Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कविता

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » काव्यधारा » कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 19, 200720 07-19-07  5:33 am
Archive through July 22, 200720 07-23-07  1:09 am
Archive through July 24, 200720 07-24-07  2:06 pm
Archive through July 27, 200720 07-27-07  12:59 pm
Archive through July 30, 200720 07-30-07  4:03 am
Archive through August 03, 200720 08-03-07  5:57 am
Archive through August 10, 200720 08-10-07  11:32 pm

Manas6
Saturday, August 11, 2007 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंद्र-तारे खूप झाले...!

चंद्र-तारे खूप झाले;
आता 'कोसळलेल्या उल्कांवर' लिही!
पाने-फुले नेहमीचीच;
आता 'उन्मळलेल्या मुळांवर' लिही!

प्रेमभंग नित्याचा;
आता 'रोजच्या' विनयभंगावर लिही!
तुलसी-महात्म्य पुरे ;
आता 'बाटवलेल्या गंगांवर' लिही!

हिरवा मळा छानच;
आता काटेरी कुंपणावर लिही!
भाटगिरी सोडून आणि,
राजाच्या माजोरेपणावर लिही!

माझे, मी , खूप आता,
आतल्या 'कमी'पणावर लिही!
आणि सिरीयल्सचा 'आत्मा' असलेल्या,
छद्मीपणावर लिही!

'जीवघेणे' कटाक्ष बस;
रोजच्या 'जीव देण्यावर' लिही!
अन हुंडा घे‌उनही 'सावित्रीचा',
'जीव घेण्यावर' लिही!

'कर्माचे ओझे' जाणतो;
अता पुस्तकांच्या ओझ्यावर लिही!
आणि सौभाग्य लेणे विस्कटणाऱ्या,
कर्जाच्या बोज्यावर लिही!

हिरवा‌ईचे वर्णन 'वाचले' मी;
'न वाचणाऱ्या' वनरा‌ईवर लिही!
नि आपण स्वत:लाच लोटतोय,ना वेड्या ;
त्या भयाण खा‌ईवर लिही!

-ानस६



मायबोली



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators
>