संवेदनक्षम

Submitted by विनायक.रानडे on 1 November, 2009 - 11:41

वेदना समजण्याची क्षमता, हा मी समज करून घेतलेला अर्थ, शब्दार्थ जाणकारांनी दुरुस्ती करावी त्यांचे स्वागत. मी किती संवेदनक्षम ( सेन्सिटीव्ह ) आहे हे आहार, विचार, संस्कार आणि परिस्थितीशी संबंधित आहे. ह्याची जाणीव मला निद्रानाशाच्या आजारातून झाली - नशीब माझे भाग १. ह्याचे शास्त्रीय कारण रक्ताचा दर्जा बदल व शरीरातील आम्लाचे प्रमाण असावे. मी कोणत्या / किती विषयांशी संवेदनक्षम असावे ह्याची प्राथमिकता बाल वयात माझे पालक ठरवतात, मग शिक्षकवर्ग त्यांच्या कुवती नुसार त्यात भर घालतात, नंतर सामाजिक परिस्थिती त्यात चढ उतार घडवते. जे बालवयात खरे-खोटे होते त्याचे अर्थ वयोपरत्वे बदलतात, तसेच काहीसे चांगले-वाईट, लहान-मोठे, फायदा-तोटा वगैरे विषयांचे होते.

मी ह्या व्यक्तीची पाया बांधणी व दर्जा माझ्या जन्माच्या आसपास माझ्या जन्मदात्यांच्या ( दात्यांच्या पंचांगात
लिहिलेले ) तन, मन, धन व काळ ह्यावर ठरवला गेला. त्यांची तेव्हाची शारीरिक क्षमता, मनस्थिती, वैचारिक
समतोल, सांपत्तिक स्थिती आणि त्या काळातील सांसारिक / सामाजिक स्थितीमुळे ठरवला गेला. आम्ही ६ भावंड सगळ्याच बाबतीत खूप मोठ्या फरकाने वेगळे आहोत, मोठ्या बहिणीत व माझ्यात १८ वर्षांचे अंतर म्हणूनच मला मी एक नको असलेले शेंडेंफळ असल्याची जाणीव झाली, विशेष असे की बर्‍याच वर्षानंतर माझ्या आईनेच माझ्या ह्या कल्पनेला सत्य असल्याचा दुजोरा दिला तेव्हा तिला तिचे रडणे आवरेना, हा माझ्या संवेदनक्षम असण्याचा परिणाम.

टक्केवारीच्या जगात ९० टक्के जोड्या अपघाताने पालक झालेले असतात, ८ टक्के थोडेफार फरकाने ठरवून पालक झालेले असतात, दोन टक्के लोक योजना बद्ध, तन, मन, धन व काळ ह्या सगळ्याचा विचार करून मोठ्या दिमाखाने पालक होण्याची फळे चाखतात. प्रत्येक व्यक्ती जन्माने संवेदनक्षम असते त्याची पातळी व दर्जा कमी करणारे प्रामुख्याने पालकच असतात, त्यानंतर एक एक मंडळी आपापल्या परीने हातभार लावतात, ते कसे ? बघूया ह्या मंडळींचे योगदान. मोठ्यांचा आदर करावा ( मोठे कोण / कसे / कधी / का ठरवणार ). तुम्ही सुखी असाल तर इतरांच्या सुखाचा विचार करा ( मी अजून सुखी होण्याच्या प्रयत्नात अडकलो आहे, इतर कोण ? ) वगैरे.

९० टक्के पालक मंडळी त्यांच्या पाल्ल्याला एक जबाबदारी पदरी पडली म्हणून पाळतात. सुरुवात होते ति बाळ
जन्माला आल्यापासून, संबंधित मंडळी सल्ला देत प्रयोग करतात. आहार कसा / कोणता / केव्हा, कोणत्या देवाला जा, डॉक्टर की वैद्यबुवा की एखादा बाबा, हे सगळे सल्लागार मंडळी ठरवतात. बाळ थोडे मोठे होताच बहुतांशी पालकांना संवेदनक्षमता जोपासणे विभिन्न कारणांनी शक्य नसते आणि ते मूल शिक्षण क्षेत्रातील विविध कारखान्यात ढकलले जाते. शाळेत जाणे हि एकमेव प्राथमिकता असते. पुढे अशा ९० टक्के पाल्ल्यांची प्राथमिकता उरते ती फक्त गूण / प्रमाणपत्र / प्रशस्तिपत्र मिळवणे. ह्यांच्या संवेदनक्षम असण्याचे महत्त्व व क्षेत्र हळूहळू संकुचित होते.

ति १० टक्के पालक मंडळी पाल्ल्याच्या संवेदनक्षमतेची व क्षेत्राची योजना बद्ध वाढ करणे हे कर्तव्य समजून प्रयत्नशील असतात. ह्यातील जनहित संस्कारांनी संवेदनक्षम असतात ती मंडळी जमेल त्या माध्यमातून जनतेचे भले व्हावे म्हणून प्रयत्नशील असतात, तर जे स्वहित संस्कारांनी संवेदनक्षम असतात ते जमेल त्या माध्यमातून जनतेला संभ्रमात गुरफटून स्वहित साधण्यात मग्न असतात. स्वहित संवेदनक्षम गटात राजकारणी, सल्लागार, बिल्डर / डेव्हलपर, संस्थांचे अध्यक्ष, व्यापारी, शिक्षक . . .यादी तुम्ही जर संवेदनक्षम असाल तर शोधून वाढवू शकाल. मी पण ना . . अहो तुम्ही इथपर्यंत वाचत आलात ते संवेदनक्षम आहात म्हणूनच, हो ना ?

गुलमोहर: