिच्या बाळ लिला किती कौतुकाने तू मला पत्रातून कळविल्या होत्यास.आणि पत्रातले प्रत्येक अक्षर हसत असल्याचा मला भास झाला.मी निवांत झाले तूला आनंदी बघुन .जगण्याचे लाख बहाणे,तूला जगवत होते अस एकदा पत्रात तू लिहिलेस ना .......तेव्हा मी रोहीतला माझ्या आनंदात सहभागी केले होते.तो म्हणाला"सुधा आता मला बरं वाटतय तूला काळजीत नसलेले बघु,अगं किती ही मैत्री !"
एक एक क्षण माझा लग्नापूर्वीचा तुझ्या सहवासात घालवलेली मी मोरपिसासारखा पूस्तकात जपून ठेवला गं "
त्या क्षणांना या क्षणाला मी वेड्यागत आठवत गेले ..डोळ्यात आसवे आणि हृदयात पोकळी ,.ऊर बडवुन घ्यावा असं झालय ...काहुर मनातले अजुनच तिव्र झाले.मी एका जागेवर निषब्द बसुन होते .कितीतरी वेळ .ती बातमीच तशी आहे
अरे माझ्या ’निरा" ने आत्महत्या केलि होती.काय तू गं छकुलीला विसरलीस ? ती कुणाला आई म्हणेल..तिचे लाड कोण करेल.तिला कुशीत कोण निजवेल ..............कशा कशाचा विचार नाही केलास.तू ईतकी दुबळी नव्हतीस गं .वेडे निघुन यायच ना इकडे ,स्वतंत्र राहीली असतीस .तुझ्याजवळ पदवी होती .काहीतर करु शकली असतीस,का हतबल झालीस.क्षितीजाला कवेत घ्यायचे सोडुन म्रुत्युला कवटाळलेस.मला तूझा राग पण येतोय ....हे नाही ग आवडले मला ...
पळपूटेपणा म्हणतात याला.तो क्षण तिव्रतेने तूला सांगत असेल आत्महत्या कर पण त्याच क्षणाला तूला छकुली नाही आठवली..........मी विषन्न मनस्थितीत बसले असताना.सावध झाले..कारण घरात कुकरच्या शिटीचा आवाज येत होता.बहुतेक रोहितने स्वयंपाकाची तयारी केली असणार.मी आज आँफ़िसला जाणार नाही म्हणून त्याने माझ्या आँफ़िसात कळवले देखील...."किती चांगला आहेस तू रोहीत ,मला किती समजुन घेतोस’
म्हणतो वेडे बायकोला नवरा नाही समजून घेणार तर कोण ,तू पन मला समजून घेतेस ना,माझ्या अती कामामूळे आपण कित्येक दिवसापासून तुझ्या गावाला नाही गेलेलो...चल आज निघायचे आणि निराच्या आईला भेटून येउ........माझा चेहरा लगेच खुलला आणि मला वाटले रोहीतसारखा पती जर निरालापण मिळाला असता तर ही दुर्दैवी वेळ आलीच नसती ..........
आभाळ भरून आले होते ,आज आकाशाला पण रडायला येत होते बहुतेक
*कल्पी जोशी*
सुन्दर आहे...मस्त आहे.
सुन्दर आहे...मस्त आहे. शुभेच्छा नविन लेखा करीता.
छान , खुप सुन्दर
छान , खुप सुन्दर
धन्यवाद
धन्यवाद