Submitted by किश्या on 6 July, 2015 - 12:34
माझ्या एका मित्राने एक कवीता टाकलीये
http://www.maayboli.com/node/54524
वाचुन मलाही चार ओळे सुचल्या
पहिल्यांदा कवीता लिहतोय....
सल्ले अपेक्षीत आहेत टोमने नाही
----------------------------------------------------------------------
आभाळामंदी नाहीत ढग,
आन नाय पाणी,
जे होत ते ही आटुन गेलं
आमच्या डोळ्यातल पाणी.
मरग गेला, गेला आखाड
पर नाही आली एक बी सर,
औंदा नाहीस आल तर
नरड्याला बी लागल घरं घरं.....
जगणं आमच असच हाये
जगण्यापेक्षा आम्हाला मरणं सोप हाये.....
तु कुठे हायेस माहीती नाही पण....
आमच मात्र जगण हरवल हाये..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान तरी कस म्हणाव..
छान तरी कस म्हणाव..
मस्त वाक्यरचना,...
मस्त वाक्यरचना,...
छान तरी कस
छान तरी कस म्हणाव.....>>>
धन्यवाद खरी खरी प्रतीक्रिया दिल्या बद्दल